शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

तीन शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद

By admin | Updated: April 12, 2015 23:58 IST

जिल्हा परिषद : प्रशासनाची नामुष्की; शिक्षण विभागासाठी धोक्याची घंटा

गिरीष परब - सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद (जि.प.) शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पोषण आहार, पाठ्यपुस्तके आदी सुविधा उपलब्ध असतानाही या चालू शैक्षणिक वर्षात जिपच्या तीन शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद करण्याची नामुष्की जिल्हा परिषद प्रशासनावर ओढवली आहे. सतत घटत जाणारी पटसंख्या परिणामी बंद पडत चाललेल्या शाळा या गोष्टी मात्र शिक्षण विभागासाठी ‘धोक्याची घंटा’ बनली आहे.शैक्षणिक विकासासाठी सक्तीचे शिक्षण हा कायदा करण्यात आला. त्या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षण आवश्यक व मोफत केले आहे. त्यासोबत मोफत गणवेश, वह्या, पुस्तके, मोफत शिक्षण त्याचबरोबर अन्य काही सवलती देण्यात आल्या असूनदेखील पटसंख्याअभावी जिपच्या शाळा बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे. शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च करूनही शाळेतील मुलांची पटसंख्या व शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा सुधारत नसल्याची स्थिती सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची झाली आहे.चालू शैक्षणिक वर्षात सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या १४७० शाळा होत्या. त्यात मालवण तालुक्यातील तीन शाळा या विद्यार्थ्यांअभावी बंद कराव्या लागल्यात. त्यामुळे सद्यस्थितीत जिपच्या शाळांची संख्या ही १४६७ एवढी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी पदाधिकारी तसेच अधिकारीदेखील प्रयत्नशील आहेत. नवनवीन योजना, विद्यार्थ्यांच्या गणवेशात बदल, बेंचेस पुरविणे, ई-लर्निंग शिक्षण, ब्लॅकबोर्ड पुरविणे, पाण्याची सोय आदी योजना राबविण्याचा प्रयत्न करताहेत मात्र असे असूनसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी जात नसल्यामुळे शाळा या बंद कराव्या लागत आहेत.धोक्याची सूचनासर्व शासकीय योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी होऊनदेखील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे वळण्यास, प्रवेश घेण्यास का इच्छुक नाहीत? याचा सखोल अभ्यास करण्याची वेळ आता सिंधुदुर्गच्या प्राथमिक शिक्षण विभागावर येवून ठेपली आहे. पटसंख्येअभावी बंद पडत चाललेल्या शाळा या शिक्षण विभागासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. वर्षानुवर्षे खासगी शाळांच्या पटसंख्येमध्ये वाढ होत आहे. पालक आपल्या मुलांना खासगी तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे प्रवेश घेत आहेत. खासगी शाळांची जर जिल्हा परिषद शाळांना बरोबरी करायची असेल तर प्रथमत: तज्ज्ञ इंग्रजी शिक्षकांची पदे भरली जाणे आवश्यक आहेत. तरच पटसंख्या वाढू शकते.शाळा बंद होण्याची कारणेशाळा बंद होण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता प्रथमदर्शी असे निदर्शनास आले की, खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. सिंधुदुर्गची लोकसंख्येत २०११ च्या जनगणनेनुसार २० हजारांनी घट झाली आहे. शैक्षणिक दर्जा खालावत चालल्यामुळे पालक आपल्या मुलांना खासगी शाळांकडे प्रवेश देत असल्याचे बोलले जात आहे.उपाययोजना करणे आवश्यकजिल्ह्यात शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी यांची संयुक्तरित्या समिती स्थापन करणे आवश्यक आहे. या समितीमार्फत शाळांची तपासणी होणे आवश्यक आहे. शिक्षक हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळांमध्ये १० निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. इंग्रजी पदवीधर शिक्षकांची पदे भरणे आवश्यक आहे.३२२ शाळांवर टांगती तलवारसिंधुदुर्गात १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या ही ५०, १०० नव्हे, तर तब्बल ३२२ एवढी आहे. त्यात यापैकी निम्म्या शाळांमध्ये ५ पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा असण्याची शक्यता आहे. यामुळे ही अशीच घटत जाणारी पटसंख्या असल्यास आगामी काळात या शाळाही पटसंख्येअभावी बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवण्याची शक्यता आहे.