शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

तिलारीच्या डाव्या कालव्याला भगदाड

By admin | Updated: February 5, 2016 00:50 IST

बोडदेनजीक घडला प्रकार : गोव्याचा पाणीपुरवठा बंद राहणार

साटेली, भेडशी : तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला गुरुवारी पुन्हा एकदा साटेली-भेडशी बोडदेनजीक भगदाड पडले. ही घटना उघडकीस येताच डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी तत्काळ बंद करून ताबडतोब भगदाड बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. संध्याकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. त्यामुळे गोव्याचा पाणीपुरवठा अंदाजे दोन दिवस बंद राहणार आहे. कालव्याला भगदाड पडण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही चौथी वेळ असल्याने कालव्याच्या निकृष्ट कामाचे नमुने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी गोव्यात सोडले जाते. मात्र, कालव्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहारामुळे व निकृष्ट पद्धतीच्या कामामुळे कालवे फुटण्याच्या तसेच भगदाडे पडण्याच्या घटना वाढल्या. गेल्या दोन महिन्यांत जवळपास चारवेळा कालव्याला भगदाड पडण्याची घटना घडली. त्यामुळे गोव्यातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. पुन्हा एकदा असाच प्रकार साटेली-भेडशी बोडदेनजीक उघडकीस आला. गुरुवारी डाव्या कालव्याला भगदाड पडून पाणी झिरपत असल्याचा प्रकार निदर्शनास आल्यावर लागलीच कालवा विभागाने कालव्यातून गोव्याला सोडलेले पाणी बंद केले आणि ताबडतोब कालव्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. निकृष्ट कामाचे नमुने चव्हाट्यावर गुरुवारी दिवसभर सिमेंट काँक्रिटने कालव्याला पडलेले भगदाड बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. संध्याकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. काम पूर्ण होईपर्यंत गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, मागील दोन महिन्यांत खानयाळे ते साटेली भेडशी बोडदे दरम्यान डाव्या कालव्याला भगदाड पडण्याची ही चौथी वेळ आहे. सिमेंट काँक्रिटने भगदाड बुजविल्यानंतर त्यावर प्लास्टिक कापड टाकून ते घट्ट राहण्यासाठी दगड अथवा वाळू भरलेल्या सिमेंटच्या पिशव्या लावण्याची तकलादू उपाययोजना केली आहे. मात्र, शाश्वत उपाययोजना करण्याची गरज आहे. कालव्याला भगदाड पडण्याच्या या घटनांमुळे प्रकल्पाच्या कालव्याचे निकृष्ट पद्धतीने केलेल्या कामाचे नमुने चव्हाट्यावर आले आहेत.