शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हजार शिक्षकांचे ओझे दोघांवर

By admin | Updated: January 9, 2015 00:10 IST

पंचायत समिती : रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी

रहिम दलाल - रत्नागिरी  -रत्नागिरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील १००० शिक्षकांच्या कामाचा संपूर्ण भार केवळ दोन क्लार्कवर आहे़ त्यामुळे या विभागातील दोन्ही कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे़ रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभागासाठी १००० शिक्षक पदे मंजूर असून, त्यापैकी ९५७ शिक्षक कार्यरत आहेत़ या १००० शिक्षकांच्या आस्थापनेसाठी ५ क्लार्कची पदे मंजूर आहेत़ मात्र, त्यापैकी केवळ दोन पदे भरण्यात आली आहेत़ उर्वरित तीन पदे रिक्त आहेत़ तसेच तालुक्यातील ६ बीटसाठी तेवढेच विस्तार अधिकारी मंजूर आहेत़ मात्र, त्यापैकी केवळ ४ विस्तार अधिकारी कार्यरत असून, दोन पदे रिक्त आहेत़ विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जातात़ त्याचबरोबर शिक्षकांची पगार बिले काढणे, प्रॉव्हिडंड फंडाची कामे करणे, विविध शासकीय योजनांचे कामे व अन्य कामे त्या क्लार्कना करावी लागतात़ ही कामे करताना दोन्ही क्लार्कची दमछाक होत आहे.तालुक्यामध्ये प्रत्येक माध्यमिक शाळेसाठी एका क्लार्कची नियुक्ती करण्यात येते़ मात्र, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३४६ प्राथमिक शाळांसाठी केवळ २ क्लार्क कार्यरत आहेत. या दोन्ही क्लार्कना दररोज सायंकाळी उशिरापर्यंत थांबून काम करावे लागते़ विस्तार अधिकाऱ्यांची २ पदे रिक्त आहेत़ विस्तार अधिकाऱ्यांना शाळांना भेटी द्यावा लागतात़ कार्यरत असलेल्या ४ अधिकाऱ्यांवर तालुक्याचा भार असल्याने तेही हैराण झाले आहेत़ विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो़ त्या पोषण आहाराच्या कामकाजासाठी अधीक्षक पदाची नियुक्ती करण्यात आली आहे़ मात्र, हेही पद रिक्त असल्याने अधीक्षकाचे कामही या दोन्ही क्लार्कना करावे लागते. तालुक्यातील १००० शिक्षकांचा भार केवळ दोन क्लार्कवर मदार असल्याने त्यांची दमछाक होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत शिक्षक़वर्गातून व्यक्त होत आहे.रिक्त असलेल्या पदांमुळे पंचायत समितीचा शिक्षण विभाग मेटाकुटीला आला आहे़ ही रिक्त पदे भरण्याबाबत पंचायत समितीकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अनेकदा मागणी करण्यात आली आहे़ (शहर वार्ताहर)रोखपाल नियुक्त मात्र...शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वशिक्षा अभियान राबविण्यात येत आहे़ त्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात रोखपालची नियुक्त करण्यात आली आहे़ मात्र, या पदावरील रोखपाल गेले सहा महिने रजेवर आहेत़ या रोखपालाच्या कामांचा भारही या दोन क्लार्कना उचलावा लागत आहे़ हे चित्र बदलणार कधी?