शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीच्या सादरीकरणाने रंगत वाढली

By admin | Updated: January 29, 2015 00:11 IST

नाथ पै एकांकिका स्पर्धा परीक्षण

युरेका सायन्स क्लब कणकवलीच्या हौशी कलाकारांच्या बिनधास्त अभिनयाने गतिशील बनलेला ‘आली रे आली दहावी आली’ हा प्रयोग तसेच शिरगाव हायस्कूल शिरगावच्या कलाकारांनी प्रयोगशील एकांकिकेमध्ये दाखविलेली चमक यामुळे नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही स्पर्धेची रंगत कायम राहिली.आली रे आली दहावी आलीयुरेका सायन्स क्लब कणकवलीच्या उत्साही बालकलाकारांनी सुषमा केणी लिखित व श्रीधर पाचंगे दिग्दर्शित ‘आली रे आलीदहावी आली’ एकांकिका जोशात सादर केली.या एकांकिकेत रंगमंचावर सुरुवातीला बागेत मुलं खेळताना बागडताना दिसतात. ती खूष आहेत. क्रिकेट तर त्यांचा आवडता खेळ. धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा त्यांच्या गळ्यातील ताईत. अधिकारवाणीनं क्रिकेटवर आपली मतं मांडताहेत. त्याचवेळी त्यांचा नववीचा निकाल लागला आहे. मुलं आपापल्या गुणांची टक्केवारी सांगत आहेत. त्याचबरोबर मिळालेल्या गुणांबद्दल आईवडीलांची काय प्रतिक्रिया आहे तेही आवर्जून सांगताहेत. मुलं मोकळेपणाने बोलताहेत. त्यांची तक्रार आहे आपल्या आईवडीलांबद्दल. पालक-नातेवाईकांबद्दल. जी अगदी रास्तही आहे. त्यांचं म्हणणं चुकीचं नाही. परीक्षेचं महत्त्व त्यांनाही मान्य आहे. पण परीक्षेच्या नावाखाली त्याचं बालपण, त्याचं खेळणं-बागडणं मित्रांशी संवाद साधणं, आजी-आजोबा बरोबर मौज मस्ती करणं जे त्यांना आवडतं आणि हे बंद करू पाहणारे त्यांचे हितचिंतक त्यांना शत्रू वाटू लागतात.मुलांनी काय शिकावं काय शिकू नये हे आईवडील, पालकच ठरवतात. आई-वडील दोघेही डॉक्टर असतील तर त्यांना आपल्या मुलांनीही डॉक्टर व्हावे असे वाटते. पालक हे कधीही गृहित धरत नाहीत की त्यांच्या मुलांची आवड-निवड काही वेगळीही असू शकते. मानसशास्त्र तर सांगतं की मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकायला, काम करायला आवडते. ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. कामाचं कोणतंही क्षेत्र श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसतंच मुळी. बहुतांशी पालक मुलांचं भावविश्व समजून घेत नाहीत आणि मुलांवर स्वत:च्या आशा आकांक्षाचं ओझं लादतात. त्यातून निर्माण होणारे प्रश्न लेखिकेनं एकांकिकेत छान हाताळलेत. खरं तर आपली आवड काय आहे. आपण कोणत्या क्षेत्रात प्रगती करू शकतो हे मुलांनाही कळतं. तेव्हा पालकांची जबाबदारी त्यांच्या मार्गदर्शकाची असावी असा संदेश एकांकिका देते. राखी अरदकर यांचे नेपथ्य, किशोर कदमांची प्रकाशयोजना, नेत्रा पाचंगेचे संगीत वातावरण निर्मितीस पोषक आणि परिणामकारक आहे.कुलूपशिरगाव हायस्कूल शिरगावच्या विद्यार्थ्यांनी डॉ. राजेंद्र चव्हाण लिखित व दिग्दर्शित ‘कुलूप’ एकांकिका सादर केली.‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही महाकाव्ये सृजनशील लेखन करणाऱ्या कोणत्याही लेखकाला आजही नवं काही लिहायला तसेच या कथांचा नवा अन्वयार्थ लावायला प्रेरीत करतात. आधुनिक भारतीय आर्य आणि अनार्य भाषेत रामकथेचा नवा अन्वयार्थ लावणारे खूप लेखन झाले आहे. डॉ. राजेंद्र चव्हाणांनी रामकथेचा आधार घेत त्यांच्या बुद्धीला तर्कसंगत वाटणारी व आजच्या संदर्भात त्यातून काही संदेश देणारी नवी मांडणी ‘कुलूप’ एकांकिकेत केली आहे.एकांकिकेतील राम, सीता व लक्ष्मण रावणाबरोबरच्या युद्धात अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेल्या हनुमानाचे तोंड भरून कौतुक करतात. रामभक्त हनुमान प्रभूराम व सीतामातेच्या या कृतीनं संकोचतो. सीता हनुमानाला आपल्या गळ्यातील हार देऊ करते. हनुमान नम्रपणे भेटवस्तू नाकारतो. पण प्रभूरामाच्या व सीतेच्या आग्रहामुळे हार हनुमान स्वीकारतो. पुढे काहीसा अज्ञातवासात गेलेला हनुमान सीतामातेनं दिलेला हार तोडताना फोडताना दिसतो. हे दृश्य पाहून राम-सीता गोंधळून जातात. लक्ष्मणाचा क्रोध अनावर होतो. राम लक्ष्मणाला समजावतो. हनुमान हारामध्ये आपल्या प्रिय रामाला शोधत असल्याचे सांगतो. आपली छाती फाडून प्रभू रामाचे दर्शन करणारा हनुमान दाखवता ती मांडणी लेखकाने वेगळ्या पद्धतीनं एकांकिकेत केली आहे.एकांकिकेत लेखकाने जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, माकडांच्या जगण्या-मरण्याचा निर्माण झालेला प्रश्न मांडला आहे. बेसुमार जंगलतोड होत आहे. जंगलातील लाकडे तोडून घरे बांधली जात आहेत. जंगलतोड करून लाकडांची विक्री करून घरातील गृहिणीसाठी दागिने खरेदी केले जात आहेत आणि घरातील संपत्ती सुरक्षित रहावी म्हणून घराला भलं मोठं कुलूप लावलं जात आहे. जंगलतोडीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्येकडे कोणी फारसं गंभीरपणे पहात नाही ही चिंतेची गोष्ट आहे आणि नेमकी तीच लेखकाला एकांकिकेच्या माध्यमातून सांगायची आहे. म्हणून एकांकिकेचं नाव कुलूप.एकांकिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांचा संयत व कसदार अभिनय प्रेक्षकांची मने जिंकणारा होता. माकडांच्या विशिष्ट प्रकारच्या हालचाली विलक्षण ताकदीनं बालकलाकारांनी साकारल्या. पार्श्वसंगीत व गायन वातावरण निर्मितीस पोषक व परिणामकारक होते.प्रा. डॉ. लालासाहेब घोरपडे