शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

यंदाही आमदार विरोधी पक्षाचाच

By admin | Updated: November 16, 2014 23:53 IST

राजापूर मतदारसंघ : राजकीय स्थिती कायम

राजापूर : राज्याच्या सत्तेत भाजप समवेत न जाता विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने राजापूरचा आमदार सत्ताधारी पक्षाचा नाही, हे मागील काही वर्षे चालत आलेले समीकरण पुढे सरकले आहे. त्यामुळे त्याच्या इथल्या विकास कामांवर कितपत परिणाम होईल, अशा शंकांना सुरवात झाली आहे. सर्वसाधारणपणे राजापूरचा आमदार हा सत्ताविरोधी असतो. हे समीकरण मागील अनेक वर्षांपासून चालत आले आहे. किरकोळ अपवादातच राजापूरचा आमदार हा सत्ताधारी गटाचा होता. अन्यथा राजापूरच्या मतदारांनी बऱ्याचवेळा आपला कौल सत्तेच्या विरोधात दिला होता. यावेळी तशी संधी चालून आली होती. केंद्रात भाजपाप्रणित एनडीएचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिवसेनादेखील केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाली. त्यावेळी राज्यात महायुतीला तब्बल ४२ लोकसभेच्या जागा मिळाल्याने तत्कालीन कार्यरत असलेल्या आघाडी सरकारची गच्छंती अटळ होती, मात्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीत जागावाटप व मुख्यमंत्री पदावरुन युती विस्कटली व सेना भाजपा स्वतंत्र लढले. त्यानंतर भाजपा हा सर्वाधिक १२२ जागा मिळवून पहिला पक्ष ठरला. त्या पाठोपाठ सत्तेने ६५ जागा मिळवित दुसरा पक्ष ठरला होता. हिंदुत्व या मुद्यावरुन मागील २५ वर्षे युती करत लढणारे हे दोन्ही पक्षजरी स्वतंत्र लढले असले तरी निकालानंतर सत्तेसाठी एकत्र येतील, अशी सर्वांना आशा होती, तथापी सत्तेतील वाटा किती प्रमाणात मिळावा, या मुद्द््यावरुन बिनसल्याने शिवसेनेने विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्तेत शिवसेना दिसणार नाही, परिणामी राजापूरमधून सेनेचे निवडून गेलेले आमदार राजन साळवी यावेळीही विरोधी बाकाचेच आमदार असतील, असे निदान आजचे जरी चित्र आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील पाच वर्षे राजापूरच्या विकासावर कितपत होईल, याबाबतच्या शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. राजापूर मतदार संघातील आमदार सत्तेतील नसल्याने विकासावर कमालीचा परिणाम झाला आहे. मागील पाच वर्षांत इथले रखडलेले धरण प्रकल्पांना समाधानकारक निधी नसल्याने त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. शहराला भेडसावणारे नदी पात्रातील गाळ उपशाचे काम अर्धवट आहे. रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी मंजूर झालेली लघु औद्योगिक वसाहत कागदावरच आहे. आरोग्य यंत्रणा तर व्हेंटीलेटरवर आहे. शिक्षणाचे तीनतेरा वाजलेत. मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था फारच नाजूक आहे. पर्यटनाला उपयुक्त अशी नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही पर्यटनाला इथे फारशी संधी लाभलेली नाही, अशा अनेक समस्या आजही कायम आहेत. सत्तेत समावेश नसल्यानेच विकासाची गंगा इथे समाधानकारकपणे वाहत नाही, हेच विदारक दर्शविणारे चित्र राहिल्याने आगामी पाच वर्षांच्या कालखंडात यामध्ये फरक जाणवेल, अशी आशा होती. सेनेने सत्तेत न जाता विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्याने राजापूरच्या नशिबी परवड येण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)विरोधी पक्षाचे बाक....गेल्या कित्येक वर्षात राजापूरला सत्तेपासून दूर रहावे लागल्याचे अनेकवेळा घडले आहे. यंदाची निवडणूक व त्यानंतरचा निकाल लागल्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी न झाल्याने आमदार राजन साळवी यांना विरोधी बाकावरच बसावे लागणार आहे. यापूर्वी दोन निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने लढविली व राज्यात आघाडीची सत्ता आली. आता त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. मात्र राज्यात भाजप व शिवसेना युती होईल असे वाटत असतानाच त्या दोघांमध्येही काडीमोड झाला व त्यातून पुन्हा साळवी यांना मंत्रीपदाची लॉटरी लागेल असे वाटत असतानाच पुन्हा युतीत काडीमोड झाल्याने राजापुूरच्या नशिबी पुन्हा विरोधी बाकच आले आहे.