शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मिठबांवात गाडी जाळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 15, 2017 01:03 IST

अज्ञाताविरोधात गुन्हा : राजकीय वैमनस्यातून प्रकार घडल्याचा आरोप

मिठबाव : देवगड तालुक्यातील मिठबांव येथे भाजप तालुका कार्यकारिणी सदस्य तथा भाजपच्या पंचायत समिती सदस्या संजीवनी बांबुळकर यांचे पती संजय बांबुळकर यांची गाडी जाळण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न करण्यात आला. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वैमनस्यातून आपल्या घातपाताचा हा कट असल्याचा आरोप संजय बांबुळकर यांनी केला.याबाबत घडलेली घटना अशी की, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान या वाहनातून भाजप तालुका कार्यकारिणी सदस्य संजय बांबुळकर, भाजप देवगड तालुका सरचिटणीस श्याम कदम, सुनील पारकर, आदी मिठबांव पेडणेकरवाडी ते हिंदळे वरचीवाडी आणि वरचीवाडी येथून मिठबांव राणेवाडी येथे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी सुनील राणे यांच्या घरी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान आले होते. रात्री साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आणलेल्या वाहनाजवळून आवाज आल्याने नजीकच्या घरातील संतोष राणे यांनी त्याची कल्पना सुनील राणे यांच्या घरी असलेल्या संजय बांबुळकर व इतरांना दिली. घटनास्थळी सर्वजण आले असता वाहनाच्या पुढील चाकाच्या टायरमधून धूर येताना दिसला. स्थानिकांच्या मदतीने टायरवर पाणी मारण्यात आले. रात्रीची वेळ असल्याने या घटनेचे गांभीर्य निदर्शनास आले नाही. सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता वाहनाजवळ पेट्रोलची बाटली, गुटख्याची जळालेली पाकिटे दिसली. मेकॅनिकने येऊन पाहिले असता कोणताही तांत्रिक दोष आढळून आला नाही. तसेच वाहनाजवळील मातीला पेट्रोलचा वास येत होता. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. घटनास्थळी देवगड पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, हेडकॉन्स्टेबल मधुकर पानसरे, शैलेंद्र काकडे, प्रशांत जाधव, सुप्रिया भागवत, मिलिंद परब, विक्रम काकडे यांनी भेट देऊन संबंधितांचे जबाब नोंदवून पंचनामा केला. तसेच अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी सरपंच जयकुमार नारिंग्रेकर, पोलिस पाटील जयवंत मिठबावकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पारकर, सुधीर पारकर, सुनील राणे, आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षकांकडे सरपंचांची नाराजीमिठबांव येथे यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या असून, आतापर्यंत एकाही घटनेचा पोलिसांना शोध लावता आला नाही ही शोकांतिका आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पोलिस ठाणे पडल्याच्या घटनेला अनेक महिने उलटल्यानंतरही पोलिस ठाणे पुन्हा सुरू न झाल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याबद्दल सरपंच जयकुमार नारिंग्रेकर यांनी देवगड पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.