शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

तिलारी जंगल वन्य प्राण्यांचे माहेरघर

By admin | Updated: March 22, 2015 00:28 IST

विविध प्राण्यांचे अस्तित्व कॅमेऱ्यात कैद : आंबोलीलाही वन्य प्राण्यांची पसंती

अनंत जाधव / सावंतवाडी पश्चिम घाटात येत असलेल्या आंबोलीपासून तिलारीपर्यंतच्या जंगलात सध्या वेगवेगळ्या प्राण्यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहे. या पट्ट्यात पट्टेरी वाघाच्या पाऊल खुणांबरोबरच वेगवेगळे प्राणी दृष्टीस पडत आहेत. तिलारीच्या जंगलातील मुबलक पाणीसाठा तसेच तीन राज्यांचे मिळून असलेले घनदाट जंगल यामुळे बहुतांश प्राण्यांचे तिलारीचे जंगल माहेरघरच ठरत आहे. मध्यंतरी वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हे सिद्ध झाले आहे. माणगाव खोऱ्यात पकडण्यात आलेल्या तीन हत्तींना प्रशिक्षित केल्यानंतर त्यांना तिलारीच्या जंगलात ठेवण्याचा वनविभागाचा प्रस्ताव होता. मात्र, दोडामार्ग तालुक्यात या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. याच तिलारीत अनेक प्राण्यांच्या पाऊलखुणा सध्या आढळून आल्या आहेत. वनविभागाने आॅगस्ट २०१४ मध्ये सिंधुदुर्गमधील काही जंगलात कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्यामध्ये प्राण्यांच्या पाऊलखुणा आढळल्या. यातील जास्तीत जास्त प्राणी हे आंबोली व तिलारीतील केंद्रेच्या जंगलात आढळून आले आहेत. आंबोली व तिलारी पश्चिम घाटात येत असून सह्याद्रीच्या पायथ्याचा भाग म्हणून हा परिसर ओळखला जातो. या परिसरातच मोठ्या प्रमाणात मायनिंग तसेच पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प शासनाने मंजूर केले आहेत. मात्र, हा परिसर इको-सेन्सिटिव्हमध्ये येत असल्याने हे प्रकल्प कागदावरच असून प्रत्यक्षात कृतीत उतरले नाहीत. जर हे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाले तर अनेक औषधी वनस्पती तसेच वन्य प्राणी नाहिसे होणार आहेत. तिलारी, आंबोली जंगलात राहणारे वन्यप्राणी खाद्य मिळविण्यासाठी मानवी वस्तीत येत असतात. त्यामुळे या प्राण्यांसाठी जंगलातच त्यांच्या खाद्याची सोय केल्यास ते वस्तीत येणार नाहीत.