शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची!

By admin | Updated: September 28, 2015 23:33 IST

पर्यटन दिन चर्चासत्र : पर्यटकांसाठी लाईफ जॅकेट सक्तीवर एकमत

मालवण : पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तारकर्ली-देवबागला पहिली पसंती देणाऱ्या पर्यटकांचे उत्साहाच्या भरात आणि सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालेले मृत्यू दुर्दैवी आहेत. शासनस्तरावर पर्यटकांच्या सुरक्षेबाबत उपयोजनाची कार्यवाही प्रस्तावित आहे. तारकर्ली पर्यटन व्यावसायिक संस्थेतर्फे मालवण किनारपट्टीवर देवबाग, तारकर्ली, मालवण, धुरीवाडा, दांडी या परिसरात खासगी जीवरक्षक नियुक्त करून त्यांना संस्थेच्यावतीने पगार देण्यात येईल. तर पर्यटकांना समुद्रस्नान व पर्यटनाचा मनमुराद आनंद किनारपट्टीवर लुटता यावा यासाठी सुरक्षित किनारे ही संकल्पनाही राबवली जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने तारकर्ली पर्यटन व्यावसायिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन चर्चासत्रात सर्वच व्यावसायिकांनी पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले.येथील हॉटेल महाराजा येथे टीटीडीएस संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्राचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी विजय केनवडेकर, गुरू राणे, अविनाश पराडकर, अरविंद मोंडकर, अभय पाटकर, सुरेश मसुरकर, महेश मांजरेकर, रुपेश प्रभू, सचिन गोवेकर, नंदुकमार सावंत, गणेश कुशे, अनंत मयेकर, प्रसन्नकुमार मयेकर, यशोधन पडवळ, अवधूत चव्हाण, महेश सावंत, रुजाय फर्नांडिस, मिथीलेश मिठबावकर, नारायण माडये, बबन शेलटकर, समित कोळगे, पंकज पेडणेकर उपस्थित होते.राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय पर्यटन विकास समिती गठीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, प्रशासनाकडून चलढकलपणा केला जात आहे. ही समिती गठीत झाल्यास त्यात जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था तसेच उद्योजकांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी हे पर्यटन विषयातील पदवीधर असावेत. बदली म्हणून इतर खात्यातील कर्मचारी महामंडळाच्या सेवेत आणू नयेत. जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी अद्यावत संकेत केंद्र निर्माण करावेत. पर्यटन महामंडळाचे प्रकल्प चालविण्याचा ठेका स्थानिक संस्थांनाच देण्यात यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. पर्यटन राज्यमंत्र्यांची मंगळवारी २९ रोजी भेट घेण्यात येणार असल्याचे बाबा मोंडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)खासगी जीवरक्षक नियुक्त करणारतारकर्ली आणि देवबाग येथे गेल्या दीड महिन्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या मृत्यूबाबत गांभिर्याने चर्चा करण्यात आली. लाईफ जॅकेट सक्तीचे करण्यावर एकमत केले.शासनाकडे सुमारे एक हजार लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्याचेही ठरविण्यात आले.देवबाग, तारकर्ली, मालवण, धुरीवाडा, दांडी या परिसरात खासगी जीवरक्षक नियुक्त करून त्यांना संस्थेच्यावतीने पगार देण्यात यावा, असेही सूचविले.