शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दोन अपघातात दोघांचा मृत्यू, पाटमधील शिवसेना शाखाप्रमुखाची डंपरला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 21:46 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी दोन ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले.

कुडाळ, बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी दोन ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-पाट रस्त्यावर डंपर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात पाट गावचे शिवसेना शाखाप्रमुख यशवंत आनंद परब (३८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुस-या अपघातात मुंबई-गोवा महामार्गावर बांदा कट्टा कॉर्नर येथे मुंबईहून-गोव्याच्या दिशेने पर्यटकांना घेऊन जाणा-या खासगी आराम बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्ता कामावरील मुकादम नागराज दुर्गाप्पा गडेकर (३१, मुळ रा. बैलहोंगल, बेळगाव, सध्या रा. चांदेल-गोवा) हा ठार झाला.

कुडाळ-पाट रस्त्यावरील अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून, त्याच्या विरोधात कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पिंगुळी एमआयडीसीनजीक घडला. यशवंत परब (रा. पाट-परबवाडा) यांचे पिंगुळी येथे सोलर सिस्टीम विक्रीचे दुकान आहे. तसेच ते कुडाळ येथील एका सोनाराकडेही कामाला होते. त्यामुळे त्यांची दररोज पिंगुळी व कुडाळला ये-जा असायची. रोजच्याप्रमाणे सोमवारी सकाळी ते पाट येथून दुचाकीने कुडाळला येत होते. पिंगुळी-पाट रस्त्यावर पिंगुळी एमआयडीसीच्या दरम्यान समोरून येणारा डंपर व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात परब दुचाकीसह जमिनीवर आदळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज होताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धावत घेत त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी  ठरले. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा व इतर तपासणी केली.  

बांदा येथे झालेल्या अपघातात चांदेल-गोवा येथे राहत असलेले नागराज गडेकर हे सोमवार आठवडा बाजार असल्याने बांदा येथे आले होते. ते मुकादम असल्याने क्वारी, क्रशर तसेच अन्य मजुरीच्या कामासाठी कामगार पुरवित असत. विलवडे येथे क्वारीवर असलेल्या कामगारांना पगार देण्यासाठी गेले होते. तेथून  ते बांदा शहरात बाजारासाठी येत होते.

महामार्गावर  कट्टा कॉर्नर येथून बांदा शहरात येण्यासाठी महामार्ग ओलांडताना त्यांना मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाºया खासगी आराम बसने (जीजे 0३ बीव्ही ४१0३) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास  जोरदार धडक दिली. या धडकेने नागराज हे बसच्या पाठीमागील चाकाला जाउन धडकले. यामध्ये त्यांच्या पाठीला व पोटाच्या बरगडयांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने नागराज याला तत्काळ उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. प्रणाली कासार यांनी उपचार केले. मात्र नागराज यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने गोवा-बांबोळी येथे हलविण्याचा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला. मात्र रुग्णवाहिका येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत प्रकरणी बसचालक संदिप पंडित सेजुल (वय २६, रा. बुलढाणा) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुटुंबाचा आधार गेलायशवंत परब हे कुटुंबाचा प्रमुख आधार होते. त्यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधारवड हरपला असून कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे.र्रुग्णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवरबांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात  १0८ रुग्णवाहिका आहे. मात्र रुग्णवाहिकेवर वैद्यकिय अधिकारी नसल्याने ती बंद आहे. गंभीर जखमी असलेले नागराज गडेकर यांना उपचारासाठी तातडीने बांबोळी येथे हलविणे गरजेचे होते. मात्र रुग्णवाहिका शोधण्यातच अर्धा तास गेल्याने नागराज यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा आरोग्य केंद्र हे महत्वाचे आरोग्य केंद्र असून याठिकाणी २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध असणे गरजेचे आहे. याबाबत स्थानिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.