शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

पाण्यासाठी आज हंडा मोर्चाचा निनाद

By admin | Updated: April 2, 2015 00:42 IST

रत्नागिरी गॅस : अंजनवेल ग्रामस्थ आक्रमक

गुहागर : अंजनवेल गावामध्ये ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांनी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करुनही कंपनी प्रशासनाने आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नाकारल्याने अखेर गुरुवारी कंपनी गेटसमोर अंजनवेलवासीयांतर्फे हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अंजनवेल सरपंच यशवंत बाईत यांनी दिली.रत्नागिरी गॅस प्रकल्पामुळे म्हणजेच पूर्वीच्या दाभोळ वीज प्रकल्पामुळे अंजनवेल गावातील विहिरी दुषित झाल्या आहेत. एकमेव ग्रामपंचायत नळपाणी योजनेच्या विहिरीतून पाणीसाठा होतो. एप्रिल - मे मध्ये हा पाणीसाठा पातळी खाली गेल्याने नियमित पाणीपुरवठा होत नाही. दरवर्षी रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने लेखी पत्र देऊनही दुर्लक्ष केले गेल्याने दोनवेळा तहसीलदार वैशाली पाटील व प्रकल्पाचे अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची आर्थिक स्थिती बिकट आहे, तसेच चिपळूण शिरळ येथून होणारा पाणीपुरवठाही कमी होत असल्याचे सांगत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नाकारले होते. यानंतर अंजनवेलवासियांनी ग्रामपंचायतीकडे दाद मागितल्यानंतर प्रकल्पासमोर हंडा मोर्चा काढण्याचे पत्र देण्यात आले. यावर तहसीलदार वैशाली पाटील यांनी प्रकल्पातील अधिकारी कौल यांच्याशी चर्चा करुन तोडा काढण्याचा प्रयत्न केला. पण याला यश आले नाही. अखेर अंजनवेलवासियांनी पाण्यासाठी प्रकल्प गेटसमोर गुरुवारी हंडा मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)पाणीटंचाईची भीषणतायाबाबत अंजनवेल सरपंच यशवंत बाईत यांनी सांगितले की, चार ते पाच दिवसांनी नळपाणी योजनेतून अत्यल्प पाणीपुरवठा सध्या चालत असून एप्रिल महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने अखेर हंडा मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले. या गावाचा पाणीटंचाई आराखड्यात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात जायचं कुठे? असा सवाल त्यांनी केला.