शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

घोडगेवाडीत हत्तीचा थरारक पाठलाग, उपसरपंचाची कालव्यात उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:57 IST

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणणाºया जंगली हत्तींचा कळप आता घोडगेवाडीत स्थिरावला आहे. घोडगेवाडीचे ...

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणणाºया जंगली हत्तींचा कळप आता घोडगेवाडीत स्थिरावला आहे. घोडगेवाडीचे उपसरपंच भालचंद्र कुडव यांचा या कळपातील टस्कर हत्तीने थरारक पाठलाग केला. यावेळी कुडव यांनी जीव वाचविण्यासाठी कालव्यातील पाण्यात उडी मारल्याने ते बालंबाल बचावले. ही घटना सोमवारी सायंकाळी ५च्या दरम्यान घडली.गेल्या काही महिन्यांपासून तिलारी खोºयात जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे घाटीवडे, बांबर्डे, विजघर, मुळस, हेवाळे, तेरवण-मेढे, सोनावल या भागातील शेतकरी, बागायतदार व ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत. या कळपात टस्कर हत्तींचा देखील समावेश आहे. आतापर्यंत दोघांना या टस्करांनी हल्ला करून जखमी केले आहे. हत्ती संकटामुळे तिलारी खोºयातील शेतकरी भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.गेले दोन दिवस हा कळप सोनवाल गावात तळ ठोकून होता. सोमवारी या कळपाने घोडगेवाडीच्या दिशेने मोर्चा वळविला आणि सायंकाळी तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या परिसरात जाऊन स्थिरावला. यावेळी या कळपातील टस्कराने घोडगेवाडीचे उपसरपंच भालचंद्र कुडव यांच्यावर हल्ला चढविण्याच्या उद्देशाने पाठलाग केला. कुडव यांनी प्रसंगावधान राखत जीव वाचविण्यासाठी कालव्यात उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी घोडगेवाडी परिसरात दाखल झाले असून, हत्तींना हुसकावण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. ग्रामस्थांनी हत्ती स्थिरावलेल्या क्षेत्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.सोनावलमध्येहत्तींकडून नुकसानघोडगेवाडीच्या दिशेने कूच करतेवेळी याच हत्तींच्या कळपाने सोनावलमधील शेतकरी रघुनाथ सोनवलकर, रवींद्र गवस, शिवराम गवस, मधुकर गवस यांच्या केळी बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.वनविभागाने नुकसानीचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.या हत्तींच्या कळपामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.