शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

रत्नागिरी ‘लोकमत’चा आज दशकपूर्ती वर्धापन दिन

By admin | Updated: January 15, 2017 23:18 IST

विशेषकांचे प्रकाशन होणार : सायंकाळी रंगणार स्नेहमेळावा

रत्नागिरी : महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या व वाचकांच्या मनावर अनेक दशकांपासून अधिराज्य गाजवणाऱ्या ‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा ‘दशकपूर्ती’ वर्धापनदिन आज, सोमवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त कोकणात क्रांती घडवून आणणाऱ्या दळणवळण विषयांवरील ‘कोकणचा टर्निंग पॉर्इंट’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन सकाळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. शहरातील आरोग्य मंदिराजवळील ‘लोकमत’ कार्यालयात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांच्या भक्कम पाठबळावर दशकपूर्ती केलेल्या ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी जपत सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व राजकीय, आदी क्षेत्रातील सर्वच विषयांवर सातत्याने विविधांगी अभ्यासपूर्ण लेखन, वृत्तलेखन केले. विविध समस्यांचे कंगोरे उलगडवणारे तज्ज्ञांचे परिसंवाद आयोजित केले. विविध विषयांवरील पुरवण्यांसह जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्याही तितक्याच पोटतिडकीने आणि निर्भीडपणे ‘लोकमत’ने मांडल्या. सामाजिक उपक्रमांतही पुढाकार घेतला. यामुळेच वाचकांच्या मनात लोकमतने आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे.‘लोकमत’ दशकपूर्तीच्या या स्नेहमेळाव्याला अधिकाधिक वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)‘कोकणचा टर्निंग पॉर्इंट’लोकमत’ रत्नागिरी आवृत्तीच्या दशकपूर्ती विशेषांकामध्ये जिल्ह्याच्या विकासाचा राजमार्ग ठरणाऱ्या विविध दळणवळण सुविधांचा धांडोळा घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे १९९८ पासून धावू लागली आणि आज ती जिल्हावासीयांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. कोकण रेल्वेमार्गाचे आता दुपदरीकरण सुरू झाले आहे. डिझेलवर चालणाऱ्या कोकण रेल्वेची विद्युतीकरणाकडे झेप घेण्याची कार्यवाही सुरू आहे. चिपळूण-कऱ्हाड नवीन मार्ग मंजूर झाला आहे. जयगड-डिंगणी मालवाहतूक मार्ग होत आहे. अत्याधुनिक सुविधांचा कोकण रेल्वेमध्ये बहर आला आहे. कोकण रेल्वेचे विविध पैलू मांडणारे विषय या पुरवणीत प्रसिद्ध झाले आहेत. जिल्ह्यात रस्ते वाहतूक अत्यंत महत्त्वाची आहेच. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि व रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्ग रूंदीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे. जिल्ह्याला जलवाहतूक व विमान वाहतुकीचे वेध लागले आहेत. या सर्व दळणवळण क्रांतीमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला हातभार लागणार आहेच, शिवाय पर्यटन व्यवसायालाही चालना मिळणार आहे.यासारख्या विविध विषयांचा विशेषांकात समावेश आहे.