शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

तीस लाखांची थकबाकी

By admin | Updated: February 8, 2016 23:50 IST

कृषी संजीवनी योजना : कोकण परिमंडल; वसुलीसाठी शेतकऱ्यांना पत्र

रत्नागिरी : कृषी संजीवनी योजनेंतर्गत कोकण परिमंडलातील एकूण १५८७ शेतकऱ्यांकडे ३० लाख ४७ हजार ७१६ रूपयांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांच्याकडील वीज देयकांची थकबाकी वसूल करण्यासाठी ‘कृषी संजीवनी योजना २०१४’ राबविण्यात आली होती. या योजनेला गतवर्षी मुदतवाढही देण्यात आली होती. यावर्षीही ३१ मार्च २०१६पर्यंत शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.मुदतवाढीमुळे योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कृषी ग्राहकांनी ३१ मार्च २०१४च्या मूळ रक्कमेच्या ५० टक्के थकीत रक्कम ३१ मार्च २०१६पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के मूळ थकीत रक्कम महाराष्ट्र शासनाकडून महावितरणला अनुदान स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे ३१ मार्च २०१४ रोजी थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड हे महावितरण कंपनीतर्फे माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१४ नंतर वितरीत करण्यात आलेल्या चालू वीज देयकांचा भरणा करणे योजनेत सहभागी होणाऱ्या कृषी ग्राहकांना क्रमप्राप्त आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ८०१ वीज थकबाकीदार असून, त्यांच्याकडे २१ लाख ४७ हजार २०४ रुपयांची थकबाकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८६ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे ९ लाख ५११ रुपयांची थकबाकी आहे. तर कोकण परिमंडलात विलंब शुल्क दंडासह ३ लाख ९५ हजार १५५ रुपये इतकी थकबाकी रक्कम आहे. पैकी रत्नागिरी जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ५३५ रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख २५ हजार ६२० रुपये इतकी विलंब शुल्क दंडासह थकबाकी आहे. शासनाकडून १९ लाख १९ हजार १७ रुपयांचे अनुदान यासाठी उपलब्ध होणार आहे.‘कृषी संजीवनी योजना २०१४’ ही तात्पुरत्या व कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना तसेच उपसा जलसिंचन योजनांना लागू राहणार आहे. कृषी ग्राहकांना वीजबिल भरण्यासंबंधी सुलभ हप्ते आवश्यक असल्यास ग्राहकांच्या विनंतीनुसार मार्च २०१६ अखेर सर्व रक्कम वसूल होईल, अशा रितीने समान मासिक हप्ते देण्यात येणार आहेत. संबंधित योजना तात्पुरत्या व कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना तसेच उपसा जलसिंचन योजनांना लागू राहील. (प्रतिनिधी)नियमानुसार कार्यवाही : अन्यथा योजनेकरिता कृषी ग्राहक अपात्रमात्र, या योजनेत भाग न घेणाऱ्या व योजनेंतर्गत ठरविण्यात आलेल्या रकमेचा भरणा केला नाही, तर अशा कृषी ग्राहकांना योजनेकरिता अपात्र ठरविण्यात येणार आहे. तसेच नियमाप्रमाणे व्याज व दंडासह पूर्ण रक्कम ग्राहकांच्या खात्यात दाखवली जाणार आहे. तसेच विद्युत कायदा २००३ नुसार थकबाकी वसुलीकरिता नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.गतवर्षी कृषी संजीवनी योजनेसाठी मुदत दिली होती.रत्नागिरी जिल्ह्यात ८०१ वीज थकबाकीदार आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८६ वीज थकबाकीदार आहेत.ग्राहकांना लाभमहावितरणकडून ग्राहकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे या योजनांचा ग्राहकांना लाभ घेता येत आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांची संख्या महावितरणकडे वाढताना दिसत आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.