शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

मिठबांवात गाडी जाळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 15, 2017 01:03 IST

अज्ञाताविरोधात गुन्हा : राजकीय वैमनस्यातून प्रकार घडल्याचा आरोप

मिठबाव : देवगड तालुक्यातील मिठबांव येथे भाजप तालुका कार्यकारिणी सदस्य तथा भाजपच्या पंचायत समिती सदस्या संजीवनी बांबुळकर यांचे पती संजय बांबुळकर यांची गाडी जाळण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न करण्यात आला. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वैमनस्यातून आपल्या घातपाताचा हा कट असल्याचा आरोप संजय बांबुळकर यांनी केला.याबाबत घडलेली घटना अशी की, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान या वाहनातून भाजप तालुका कार्यकारिणी सदस्य संजय बांबुळकर, भाजप देवगड तालुका सरचिटणीस श्याम कदम, सुनील पारकर, आदी मिठबांव पेडणेकरवाडी ते हिंदळे वरचीवाडी आणि वरचीवाडी येथून मिठबांव राणेवाडी येथे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी सुनील राणे यांच्या घरी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान आले होते. रात्री साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आणलेल्या वाहनाजवळून आवाज आल्याने नजीकच्या घरातील संतोष राणे यांनी त्याची कल्पना सुनील राणे यांच्या घरी असलेल्या संजय बांबुळकर व इतरांना दिली. घटनास्थळी सर्वजण आले असता वाहनाच्या पुढील चाकाच्या टायरमधून धूर येताना दिसला. स्थानिकांच्या मदतीने टायरवर पाणी मारण्यात आले. रात्रीची वेळ असल्याने या घटनेचे गांभीर्य निदर्शनास आले नाही. सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता वाहनाजवळ पेट्रोलची बाटली, गुटख्याची जळालेली पाकिटे दिसली. मेकॅनिकने येऊन पाहिले असता कोणताही तांत्रिक दोष आढळून आला नाही. तसेच वाहनाजवळील मातीला पेट्रोलचा वास येत होता. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. घटनास्थळी देवगड पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, हेडकॉन्स्टेबल मधुकर पानसरे, शैलेंद्र काकडे, प्रशांत जाधव, सुप्रिया भागवत, मिलिंद परब, विक्रम काकडे यांनी भेट देऊन संबंधितांचे जबाब नोंदवून पंचनामा केला. तसेच अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी सरपंच जयकुमार नारिंग्रेकर, पोलिस पाटील जयवंत मिठबावकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पारकर, सुधीर पारकर, सुनील राणे, आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षकांकडे सरपंचांची नाराजीमिठबांव येथे यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या असून, आतापर्यंत एकाही घटनेचा पोलिसांना शोध लावता आला नाही ही शोकांतिका आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पोलिस ठाणे पडल्याच्या घटनेला अनेक महिने उलटल्यानंतरही पोलिस ठाणे पुन्हा सुरू न झाल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याबद्दल सरपंच जयकुमार नारिंग्रेकर यांनी देवगड पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.