शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

पाण्यासाठी आज हंडा मोर्चाचा निनाद

By admin | Updated: April 2, 2015 00:42 IST

रत्नागिरी गॅस : अंजनवेल ग्रामस्थ आक्रमक

गुहागर : अंजनवेल गावामध्ये ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांनी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करुनही कंपनी प्रशासनाने आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नाकारल्याने अखेर गुरुवारी कंपनी गेटसमोर अंजनवेलवासीयांतर्फे हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अंजनवेल सरपंच यशवंत बाईत यांनी दिली.रत्नागिरी गॅस प्रकल्पामुळे म्हणजेच पूर्वीच्या दाभोळ वीज प्रकल्पामुळे अंजनवेल गावातील विहिरी दुषित झाल्या आहेत. एकमेव ग्रामपंचायत नळपाणी योजनेच्या विहिरीतून पाणीसाठा होतो. एप्रिल - मे मध्ये हा पाणीसाठा पातळी खाली गेल्याने नियमित पाणीपुरवठा होत नाही. दरवर्षी रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने लेखी पत्र देऊनही दुर्लक्ष केले गेल्याने दोनवेळा तहसीलदार वैशाली पाटील व प्रकल्पाचे अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची आर्थिक स्थिती बिकट आहे, तसेच चिपळूण शिरळ येथून होणारा पाणीपुरवठाही कमी होत असल्याचे सांगत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नाकारले होते. यानंतर अंजनवेलवासियांनी ग्रामपंचायतीकडे दाद मागितल्यानंतर प्रकल्पासमोर हंडा मोर्चा काढण्याचे पत्र देण्यात आले. यावर तहसीलदार वैशाली पाटील यांनी प्रकल्पातील अधिकारी कौल यांच्याशी चर्चा करुन तोडा काढण्याचा प्रयत्न केला. पण याला यश आले नाही. अखेर अंजनवेलवासियांनी पाण्यासाठी प्रकल्प गेटसमोर गुरुवारी हंडा मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)पाणीटंचाईची भीषणतायाबाबत अंजनवेल सरपंच यशवंत बाईत यांनी सांगितले की, चार ते पाच दिवसांनी नळपाणी योजनेतून अत्यल्प पाणीपुरवठा सध्या चालत असून एप्रिल महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने अखेर हंडा मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले. या गावाचा पाणीटंचाई आराखड्यात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात जायचं कुठे? असा सवाल त्यांनी केला.