शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

टिळक पंचांगाप्रमाणे आजपासून रत्नागिरीत गणेशोत्सव

By admin | Updated: August 18, 2015 00:40 IST

गणरायाचे विसर्जन २४ आॅगस्टला

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी टिळक पंचांगानुसार मंगळवारपासून रत्नागिरीत गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. रत्नागिरीतील हा गणेशोत्सव १३६ वर्षांचा जुना असून, गेल्या सात पिढ्या टिळक पंचांगाप्रमाणेच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. १८ आॅगस्टला प्रतिष्ठापना होत असलेल्या गणरायाचे विसर्जन यंदा पाच दिवसांऐवजी ८ दिवसांनी म्हणजेच २४ आॅगस्टला होणार आहे. याबाबत येथील गणेशभक्त उदय केशव पटवर्धन यांनी ‘लोकमत’ला रत्नागिरीत टिळक पंचांगाप्रमाणे होणाऱ्या गणेशोत्सवाची माहिती दिली. रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील पटवर्धन परिवारांपैकी आठ कुटुंबांच्या घरी स्वतंत्रपणे घरगुती गणपती व संपुर्ण कुटुंबांचा मिळून एक गणपती असे टिळक पंचांगानुसार आणले जातात. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. रत्नागिरी शहरातच टिळक पंचांगाप्रमाणे सुमारे २५ गणपतींचे पूजन केले जाते. त्याशिवाय गणेशगुळे, शिरगाव येथील मनोहर जोशी यांच्या घरीही गणेशपूजन केले जाते. गुहागर तालुक्यात व जिल्ह्याच्या अन्य भागातही टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो. गेली १३६ वर्षे या पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा केला जातो. ‘निर्णयसागर’ किंवा अन्य पंचांगानुसार बहुतांश लोक गणेशोत्सव साजरा करतात. परंतु, टिळक पंचांग मानणारेही जिल्ह्यात बऱ्यापैकी आहेत, असे पटवर्धन यांनी सांगितले. आदल्या दिवशी गणेशमूर्ती घरी आणली जाते. मंगळवारी गणेशमूर्ती सकाळी १० वाजता प्रतिष्ठापित केली जाते. खरेतर पाच दिवसांचा हा गणेशोत्सव असतो. पण यावेळी गौरी आगमन व विसर्जनाचे दिवस या पंचांगाप्रमाणे पुढचे आल्याने यंदाचा गणेशोत्सव हा आठ दिवसांचा राहणार आहे. गणेशोत्सवात २२ आॅगस्टला खड्याच्या ५ गौरी आणल्या जाणार आहेत. तर २४ आॅगस्टला गौरी व गणपती यांचे विसर्जन होणार आहे. शहरात मुख्यत्वे पटवर्धन परिवारातील ८ कुटुंबाच्या घरी होणाऱ्या गणेशोत्सवात दर दिवशी सहस्त्रावर्तन, दूधाचा अभिषेक, १२१ मोदकांचा प्रसाद व महापूजा असा कार्यक्रम असतो. मुख्य गणपतीच्या ठिकाणी सहाव्या दिवशी मोठा उत्सव होणार आहे. सहस्त्रावर्तन, टिपऱ्या कार्यक्रम, रात्री महाआरती, त्यानंतर भजन असा कार्यक्रम होतो. यावेळीही हीच परंपरा कायम राखली जाणार आहे. राज्यातील गणेशोत्सव १७ सप्टेंबरला होत आहे. मात्र, त्यापूर्वी महिनाभर आधी टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव १८ आॅगस्टपासून सुरू होत आहे. रत्नागिरी शहरात या गणेशोत्सवाची धूम आहे. मंगळवारी गणरायाचे आगमन होणार असलेल्या घरी आरास व गणेशाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे.