शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत चारशे डंपर गाळ काढला

By admin | Updated: May 14, 2016 23:38 IST

नीतेश राणेंची भेट, कार्यकर्त्यांचे अभिनंदन : सामाजिक संघटनांच्या माध्यमातून भंगसाळ नदी होतेय मुक्त

कुडाळ : महाराष्ट्र राज्य जलशिवार योजनेतून कुडाळ भंगसाळ नदीचा गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून, याठिकाणी हे काम सामाजिक संघटना एकत्र येऊन करीत आहेत. आमदार नीतेश राणे यांनी या उपक्रमस्थळी भेट देत सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या दोन दिवसात सुमारे ४०० डंपर गाळ काढण्यात आला आहे.गेली अनेक वर्षे कुडाळ भंगसाळ नदीतील गाळ काढण्यात आला नव्हता. त्यामुळे या नदीत गाळाचे डोंगर उभे झाले आहेत. परिणामी नदीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे येथील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत भविष्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी लोकसहभागातून गाळ काढण्याचे ठरविले.या उपक्रमाला राज्य शासनानेही मान्यता दिली. त्यामुळे हा गाळ राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून काढला जात आहे. दरम्यान, या उपक्रमस्थळी जात आमदार नीतेश राणे यांनी पाहणी केली. तसेच हा गाळ काढण्यासाठी एकत्र आलेल्या सर्व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष आबा धडाम तसेच कॉंग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. रणजीत देसाई यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे आमदार राणे यांनी विशेष कौतुक केले. (प्रतिनिधी)पाण्याची पातळी : लाखो लीटरने वाढणारदरम्यान, गाळ काढण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी भंगसाळ नदीच्या पात्राकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याच्या खाली नळपाणी योजनेची पाईप लाईन होती. डंपर वाहतुकीमुळे तिसऱ्या दिवशी ही पाईप लाईन फुटली. त्यामुळे डंपर वाहतूक बंद होती. गाळ असल्यामुळे या ठिकाणची पाणी पातळी कमी होत होती. मात्र, नदीपात्रातील गाळ काढल्याने येथील पाण्याची पातळी लाखो लीटरने वाढणार, हे निश्चित. मोठ्या प्रमाणात गाळया ठिकाणी गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. दोन दिवसांत सुमारे ४०० डंपर गाळ काढण्यात आला. नदीपात्रातील गाळ अनेक वर्षांपासून असल्याने तो मोठ्या प्रमाणात साचला आहे. हा गाळ काढण्यासाठी १५ ते २० दिवस लागतील, असे सद्यस्थितीवरून दिसून येते.