शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

रत्नागिरी ‘लोकमत’चा आज दशकपूर्ती वर्धापन दिन

By admin | Updated: January 15, 2017 23:18 IST

विशेषकांचे प्रकाशन होणार : सायंकाळी रंगणार स्नेहमेळावा

रत्नागिरी : महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या व वाचकांच्या मनावर अनेक दशकांपासून अधिराज्य गाजवणाऱ्या ‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा ‘दशकपूर्ती’ वर्धापनदिन आज, सोमवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त कोकणात क्रांती घडवून आणणाऱ्या दळणवळण विषयांवरील ‘कोकणचा टर्निंग पॉर्इंट’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन सकाळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. शहरातील आरोग्य मंदिराजवळील ‘लोकमत’ कार्यालयात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांच्या भक्कम पाठबळावर दशकपूर्ती केलेल्या ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी जपत सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व राजकीय, आदी क्षेत्रातील सर्वच विषयांवर सातत्याने विविधांगी अभ्यासपूर्ण लेखन, वृत्तलेखन केले. विविध समस्यांचे कंगोरे उलगडवणारे तज्ज्ञांचे परिसंवाद आयोजित केले. विविध विषयांवरील पुरवण्यांसह जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्याही तितक्याच पोटतिडकीने आणि निर्भीडपणे ‘लोकमत’ने मांडल्या. सामाजिक उपक्रमांतही पुढाकार घेतला. यामुळेच वाचकांच्या मनात लोकमतने आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे.‘लोकमत’ दशकपूर्तीच्या या स्नेहमेळाव्याला अधिकाधिक वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)‘कोकणचा टर्निंग पॉर्इंट’लोकमत’ रत्नागिरी आवृत्तीच्या दशकपूर्ती विशेषांकामध्ये जिल्ह्याच्या विकासाचा राजमार्ग ठरणाऱ्या विविध दळणवळण सुविधांचा धांडोळा घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे १९९८ पासून धावू लागली आणि आज ती जिल्हावासीयांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. कोकण रेल्वेमार्गाचे आता दुपदरीकरण सुरू झाले आहे. डिझेलवर चालणाऱ्या कोकण रेल्वेची विद्युतीकरणाकडे झेप घेण्याची कार्यवाही सुरू आहे. चिपळूण-कऱ्हाड नवीन मार्ग मंजूर झाला आहे. जयगड-डिंगणी मालवाहतूक मार्ग होत आहे. अत्याधुनिक सुविधांचा कोकण रेल्वेमध्ये बहर आला आहे. कोकण रेल्वेचे विविध पैलू मांडणारे विषय या पुरवणीत प्रसिद्ध झाले आहेत. जिल्ह्यात रस्ते वाहतूक अत्यंत महत्त्वाची आहेच. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि व रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्ग रूंदीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे. जिल्ह्याला जलवाहतूक व विमान वाहतुकीचे वेध लागले आहेत. या सर्व दळणवळण क्रांतीमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला हातभार लागणार आहेच, शिवाय पर्यटन व्यवसायालाही चालना मिळणार आहे.यासारख्या विविध विषयांचा विशेषांकात समावेश आहे.