शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गावांचा पुनर्विचार होणार

By admin | Updated: December 16, 2014 23:43 IST

रवींद्र बोंबले : गठीत समितीने क्षेत्राचा अभ्यास करावा

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ४८ गावांमध्ये असलेल्या इको-सेन्सिटीव्ह झोनबाबत पुनर्विचार करण्याकरीता शासनाने एक अमूल्य अशी संधी दिली आहे. यासंदर्भात अहवाल देण्याकरीता गठीत केलेल्या समितीने आपल्या क्षेत्राचा परिपूर्ण अभ्यास करून अहवाल द्यावा, असे आवाहन कुडाळ प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी कुडाळ येथील बैठकीत केले. कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात महसूल विभागामार्फत पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची सीमा ठरविण्यासंदर्भात कुडाळ तालुक्यात इको-सेन्सिटीव्ह असलेल्या ४८ गावातील सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांची सभा आयोजित केली होती. या सभेला प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार जयराज देशमुख, सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती आर. के. सावंत, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तालुका वनक्षेत्रपाल संजय कदम, तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ, नायब तहसीलदार प्रवीण लोकरे व अन्य अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कस्तुरीरंगन समितीने दिलेल्या इको-सेन्सिटीव्हच्या अहवालांमुळे येथील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. येथील गौण खनिज उत्खननाच्या बंदीमुळे जनता त्रस्त झाली होती. इको-सेन्सिटीव्ह रद्द करावा, अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली होती. अशातच शासनाने एक परिपत्रक रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ गावांच्या इको-सेन्सिटीव्ह झोनबाबत काढले असून या १९२ गावात इको-सेन्सिटीव्ह झोन असावा की नसावा याकरिता पुन्हा एकदा जनसुनावणी होणार आहे. याच अनुषंगाने कुडाळ तालुक्यातील ४८ गावांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रत्येक गाव पातळीवर गावनिहाय समिती गठीत करा, या समितीचे अध्यक्ष गावचे सरपंच व सचिव ग्रामसेवक असून सदस्यांमध्ये वनसंरक्षक, तलाठी, कृषी सहाय्यक असणार आहेत. ज्या गावांच्या समित्या तयार आहेत त्यांनी व ज्या गावांच्या समिती नाहीत, त्यांनी तातडीने समित्या बनवून यासंदर्भात जनसुनावणी घ्यावी व इको-सेन्सिटीव्हबाबत अभ्यासपूर्ण अहवाल २५ डिसेंबरपर्यंत शासनाकडे सादर करावा, असे आवाहन यावेळी प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी केले. महत्त्वाचे दुर्गम भाग, किल्ले, जनावरांच्या चाऱ्याचा प्रदेश या सर्व गोष्टींचा विचार करून, सर्वांना विश्वासात घेऊन त्याप्रमाणे अहवाल तयार करा, असेही प्रांताधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी)जनसुनावणीवेळी सर्वांना विश्वासात घ्या जनतेला इको-सेन्सिटीव्ह, वनसंज्ञा यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास वाचविण्याची जनतेला ही शेवटची संधी आहे. त्यामुळे समितीने चर्चा व अभ्यास करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. यासाठी जनसुनावणी सर्वांना विश्वासात घेऊन घ्या, असे आवाहन तहसीलदार जयराज देशमुख यांनी केले. प्रत्येकाची जबाबदारी : घावनळकरइको-सेन्सिटीव्हबाबत पुनर्विचार करण्यासाठी ही शेवटची संधी असल्याने गठीत समितीतील प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारी समजून योग्य काम करणे आवश्यक आहे, असे सभापती प्रतिभा घावनळकर यांनी सांगितले.