शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

विकासावर बोलण्याची हिंमत नाही

By admin | Updated: October 7, 2014 23:40 IST

नारायण राणे : माणगाव येथील प्रचारसभेत विरोधकांवर टीका

माणगाव : माणगाव खोऱ्याचा संपूर्णत: कायापालट व विकासात्मक परिवर्तन होणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील विरोधक केवळ काँग्रेसवर व माझ्यावर टीका करण्याचेच काम करतात. विकासाच्या बाबतीत बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. कारण विकासासाठी यांचा कधीही हातभार नसतो, असे प्रतिपादन काँग्र्रेसचे कुडाळ-मालवण मतदारसंघातील उमेदवार आणि माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी माणगाव येथे केले. माणगाव येथील राधाकृष्ण हॉलमध्ये झालेल्या सभेत राणे बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी माणगाव खोऱ्यातील साळगाव तसेच अन्य ठिकाणी कॉर्नर सभा व विविध गावांना भेटी देऊन गावातील मतदारांच्या भेटी घेतल्या. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी जिल्हा परिषद सदस्य आबा मुंज, सुनील भोगटे, प्रकाश मोर्ये, मधुकर भावे, अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. किशोर शिरोडकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, पांडुरंग कोंडसकर, सरपंच सुनिता सावंत, प्रभाकर परब, विशाल परब, मोहन सावंत, अनिल कुडपकर, काका केसरकर, बच्चू नाईक, सचिन परब, श्रावण धुरी, बाळू भिसे, महेश भिसे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, गेल्या २५ वर्षात तुमच्यामुळे मला अनेक पदे मिळाली. या पदांचा वापर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याचा प्रयत्न राहिला. भाजपवाल्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात शिवसेनेचे योगदान काय? असा सवाल करत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे यांना इथे या म्हणावं. इथे पूर, वादळं येतात. पण ते कधी येतात का? असा प्रश्न केला. मराठी माणसाची परिस्थिती बदलली नाही, पण ठाकरे यांची सुधारली, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)