शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या सीमेवरील गावाचे तीन-तेरा

By admin | Updated: June 30, 2016 23:40 IST

गड-किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर : प्रशासनासह पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष; सडा गावाची उपेक्षा कायम

वैभव साळकर -- दोडामार्ग  इतिहासाची साक्ष देत मांगेलीच्या सीमेवर उभा असलेला ‘‘सडा’’ गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावादात अडकला आहे. मूळ कर्नाटक राज्यात जरी हा गाव असला तरी विविध कारणांमुळे या गावचे नाते महाराष्ट्राशी जोडले गेले आहे. कर्नाटक सरकारच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या दुर्लक्षामुळे सडावासीय विकासापासून वंचीत आहेत. शिक्षण आरोग्य व दळणवळणाच्या प्राथमिक सुविधा या गावापासून कोसो दूरच आहेत. साधारणत: पाचशे वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देत या ठिकाणी उभ्या असलेल्या गड किल्ल्याच्या संवर्धनाकडेही पुरातत्व विभाग आणि पर्यायाने केंद्र शासनानेही दुर्लक्ष केल्याने ते ढासळत चालले असून भविष्यात नामशेष होण्याची भिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सीमेवर सडा गाव वसला आहे. चहूबाजूंनी घनदाट जंगल, गावात जायला मातीचा कच्चा रस्ता, शिक्षणाच्या सोयीचा अभाव, आरोग्याच्यादृष्टीने एखादा दवाखाना तर फारच दूर अशी अत्यंत गैरसोयींनी आणि सोयीसुविधांचा अभाव असलेला गाव म्हणून सडा गावचे वर्णन केल्यास ते वावगे ठरणार नाही. जसे या गावची ओळख मागासलेपण ही आहे याहीपेक्षा या गावाला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. गावच्या परिसरात ठिकठिकाणी त्याचे दाखले सापडतात. गावात एका डोंगराच्या कड्यावर उंच भागात गड आणि चिरेबंदी राजवाडा आहे. शिवाय आजूबाजूला शत्रूपासून रक्षण करण्याकरिता टेहळणी करण्यासाठी बांधलेले बुरूज तर आजही पाहावयाच मिळतात. या किल्ल्यावर व राजवाड्यावर लोखंडी तोफ आजही जशाच तशी असून ग्रामस्थ त्याची पूजा करतात. गावात एकूण साठ विहिरी आहेत. गावच्या मधोमध असलेली विहिर वर्षाचे बाराही महिने गावकऱ्यांची तहान भागवते. एका बाजुला भुयारी मार्ग असून तो कुठे याचे अजूनही गुपीत कायम आहे. या गावच्या कोपऱ्या कोपऱ्यात इतिहास ठासून भरला आहे. ठिकठिकाणी अनेक पुरातन वास्तू आहेत. ज्या हा इतिहास उलघडण्यासाठी खुणावत आहेत. परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमा वादामुळे इतिहासाची पाने उलघडण्याबाबत संशोधन झालेले नाही. पुरानत्व विभागही याकडे आजपर्यंत तरी कानाडोळा करून आहेत. या गावचा इतिहास फारचा कोणास ठाऊक नाही. मात्र जाणकार व्यक्तींच्या सांगण्यानुसार कदंब राजवटीत विजापूरच्या आदीलशाहीने गोव्यातील कदंब राजवटीवर आक्रमण केले होते. त्यावेळी देसाई सरदार संरक्षणासाठी उंच अशा सह्याद्री डोंगर रांगाच्या माथ्यावर आला आणि त्याठिकाणी गाव वसवला होता, असे सांगितले जाते. मात्र तरी परिपूर्ण इतिहास कोणालाच माहित नाही. गावात एकाच पाषाणी दगडात साकारलेले राई पांडुरंग रखुमाई देवाचे मंदिर आहे. जे इ. स. १७१२ मध्ये स्थापन केल्याचा पुरावा याठिकाणी आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे हा गाव इतिहासाचा साक्षीदार असताना सुद्धा विकासापासून वंचित आहे. मांगेलीपासून अवघ्या एक किलोमीटरवर सडा वसला आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी या गावचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. जेमतेम पन्नास घरे आहेत. मराठी आणि कोकणीही बोली भाषा या ठिकाणी बोलली जाते. जरी कर्नाटक राज्यात गाव वसले तरी मांगेलीमार्गे साटेली- भेडशीचा बाजारच त्यांना अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे बाजारासाठी हे लोक साटेली भेडशीत येतात. शिक्षणाची गावात सोय नसल्याने मांगेलीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी साटेली भेडशी किंवा दोडामार्गच्याठिकाणी विद्यार्थी येतात. रोजगारासाठी बहुतांशी तरूण गोव्यात काम धंद्यासाठी जातात. पुरातत्व विभागले तर पूर्णत: डोळेझाक केल्याने इथले किल्ले, राजवाडा आणि बुरूज ढासळीत चालले आहेत. भविष्यात ही परिस्थिती अशीच राहील्यास इतिहासाची हे साक्षीदार नामशेष होण्याची भिती आहे.पावसाळ्यानंतर सड्याच्या पठारावरही सौंदर्य पहावयास मिळेलसडा जसा इतिहासाचा साक्षीदार आहे. तसाच नैसर्गिक साधन संपत्तीनेही भरलेला आहे. इथले किल्ले, राजवाडे, गावात असलेल्या विहिरी, विवरे आदींचा अभ्यास व त्यावर संशोधन झाल्यास पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील कासच्या पठारावर जसे सौंदर्य पाहायला मिळते अगदी तसेच नैसर्गिक सौंदर्य व विविध रंगबेरंगी फुलांचा महोत्सव पावसाळ्यानंतर सड्याच्या पठारावरही पहावयास मिळतो.