शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

तीन प्राथमिक शाळा देशात चमकणार

By admin | Updated: October 17, 2014 00:38 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभाग : स्वच्छ भारत अभियान

रत्नागिरी : जिल्ह्यातील तीन शाळा स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर चमकणार आहेत़ त्या शाळांचे चित्रीकरण करुन त्यांचा अहवाल सादर करण्याची सूचना केंद्र शासनाकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे़ हे अभियान सर्व ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, शासकीय,निमशासकीय कार्यालये, बसस्थानके, रेल्वे स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा या अभियानामध्ये समावेश करण्यात आला आहे़ आतापर्यंत रत्नागिरी जिल्हा परिषदेने सर्व शिक्षा अभियानामध्ये तसेच शैक्षणिक दर्जाबाबत राज्यामध्ये नाव कमावलेले आहे. त्यानंतर आता या स्वच्छता अभियानामध्ये जिल्हा परिषदेला नाव कमावण्याची संधी मिळणार आहे. या स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्वच शाळा जोरदारपणे राबवत आहेत़ जिल्ह्यात स्वच्छता अभियानामध्ये चांगले काम करणाऱ्या शाळांची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेकडून पाहणी करण्यात येणार आहे़ तसेच अशा शाळांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे़ याबाबतचा अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे़ या अभियानामध्ये चांगले काम करणाऱ्या शाळांची निवड शिक्षक विभागाने केली आहे़ त्यामध्ये लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ आणि संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर शाळा क्रमांक १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सायले या शाळांचा समावेश आहे़ या शाळांचे चित्रीकरण नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे, त्याबाबतची तयारी करण्याची सूचना निवड करण्यात आलेल्या तिन्ही शाळांना देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेश जोशी यांनी दिली. निवड करण्यात आलेल्या शाळा देशात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (शहर वार्ताहर)लांजा क्रमाक ५, पूर शाळा क्ऱ १, सायले.नोव्हेंबरमध्ये चित्रिकरण होणार.स्वच्छ भारत अभियान.जिल्ह्यातील सर्व शाळांचा अभियानामध्ये सहभाग.केंद्र शासनाला अहवाल सादर होणार.