शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तिलारी धरण परिसर महिनाभर अंधारात

By admin | Updated: October 20, 2014 22:31 IST

सुरक्षा रक्षक व कर्मचारी यांना अंधारात फिरावे लागत असून अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षाबाबत संताप

साटेली भेडशी : महाराष्ट्र, गोवा या दोन राज्यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या तिलारी धरणाच्या पाण्यावर तसेच तेरवण मेढे धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती करून ही वीज स्थानिक गावांसह गोवा राज्याला वितरीत केली जात असताना तिलारी धरणाच्या परिसरात लावण्यात आलेली लाईटस् गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्यावेळी तिलारी धरणाच्या परिसरात नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षक व कर्मचारी यांना अंधारात फिरावे लागत असून अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त होत आहे. तिलारी प्रकल्पांतर्गत कार्यकारी अभियंता शिर्षकामे विभाग १ कोनाळकट्टा यांच्यामार्फत तिलारी धरण क्षेत्रावर तसेच कोनाळ येथील खळग्यातील धरण या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून लाईटची व्यवस्था करून साठ ते सत्तर ठिकाणी विजेचे खांब उभे करून त्यावर हजार रुपये किमतीचा एक बल्ब याप्रमाणे हलक्या दर्जाचे बल्ब बसविण्यात आले आहेत. हे बल्ब गेल्या दोन महिन्यांपासून बंदावस्थेत आहेत. तेथील एक ट्रान्सफार्मर जळालेला आहे. तिलारी धरणाचा परिसर गेल्या दोन महिन्यांपासून अंधारात आहे. रात्रीच्यावेळी धरणाच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था अत्यंत आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जंगलमय अशा भागातील जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे सुरक्षा रक्षकांना फिरणेही अवघड झाले आहे. ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील याकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)