शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तीस लाखांची थकबाकी

By admin | Updated: February 8, 2016 23:50 IST

कृषी संजीवनी योजना : कोकण परिमंडल; वसुलीसाठी शेतकऱ्यांना पत्र

रत्नागिरी : कृषी संजीवनी योजनेंतर्गत कोकण परिमंडलातील एकूण १५८७ शेतकऱ्यांकडे ३० लाख ४७ हजार ७१६ रूपयांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांच्याकडील वीज देयकांची थकबाकी वसूल करण्यासाठी ‘कृषी संजीवनी योजना २०१४’ राबविण्यात आली होती. या योजनेला गतवर्षी मुदतवाढही देण्यात आली होती. यावर्षीही ३१ मार्च २०१६पर्यंत शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.मुदतवाढीमुळे योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कृषी ग्राहकांनी ३१ मार्च २०१४च्या मूळ रक्कमेच्या ५० टक्के थकीत रक्कम ३१ मार्च २०१६पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के मूळ थकीत रक्कम महाराष्ट्र शासनाकडून महावितरणला अनुदान स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे ३१ मार्च २०१४ रोजी थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड हे महावितरण कंपनीतर्फे माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१४ नंतर वितरीत करण्यात आलेल्या चालू वीज देयकांचा भरणा करणे योजनेत सहभागी होणाऱ्या कृषी ग्राहकांना क्रमप्राप्त आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ८०१ वीज थकबाकीदार असून, त्यांच्याकडे २१ लाख ४७ हजार २०४ रुपयांची थकबाकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८६ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे ९ लाख ५११ रुपयांची थकबाकी आहे. तर कोकण परिमंडलात विलंब शुल्क दंडासह ३ लाख ९५ हजार १५५ रुपये इतकी थकबाकी रक्कम आहे. पैकी रत्नागिरी जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ५३५ रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख २५ हजार ६२० रुपये इतकी विलंब शुल्क दंडासह थकबाकी आहे. शासनाकडून १९ लाख १९ हजार १७ रुपयांचे अनुदान यासाठी उपलब्ध होणार आहे.‘कृषी संजीवनी योजना २०१४’ ही तात्पुरत्या व कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना तसेच उपसा जलसिंचन योजनांना लागू राहणार आहे. कृषी ग्राहकांना वीजबिल भरण्यासंबंधी सुलभ हप्ते आवश्यक असल्यास ग्राहकांच्या विनंतीनुसार मार्च २०१६ अखेर सर्व रक्कम वसूल होईल, अशा रितीने समान मासिक हप्ते देण्यात येणार आहेत. संबंधित योजना तात्पुरत्या व कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना तसेच उपसा जलसिंचन योजनांना लागू राहील. (प्रतिनिधी)नियमानुसार कार्यवाही : अन्यथा योजनेकरिता कृषी ग्राहक अपात्रमात्र, या योजनेत भाग न घेणाऱ्या व योजनेंतर्गत ठरविण्यात आलेल्या रकमेचा भरणा केला नाही, तर अशा कृषी ग्राहकांना योजनेकरिता अपात्र ठरविण्यात येणार आहे. तसेच नियमाप्रमाणे व्याज व दंडासह पूर्ण रक्कम ग्राहकांच्या खात्यात दाखवली जाणार आहे. तसेच विद्युत कायदा २००३ नुसार थकबाकी वसुलीकरिता नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.गतवर्षी कृषी संजीवनी योजनेसाठी मुदत दिली होती.रत्नागिरी जिल्ह्यात ८०१ वीज थकबाकीदार आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८६ वीज थकबाकीदार आहेत.ग्राहकांना लाभमहावितरणकडून ग्राहकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे या योजनांचा ग्राहकांना लाभ घेता येत आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांची संख्या महावितरणकडे वाढताना दिसत आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.