शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

आठवडा बाजारवर नियंत्रण नसल्याने संताप

By admin | Updated: July 11, 2015 00:17 IST

ग्राहकांना फटका : जैतापूरचा बाजार महाग, जाहीर झालेली समिती नियुक्तच नाही

जैतापूर : जैतापूर (ता. राजापूर) ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील आठवडा बाजारच महाग झाला आहे. विक्रेत्यांच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नाही. परिणामी याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.आठवडा बाजारामध्ये कोल्हापूर राधानगरी या भागातून येणारे व्यापारी अव्वाच्या सव्वा दराने भाजी विक्री करत आहेत. शेजारच्या नाटे गावामध्ये जैतापूरपेक्षा कमी दरात भाजी मिळत असल्याने जैतापूरवासीय नाटे गावातून भाजी विकत आणत आहेत.जैतापूर आठवडा बाजाराच्या माध्यमातून जैतापूर ग्रामपंचायतीला वर्षाकाठी ७० हजार ते ७५ हजारापर्यंत महसूल मिळत आहे. विक्रेत्यांवर दरासंदर्भात जैतापूर ग्रामपंचायतीमध्ये समिती नेमण्याचे ठरले होते. ती समिती काम करते का? याबाबत लोकमतने जैतापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांची भेट घेतली असता अद्याप समिती तयार केली नसल्याचे त्यांनी सांगितले. उपसरपंचांच्या दुकानासमोरच हा बाजार भरवण्यात येतो. जेव्हा लोकमतने या वृत्ताची दखल घेताच भाजी विक्रेत्यांनी पावकिलोच्या किमतीमध्ये सरासरी पाच रुपयांची घसरण केली. ही बाब उपसरपंचांच्या कानावर घालण्यात आली. येथे येणारे बहुतांश व्यापारी तपासणी न केलेल्या तराजूमध्ये मोजमाप करत असल्याने काटा मारणे, हा प्रकारदेखील होत आहे. पॅकिंग केलेली साखर, कडधान्य, चहापावडर, मसाले यांच्या वजनात घट असल्याचे ग्राहक सांगतात. परिणामी काही व्यापारी आपल्या किलोमागे दोन रुपये दर कमी केल्याचे सांगून ग्राहकांकडून सहानुभूती मिळवतात आणि त्यांची लूटही करतात. हा प्रकार येथील आठवडा बाजारात सर्रासपणे अनुभवास येतो. (वार्ताहर)