शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

जलयुक्त शिवारच्या तिसऱ्या टप्प्याचा आराखडा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७ गावांमधील ८०० कामांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:38 IST

सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत राज्याच्या मृद् व जलसंधारण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला १४ कोटी ४१ लाख ५३ हजार एवढ्या निधीची आवश्यकता आहे. एवढ्या खर्चाच्या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देपुरळ, शिरशिंगे गावांनी नाकारली योजना, साडेचौदा कोटींच्या निधीची गरजतिसऱ्या टप्प्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामध्ये ३७ गावे समावेश लघुसिंचनासाठी ६ कामे प्रस्तावित

सिंधुदुर्गनगरी : सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत राज्याच्या मृद् व जलसंधारण विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला १४ कोटी ४१ लाख ५३ हजार एवढ्या निधीची आवश्यकता आहे. एवढ्या खर्चाच्या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

८०० कामे यात अंतर्भूत करण्यात आली आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी एकूण ३९ गावांची निवड करण्यात आली होती. यातील देवगड-पुरळ व सावंतवाडी-शिरशिंगे या गावांनी ग्रामसभेद्वारे ही योजना नाकारल्याने ३७ गावे तिसऱ्या टप्प्यासाठी समावेशित करण्यात आली आहेत.

राज्य शासनाने २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार ही योजना अमलात आणली आहे. पहिल्याच वर्षी ३५ गावांचा यात समावेश करण्यात आला होता. ५९७ कामांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यातील ४९४ कामे पूर्ण होऊन १७ कोटी ३९ लाख २८ हजार एवढा निधी खर्च पडला होता.

२०१६-१७ साठी २३ गावांची निवड करण्यात आली होती. २७२ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यातील २६९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. २३८ कामे सुरू झाली असून २०६ कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी आतापर्यंत ५ कोटी ९१ लाख ७३ हजार रुपये एवढा खर्च झाला आहे.

२०१७-१८ या तिसऱ्या टप्प्यासाठी ३७ गावांचा जलयुक्त शिवार अभियानामध्ये समावेश करून त्यांच्या कामांचे आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. देवगड तालुक्यातील नाडण, धालवली, सौंदाळे, वैभववाडी तालुक्यातील नावळे, पालांडेवाडी, कणकवली तालुक्यातील कळसुली, हरकुळ-बुद्रुक, नाटळ, भिरवंडे, ओसरगाव, हळवल, मालवण तालुक्यातील किर्लोस, असगणी, कुंभारमाठ, तिरवडे, साळेल, कुडाळ तालुक्यातील आंजिवडे, पोखरण, कसबे, पिंगुळी, कुसगाव, नेरूर तर्फ हवेली, अणाव, वेंगुर्ला तालुक्यातील आडेली, भंडारवाडा, गवाणे यांचा समावेश आहे.

तर सावंतवाडी तालुक्यातील सांगेली, सावरवाडा, बांदा, चौकुळ, कोनशी, दाभोळ व दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, आयनोडे, घाटीवडे, खानयाळे, झोळंबे या गावांचा तालुकानिहाय जलयुक्त शिवारच्या तिसऱ्या टप्प्यासाठी समावेश करण्यात आला आहे. पाणलोटमध्ये समावेशित असलेल्या व गेल्या पाच वर्षांत एकदातरी पाणीटंचाई घोषित झालेल्या गावांचा तिसऱ्या टप्प्यासाठी समावेश करण्यात आला आहे.

तिसऱ्या टप्प्यात समावेशित ३७ गावांच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एकूण ८०० कामे निवडण्यात आली आहेत. यासाठी १४ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपये निधी लागणार आहे. ही कामे विविध विभागांच्यावतीने करण्यात येणार आहेत.अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या राज्य शासन कृषी विभागाच्यावतीने ६६८ कामे करण्यात येणार असून यासाठी त्यांना ६ कोटी ४८ लाख ५८ हजार एवढा निधी लागणार आहे.

सामाजिक वनीकरण विभाग ८ कामे करणार आहे. त्यांना एक कोटी ९७ लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. वन विभागाकडे ३५ कामे देण्यात आली असून ४२ लाख ७७ हजार रुपये एवढा निधी लागणार आहे.

लघुसिंचनासाठी ६ कामे प्रस्तावितलघुसिंचनासाठी जलसंधारण विभागाकडे ६ कामे देण्यात आली आहेत. याकरिता या विभागाला एक कोटी ९० लाख रुपये निधी लागणार आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडे ५५ कामे देण्यात आली असून याकरिता ४ कोटी ९१ हजार रुपये निधी लागणार आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे २८ कामे देण्यात आली आहेत. त्यांना एक कोटी ५७ लाख ३० हजार रुपये एवढा निधी लागणार आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारsindhudurgसिंधुदुर्ग