शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे सुधारणांच्या ‘ट्रॅकवर’

By admin | Updated: October 16, 2015 23:23 IST

सुरेश प्रभू : रत्नागिरी स्थानकात सरकत्या जिन्याचे उद्घाटन

रत्नागिरी : गेल्या २५ वर्षांत अडगळीत पडलेली कोकण रेल्वे आता नवनवीन बदल, सुविधांच्या माध्यमातून कात टाकत आहे. स्वप्नवत वाटणारी कोकण रेल्वे २५ वर्षांपूर्वी वास्तवात आली, आता ही वास्तवतासुद्धा अनेक सुधारणांनी काही काळात स्वप्नवत होऊ शकते, इतके चांगले बदल, चांगल्या सुधारणा कोकण रेल्वेमध्ये होऊ घातल्या आहेत. अन्य रेल्वेप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा अधिक सुविधांनी कोकण रेल्वे आपला वेगळा दर्जा सिद्ध करील व कोकण रेल्वेचा आदर्श अन्य रेल्वे घेतील, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण आता कोणीही थांबवू शकणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.रत्नागिरी रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याचे शुक्रवारी प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर कोकण रेल्वे विभागीय कार्यालयाजवळील सौरऊर्जा पार्कचे उद्घाटन झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रभू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश तायल, माजी आमदार बाळ माने, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, आमदार राजन साळवी व उदय सामंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, शिवसेना रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, विधान परिषद सदस्य हुस्नबानू खलिपे, या दोन उद्घाटन कार्यक्रमांप्रमाणेच प्रभू यांनी शुक्रवारी वेरवली व सौंदळ या दोन नवीन रेल्वे स्थानकांचे भूमिपूजनही केले.कोकण रेल्वेला अन्य रेल्वेप्रमाणेच दर्जा व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, अपेक्षित बदलांनुसार प्रलंबित कामे सुरू करण्यात आली आहेत. एस्कलेटर, सौरऊर्जा प्रकल्प, नवी स्थानके हा त्यातीलच भाग आहे. कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण कसे होणार नाही, हे पटवून देण्याचा प्रयत्न काही अधिकाऱ्यांनी केला. हे उत्तर न देता दुपदरीकरण व विद्युतीकरण कसे होईल, याची योजना द्या, असे आदेश आपण दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे दुपदरीकरण व विद्युतीकरणात कोणताही अडथळा येणार नाही, असे प्रभू म्हणाले. रेल्वे ही देशाची आर्थिक रक्तवाहिनी आहे. त्यामुळे रेल्वेबाबत पंतप्रधान मोदी यांना प्रचंड आस्था आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच वर्षांत रेल्वे क्षेत्रात साडेआठ लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. रत्नागिरी स्थानकात सुरू झालेला सरकता जिना हा कोकण रेल्वे मार्गावरील पहिला आहे. तसेच सौर ऊर्जा पार्कही रत्नागिरीतच प्रथम सुरू झाला आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, रत्नागिरी विभागाचे अधिकारी बाळासाहेब निकम यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी) भूमिपूजनाचा एककलमी कार्यक्रम गेल्या काही वर्षांत एखाद्या कामाचे भूमिपूजन झाले की काम संपले. भूमिपूजनाच्या अशा अनेक पाट्या वर्षानुवर्षे पाहायला मिळतात. त्यामुळे जनतेलाही आता त्याची सवय झाली आहे. मात्र केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर जी आश्वासने सरकारने दिली ती पूर्ण केली जात आहेत. कोकण रेल्वेच्या विकासकामांबाबतही भूमिपूजन करून कामे थांबलेली नाहीत, तर ती पूर्ण होत आहेत, असे सांगत त्यांनी अन्य पक्षाच्या नेत्यांना चिमटा काढला. सौर, पवन ऊर्जेवर रेल्वेचा भररत्नागिरीत रेल्वेच्या विभागीय कार्यालयाजवळ उभारलेल्या सौर ऊर्जा पार्कमध्ये ३५० किलोवॅट वीजनिर्मिती होत आहे. ही क्षमता आणखी काही प्रकल्पानंतर वाढेल. संपूर्ण कोकण रेल्वे प्रकल्पच सौर व पवन ऊर्जा निर्मितीतून येत्या काही वर्षांत स्वयंपूर्ण होईल, असे मंत्री प्रभू म्हणाले.