शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

तिलारीचा पोटकालवा फुटला

By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST

सदोष बांधकाम : शेतविहीर कोसळली; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

वैभव साळकर / दोडामार्ग तिलारी प्रकल्पाचा पोटकालवा सदोष बांधकामामुळे शुक्रवारी रात्री फुटला. ही घटना कसई दोडामार्ग केळीचे टेंब येथे घडली. कालव्याचे पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जनार्दन लक्ष्मण कुबल यांची बांधकाम केलेली शेतविहीर कोसळली. त्यामुुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, याबाबत तिलारी प्रकल्पाचे कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांच्याशी संपर्क साधला असता, पोटकालव्याला पाणी सोडल्याची आपणास कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे कालवा विभागातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, त्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या संयुक्त विद्यमाने तिलारी प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पाचे पाणी गोव्यात नेण्यासाठी डावा आणि उजवा असे दोन कालवे खोदण्यात आले आहेत. या दोन्ही कालव्यांवर पोटकालवे काढून तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न तिलारी प्रकल्पाच्या कालवा विभागाने केला. मात्र, काही वर्षांत कालव्यां-बरोबरच पोटकालवे फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. कालव्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. मात्र, कालवा विभाग या सर्व प्रकारांमधून काहीही अर्थबोध घेताना दिसत नाही. कारण असाच प्रकार पुन्हा एकदा शुक्रवारी रात्री कसई केळीचे टेंब येथे घडला. दोडामार्ग शहराला लागूनच तिलारी प्रकल्पाचा डावा कालवा गेला असून, या डाव्या कालव्यावर पोटकालवा काढण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिउंची असल्याने त्याठिकाणी सिमेंटचे अर्धगोलाकार पाईप टाकून कालव्याचे बांधकाम केले आहे. मात्र, सदोष पध्दत आणि नियोजनाचा अभाव राहिल्याने हा कालवा शुक्रवारी रात्री फुटला आणि कालव्यातील पाणी जनार्दन लक्ष्मण कुबल या शेतकऱ्याच्या भातशेतीत घुसले. पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांची शेतविहीर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. कालवा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका मात्र कुबल यांना बसला असून, शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कालवा विभाग अनभिज्ञ? या संपूर्ण प्रकारापासून कालवा विभाग अनभिज्ञ आहे. पोटकालव्याला पाणी सोडल्याची माहिती आपल्याला नसल्याचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. त्यामुळे कालव्याला पाणी सोडले तरी कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.