शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

विमा योजनेचे बारा प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: October 21, 2015 21:28 IST

दोन फेटाळले : ११ प्रस्तावांना प्रतीक्षा

सिंधुदुर्गनगरी : शेतकरी जनता अपघात विम्याअंतर्गत या वर्षाअखेर ३७ प्रस्ताव हे विमा कंपनीकडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी १२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, त्यांच्या वारसांना विम्यापोटी मिळणारी प्रत्येकी एक लाख रक्कम अदा करण्यात आली आहे. विमा कंपनीकडे अकरा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, दोन प्रस्ताव कंपनीने फेटाळले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विभागातील तंत्र अधिकारी, सांख्यिकी अरुण नातू यांनी दिली.नैसर्गिक आपत्तीमुळे काही शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तर काहींना अपंगत्व येते. शेती व्यवसाय करताना घरातील कर्त्या व्यक्तीवर ओढवलेल्या अशा संकटांमुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणारी शासनाची शेतकरी जनता अपघात विमा योजना आधार देणारी ठरली आहे.१ नोव्हेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत शेतकरी जनता अपघात विम्याचे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवून त्याला मंजुरी दिली जाते. १ नोव्हेंबर २०१४ ते अद्यापपर्यंत विमा कंपनीकडे शेतकरी जनता अपघात विम्याचे ३७ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी १२ शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी १ लाख याप्रमाणे १२ लाखांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत. तर कंपनीकडे ११ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यांमध्ये ७ प्रस्ताव प्रलंबित तर प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याचे कारण देत दोन प्रस्ताव कंपनीने फेटाळले आहेत. एखादा शेतकरी मृत झाला तर मृत झालेल्या दिवसापासून ९० दिवसांच्या आत शेतकरी जनता अपघात विम्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक, कृषी विभाग यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. क्षेत्रीय स्तरावरील कृषी पर्यवेक्षक यांनी आवश्यक ती कागदपत्रे गोळा करून विम्याचा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाला पाठवणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)शेतकरी विमा : एक लाखाचा धनादेश--शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत सन २०१३-१४ या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ मृत शेतकऱ्यांच्या वारसांना ३८ लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य विमा कंपनीकडून प्राप्त झाले होते. या संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. प्रस्ताव फेटाळलेशेतकरी अपघात विमाअंतर्गत दोन प्रस्ताव फेटाळण्यात आले असून, त्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याचे कारण दाखवण्यात आले आहे.