शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

प्रचारासाठी सेना, भाजपाकडे मुद्दाच नाही

By admin | Updated: October 12, 2014 01:00 IST

सतीश सावंत : विरोधकांकडून केवळ राणेंवर वैयक्तिक टीका

कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना तसेच भाजपाकडे कोणताही महत्वाचा मुद्दा नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसलेल्या दहशतवादाचा मुद्दा वैभव नाईक पुढे आणत आहेत. ही जनतेची फसवणूक असून त्याला कोणीही भुलणार नाही, अशी टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केली.येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदानकेंद्र नाही. त्यामुळे विरोधकांकडून दहशतवादाच्या मुद्याचा करण्यात येणारा बाऊ निरर्थक आहे. कुडाळ मतदारसंघाचा आपण कोणत्या पद्धतीने विकास करणार याबाबत वैभव नाईक काहीच बोलत नाहीत. शिवसेनेने व्हिजन नसलेला उमेदवार उभा केला आहे. कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात जांभई देण्यापलिकडे नाईक यांनी कोणत्याही मुद्यासाठी तोंड उघडलेले नाही. नारायण राणेंवर खोटे आरोप करणे, टीका करणे एवढेच त्यांचे काम आहे. १९९५ पासून नाईक कुटुंबियांकडून नारायण राणे यांनी जमिनी लाटल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, त्यांनी हे पुराव्यानिशी सिद्ध करावे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मोदींमुळेच मते मिळाली होती. तर सन २००९ मध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघातून ४७ हजार मते मिळवूनही शिवसेनेने या मतदारसंघात साधा एक रस्ताही केलेला नाही. खासदार होऊन चार महिने उलटले तरीही विनायक राऊत यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. त्याचा फायदा नारायण राणे यांना होणार असून त्यांचे मताधिक्य वाढणार आहे. कणकवली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून नीतेश राणे यांनी जनतेशी संपर्क साधून विश्वासार्हता निर्माण केली आहे. तर याउलट आमदार प्रमोद जठार यांनी निवडून आल्यानंतर कोणतीही विकासकामे केलेली नाहीत. तसेच त्यांनी जनतेशी संपर्कही ठेवलेला नसल्याचे मतदारांच्या भेटीच्यावेळी निदर्शनास येत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींची सभा घेऊनही काँग्रेसच्या मताधिक्यावर काहीही परिणाम होणार नाही. सुरक्षा यंत्रणेकडून कासार्डे येथील सर्वसामान्यांना वेठीस धरले जात आहे. भाजपाकडून या सभेसाठी एस. टी. बुक करण्यात आल्या आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असून एस. टी. अभावी त्यांची गैरसोय झाली तर त्याबाबत एस. टी. च्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल. सावंतवाडी मतदारसंघातून बाळा गावडेंसह जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात काँग्रेसला निश्चितच विजय मिळेल, असेही सावंत यांनी सांगितले. (वार्ताहर)