शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

विकास आराखडा सादर न करणाऱ्या ग्रामपंचायतींना एकही पैसा देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 23:39 IST

कमलाकर रणदिवे : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत माहिती

सिंधुदुर्गनगरी : १५ आॅगस्टपूर्वी गावचा विकास आराखडा सादर न करणाऱ्या एकाही ग्रामपंचायतीला यापुढे १४ व्या वित्त आयोगातून एकही पैसा दिला जाणार नसल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली. तसेच सन २०१४-१५ चे आॅडिट व ग्रामपंचायतीचे उत्पन्न न वाढविणाऱ्या ग्रामपंचायतींचा यात समावेश होणार आहे.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, विषय समिती सभापती दिलीप रावराणे, अंकुश जाधव, रत्नप्रभा वळंजू, आत्माराम पालेकर, सदस्य सतीश सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, प्रमोद कामत, रणजित देसाई, वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, पुष्पा नेवरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.१४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात युती शासनाने ग्रामपंचायतींवर काही जबाबदाऱ्यांही ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार या वित्त आयोगाचे दोन हप्ते सर्व ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आले आहेत. मात्र यानंतरचा निधी शासनाच्या अटी व नियमांचे पूर्तता केल्यानंतरच ग्रामपंचायतींना मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतींनी आपले सन २०१४-१५ चे लेखा परीक्षणे पूर्ण करून घ्यावीत. कामांचा आराखडा १५ आॅगस्टपूर्वी करावा. तसेच ग्रामपंचायतींनी आपले उत्पन्न वाढविले तरच हा पुढील म्हणजेच तिसरा हप्ता मिळणार असल्याचे शासनाने स्पष्ट केल्याची माहिती देण्यात आली.जिल्ह्यात नादुरुस्त शाळांचा मोठा प्रश्न ऐरणीवर असून लाकडी छप्पराच्या शाळा दुरुस्ती करणे कठीण आहेत. म्हणून यापुढे अशा शाळांना लोखंडी छप्पर करण्यासाठी नियोजन समितीकडे प्रस्ताव द्या याबाबत सतीश सावंत यांनी सूचना मांडली.जिल्ह्यातील नद्यानाल्यांचे पाणी आटले आहे. त्यामुळे पाणीटंचाईची झळ सर्वच ठिकाणी भासू लागली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या कामांचे १०० प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. मात्र यापैकी केवळ पाच प्रस्तावांनाच मान्यता दिल्याने सभागृहात आश्चर्य व्यक्त करण्यात आले.याबाबत गटनेते सतीश सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत नाराजीही व्यक्त केली. याबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी अशाही सूचना या सभागृहाने केल्या. दुर्धर आजारामधील ४६ बालकांपैकी २१ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत दिली. (प्रतिनिधी) पाणलोट कामाची पाहणी करुन चौकशी करा पाणलोट योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी तसेच निधी प्राप्त किती? खर्च किती? कोणती व कोठे कामे घेण्यात आली. याबाबतची माहिती राज्य कृषी अधीक्षक विभागाकडून मिळत नाही असा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार सुरु असलेल्या कामांंची चौकशी करण्याची मागणी सर्व सदस्यांनी केली. तसेच पाणलोटच्या कामाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश उपाध्यक्ष नाडकर्णी यांनी दिले.