शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

पाण्यासाठी आज हंडा मोर्चाचा निनाद

By admin | Updated: April 2, 2015 00:42 IST

रत्नागिरी गॅस : अंजनवेल ग्रामस्थ आक्रमक

गुहागर : अंजनवेल गावामध्ये ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांनी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करुनही कंपनी प्रशासनाने आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नाकारल्याने अखेर गुरुवारी कंपनी गेटसमोर अंजनवेलवासीयांतर्फे हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अंजनवेल सरपंच यशवंत बाईत यांनी दिली.रत्नागिरी गॅस प्रकल्पामुळे म्हणजेच पूर्वीच्या दाभोळ वीज प्रकल्पामुळे अंजनवेल गावातील विहिरी दुषित झाल्या आहेत. एकमेव ग्रामपंचायत नळपाणी योजनेच्या विहिरीतून पाणीसाठा होतो. एप्रिल - मे मध्ये हा पाणीसाठा पातळी खाली गेल्याने नियमित पाणीपुरवठा होत नाही. दरवर्षी रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने लेखी पत्र देऊनही दुर्लक्ष केले गेल्याने दोनवेळा तहसीलदार वैशाली पाटील व प्रकल्पाचे अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची आर्थिक स्थिती बिकट आहे, तसेच चिपळूण शिरळ येथून होणारा पाणीपुरवठाही कमी होत असल्याचे सांगत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नाकारले होते. यानंतर अंजनवेलवासियांनी ग्रामपंचायतीकडे दाद मागितल्यानंतर प्रकल्पासमोर हंडा मोर्चा काढण्याचे पत्र देण्यात आले. यावर तहसीलदार वैशाली पाटील यांनी प्रकल्पातील अधिकारी कौल यांच्याशी चर्चा करुन तोडा काढण्याचा प्रयत्न केला. पण याला यश आले नाही. अखेर अंजनवेलवासियांनी पाण्यासाठी प्रकल्प गेटसमोर गुरुवारी हंडा मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)पाणीटंचाईची भीषणतायाबाबत अंजनवेल सरपंच यशवंत बाईत यांनी सांगितले की, चार ते पाच दिवसांनी नळपाणी योजनेतून अत्यल्प पाणीपुरवठा सध्या चालत असून एप्रिल महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने अखेर हंडा मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले. या गावाचा पाणीटंचाई आराखड्यात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात जायचं कुठे? असा सवाल त्यांनी केला.