शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘त्या’ मृतदेहांची पटली ओळख

By admin | Updated: October 6, 2016 01:15 IST

महाड दुर्घटना : मृतदेहांवर चिंचघर येथे अंत्यसंस्कार

दस्तुरी (खेड) : मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानच्या सावित्री नदी पूल दुर्घटनेत १७ दिवसांनी सापडलेले मृतदेह वाहक विलास देसाई आणि प्रवासी धोंडू कोकरे यांचे असल्याचे डीएनए चाचणीत निष्पन्न झाले आहे. तब्बल ४८ दिवस रुग्णालयात ठेवलेल्या या मृतदेहांवर बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.दि. २ आॅगस्ट रोजी रात्री पावणेअकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान सावित्री नदीवरील पूल तुटला आणि त्यात दोन एस. टी. बसेस वाहून गेल्या. दि. ३ रोजी सकाळी ७ पासून वाहून गेलेल्या या वाहनांचा व प्रवाशांचा प्रशासनाच्यावतीने शोध सुरू होता. तब्बल बारा दिवसांनी एसटी बसेस व तवेरा गाडी बाहेर काढल्यानंतर प्रशासनाच्यावतीने ही शोध मोहीम थांबवण्यात आली. परंतु या दुर्घटनेतील आणखी काही मृतदेह बेपत्ता होते.दुर्घटनेनंतर १७व्या दिवशी दि. १९ आॅगस्ट रोजी वेळासनजीक बाणकोट खाडीकिनारी गस्ती पथकातील पोलिसांना दोन मृतदेह सापडले. परंतु ते छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे ते कोणाचे आहेत, हे नेमके कळणे अवघड होते. प्रशासनाच्यावतीने महाड येथील शासकीय रुग्णालयात सर्व बेपत्तांच्या नातेवाईकांचे डीएनए घेण्यात आले होते. दि. १९ आॅगस्टला हे दोन मृतदेह आढळून आल्यानंतर त्या मृतदेहांचे सॅम्पल काढून डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.डीएनए अहवाल हाती आल्यानंतर हे मृतदेह जयगड-मुंबई एसटी बसचे वाहक विलास काशिनाथ देसाई (फुणगूस) व प्रवासी धोंडू बाबाजी कोकरे (खंडाळा-वरवडे) यांचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांना या संदर्भात कळवण्यात आले. त्याप्रमाणे बुधवारी देसाई व कोकरे यांच्या नातेवाईकांनी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात येऊन आपल्या नातेवाईकांचे मृतदेह ताब्यात घेतले.मुळात पाण्यात १७ दिवस राहिल्यामुळे छिन्नविछिन्न अवस्था झालेल्या या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे कोठे? असा प्रश्न नातेवाईकांना पडला. ही माहिती आमदार संजय कदम यांना समजल्यावर त्यांनी तत्काळ या मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन या मृतदेहांवर चिंचघर-प्रभूवाडी येथे अंत्यसंस्कार करावेत. आपल्याला सर्वतोपरी मदत ग्रामस्थांकडून करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजय देसाई व धोंडू कोकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसपाटील विष्णू कदम, अरुण पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह चिंचघर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)वाहक विलास देसाई व प्रवासी धोंडू कोकरे यांचे मृतदेह असल्याचे डीएनए चाचणीत निष्पन्नतब्बल ४८ दिवस राहिले रुग्णालयात मृतदेह