शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी ‘लोकमत’चा आज दशकपूर्ती वर्धापन दिन

By admin | Updated: January 15, 2017 23:18 IST

विशेषकांचे प्रकाशन होणार : सायंकाळी रंगणार स्नेहमेळावा

रत्नागिरी : महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या व वाचकांच्या मनावर अनेक दशकांपासून अधिराज्य गाजवणाऱ्या ‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा ‘दशकपूर्ती’ वर्धापनदिन आज, सोमवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त कोकणात क्रांती घडवून आणणाऱ्या दळणवळण विषयांवरील ‘कोकणचा टर्निंग पॉर्इंट’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन सकाळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. शहरातील आरोग्य मंदिराजवळील ‘लोकमत’ कार्यालयात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांच्या भक्कम पाठबळावर दशकपूर्ती केलेल्या ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी जपत सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व राजकीय, आदी क्षेत्रातील सर्वच विषयांवर सातत्याने विविधांगी अभ्यासपूर्ण लेखन, वृत्तलेखन केले. विविध समस्यांचे कंगोरे उलगडवणारे तज्ज्ञांचे परिसंवाद आयोजित केले. विविध विषयांवरील पुरवण्यांसह जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्याही तितक्याच पोटतिडकीने आणि निर्भीडपणे ‘लोकमत’ने मांडल्या. सामाजिक उपक्रमांतही पुढाकार घेतला. यामुळेच वाचकांच्या मनात लोकमतने आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे.‘लोकमत’ दशकपूर्तीच्या या स्नेहमेळाव्याला अधिकाधिक वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)‘कोकणचा टर्निंग पॉर्इंट’लोकमत’ रत्नागिरी आवृत्तीच्या दशकपूर्ती विशेषांकामध्ये जिल्ह्याच्या विकासाचा राजमार्ग ठरणाऱ्या विविध दळणवळण सुविधांचा धांडोळा घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे १९९८ पासून धावू लागली आणि आज ती जिल्हावासीयांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. कोकण रेल्वेमार्गाचे आता दुपदरीकरण सुरू झाले आहे. डिझेलवर चालणाऱ्या कोकण रेल्वेची विद्युतीकरणाकडे झेप घेण्याची कार्यवाही सुरू आहे. चिपळूण-कऱ्हाड नवीन मार्ग मंजूर झाला आहे. जयगड-डिंगणी मालवाहतूक मार्ग होत आहे. अत्याधुनिक सुविधांचा कोकण रेल्वेमध्ये बहर आला आहे. कोकण रेल्वेचे विविध पैलू मांडणारे विषय या पुरवणीत प्रसिद्ध झाले आहेत. जिल्ह्यात रस्ते वाहतूक अत्यंत महत्त्वाची आहेच. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि व रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्ग रूंदीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे. जिल्ह्याला जलवाहतूक व विमान वाहतुकीचे वेध लागले आहेत. या सर्व दळणवळण क्रांतीमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला हातभार लागणार आहेच, शिवाय पर्यटन व्यवसायालाही चालना मिळणार आहे.यासारख्या विविध विषयांचा विशेषांकात समावेश आहे.