शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
4
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
5
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
6
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
7
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
8
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
9
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
10
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
11
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
12
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
13
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
14
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
15
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
16
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
17
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
18
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
19
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
20
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...

यंदाही आमदार विरोधी पक्षाचाच

By admin | Updated: November 16, 2014 23:53 IST

राजापूर मतदारसंघ : राजकीय स्थिती कायम

राजापूर : राज्याच्या सत्तेत भाजप समवेत न जाता विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने राजापूरचा आमदार सत्ताधारी पक्षाचा नाही, हे मागील काही वर्षे चालत आलेले समीकरण पुढे सरकले आहे. त्यामुळे त्याच्या इथल्या विकास कामांवर कितपत परिणाम होईल, अशा शंकांना सुरवात झाली आहे. सर्वसाधारणपणे राजापूरचा आमदार हा सत्ताविरोधी असतो. हे समीकरण मागील अनेक वर्षांपासून चालत आले आहे. किरकोळ अपवादातच राजापूरचा आमदार हा सत्ताधारी गटाचा होता. अन्यथा राजापूरच्या मतदारांनी बऱ्याचवेळा आपला कौल सत्तेच्या विरोधात दिला होता. यावेळी तशी संधी चालून आली होती. केंद्रात भाजपाप्रणित एनडीएचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिवसेनादेखील केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाली. त्यावेळी राज्यात महायुतीला तब्बल ४२ लोकसभेच्या जागा मिळाल्याने तत्कालीन कार्यरत असलेल्या आघाडी सरकारची गच्छंती अटळ होती, मात्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीत जागावाटप व मुख्यमंत्री पदावरुन युती विस्कटली व सेना भाजपा स्वतंत्र लढले. त्यानंतर भाजपा हा सर्वाधिक १२२ जागा मिळवून पहिला पक्ष ठरला. त्या पाठोपाठ सत्तेने ६५ जागा मिळवित दुसरा पक्ष ठरला होता. हिंदुत्व या मुद्यावरुन मागील २५ वर्षे युती करत लढणारे हे दोन्ही पक्षजरी स्वतंत्र लढले असले तरी निकालानंतर सत्तेसाठी एकत्र येतील, अशी सर्वांना आशा होती, तथापी सत्तेतील वाटा किती प्रमाणात मिळावा, या मुद्द््यावरुन बिनसल्याने शिवसेनेने विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्तेत शिवसेना दिसणार नाही, परिणामी राजापूरमधून सेनेचे निवडून गेलेले आमदार राजन साळवी यावेळीही विरोधी बाकाचेच आमदार असतील, असे निदान आजचे जरी चित्र आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील पाच वर्षे राजापूरच्या विकासावर कितपत होईल, याबाबतच्या शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. राजापूर मतदार संघातील आमदार सत्तेतील नसल्याने विकासावर कमालीचा परिणाम झाला आहे. मागील पाच वर्षांत इथले रखडलेले धरण प्रकल्पांना समाधानकारक निधी नसल्याने त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. शहराला भेडसावणारे नदी पात्रातील गाळ उपशाचे काम अर्धवट आहे. रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी मंजूर झालेली लघु औद्योगिक वसाहत कागदावरच आहे. आरोग्य यंत्रणा तर व्हेंटीलेटरवर आहे. शिक्षणाचे तीनतेरा वाजलेत. मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था फारच नाजूक आहे. पर्यटनाला उपयुक्त अशी नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही पर्यटनाला इथे फारशी संधी लाभलेली नाही, अशा अनेक समस्या आजही कायम आहेत. सत्तेत समावेश नसल्यानेच विकासाची गंगा इथे समाधानकारकपणे वाहत नाही, हेच विदारक दर्शविणारे चित्र राहिल्याने आगामी पाच वर्षांच्या कालखंडात यामध्ये फरक जाणवेल, अशी आशा होती. सेनेने सत्तेत न जाता विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्याने राजापूरच्या नशिबी परवड येण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)विरोधी पक्षाचे बाक....गेल्या कित्येक वर्षात राजापूरला सत्तेपासून दूर रहावे लागल्याचे अनेकवेळा घडले आहे. यंदाची निवडणूक व त्यानंतरचा निकाल लागल्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी न झाल्याने आमदार राजन साळवी यांना विरोधी बाकावरच बसावे लागणार आहे. यापूर्वी दोन निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने लढविली व राज्यात आघाडीची सत्ता आली. आता त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. मात्र राज्यात भाजप व शिवसेना युती होईल असे वाटत असतानाच त्या दोघांमध्येही काडीमोड झाला व त्यातून पुन्हा साळवी यांना मंत्रीपदाची लॉटरी लागेल असे वाटत असतानाच पुन्हा युतीत काडीमोड झाल्याने राजापुूरच्या नशिबी पुन्हा विरोधी बाकच आले आहे.