शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

तिलारी धरणग्रस्त संघर्ष समितीत फूट

By admin | Updated: August 28, 2014 22:24 IST

संजय नाईक : कामात हलगर्जीपणाची टीका

दोडामार्ग : तिलारी धरणग्रस्त बेरोजगार संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत गवस हे आपल्या कामात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप समितीचे सचिव संजय नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. समीतीतील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही पत्रकातून नाईक यांनी केली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या या समितीतच आता फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोडामार्ग तालुुक्यातील तिलारी धरणबाधित गावातील दाखलाधारकांस घरटी नोकरी देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. याची अंमलबजावणी न झाल्यामुळे या भागातील प्रकल्पबाधित बांधवानी एकत्र येत संघर्ष समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी गेल्या काही वर्षांपासून शशिकांत गणपत गवस आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली दोन ते तीन वेळा मोठी आंदोलने करण्यात आली. शासनस्तरावरून या आंदोलनांची दखलही घेण्यात आली. यात महत्त्वाचे म्हणजे गत महिन्यात तिलारी येथे झालेल्या आंदोलनानंतर धरणग्रस्तांचा वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत प्रत्येक दाखलाधारकास पाच लाख रुपये देण्याचे ठरविण्यातही आले. या सर्वाचा अध्यादेश काढण्यासाठी अध्यक्षांनी मुंबई येथे जाणे आवश्यक होते. तरच १९ आॅगस्टपूर्वी हा अध्यादेश मिळण्याची व चतुर्थीपूर्वी रक्कम मिळण्याची आशा होती. मात्र, या सर्व प्रक्रियेत अध्यक्ष शशिकांत गवस हे निष्काळजीपणे वागले, असा आरोप सचिव नाईक यांनी केला आहे. संघटना कुणा एकट्यावर चालत नाही. याचा विचारही त्यांनी करावा, असे नाईक यांनी म्हटले आहे.आपण या भूमिकेपर्यंत पोहोचण्यासाठी धरणग्रस्तांच्या भावना कारणीभूत आहेत. प्रत्येक धरणग्रस्ताला उत्तर देताना तोंडघशी पडल्यासारखे होत आहे. या सर्व प्रकारात समितीच्या अध्यक्षांचा दोष आहे, असा आरोप करून राजीनाम्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)