शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आज हंडा मोर्चाचा निनाद

By admin | Updated: April 2, 2015 00:42 IST

रत्नागिरी गॅस : अंजनवेल ग्रामस्थ आक्रमक

गुहागर : अंजनवेल गावामध्ये ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांनी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करुनही कंपनी प्रशासनाने आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नाकारल्याने अखेर गुरुवारी कंपनी गेटसमोर अंजनवेलवासीयांतर्फे हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अंजनवेल सरपंच यशवंत बाईत यांनी दिली.रत्नागिरी गॅस प्रकल्पामुळे म्हणजेच पूर्वीच्या दाभोळ वीज प्रकल्पामुळे अंजनवेल गावातील विहिरी दुषित झाल्या आहेत. एकमेव ग्रामपंचायत नळपाणी योजनेच्या विहिरीतून पाणीसाठा होतो. एप्रिल - मे मध्ये हा पाणीसाठा पातळी खाली गेल्याने नियमित पाणीपुरवठा होत नाही. दरवर्षी रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने लेखी पत्र देऊनही दुर्लक्ष केले गेल्याने दोनवेळा तहसीलदार वैशाली पाटील व प्रकल्पाचे अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची आर्थिक स्थिती बिकट आहे, तसेच चिपळूण शिरळ येथून होणारा पाणीपुरवठाही कमी होत असल्याचे सांगत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नाकारले होते. यानंतर अंजनवेलवासियांनी ग्रामपंचायतीकडे दाद मागितल्यानंतर प्रकल्पासमोर हंडा मोर्चा काढण्याचे पत्र देण्यात आले. यावर तहसीलदार वैशाली पाटील यांनी प्रकल्पातील अधिकारी कौल यांच्याशी चर्चा करुन तोडा काढण्याचा प्रयत्न केला. पण याला यश आले नाही. अखेर अंजनवेलवासियांनी पाण्यासाठी प्रकल्प गेटसमोर गुरुवारी हंडा मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)पाणीटंचाईची भीषणतायाबाबत अंजनवेल सरपंच यशवंत बाईत यांनी सांगितले की, चार ते पाच दिवसांनी नळपाणी योजनेतून अत्यल्प पाणीपुरवठा सध्या चालत असून एप्रिल महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने अखेर हंडा मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले. या गावाचा पाणीटंचाई आराखड्यात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात जायचं कुठे? असा सवाल त्यांनी केला.