शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

चोवीस तासानंतरही कारवाई नाही

By admin | Updated: March 15, 2015 00:24 IST

सावंतवाडी पालिकेचा इशारा हवेत : नऊ गाळ्यांचे नव्याने सर्वेक्षण

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिका इंदिरा गांधी संकुलातील नऊ गाळेधारकांचे गाळे चोवीस तासात काढून घेणार, असा इशारा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शुक्रवारी सभागृहात दिला होता. मात्र, चोवीस तास उलटूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पालिकेचा इशारा हवेत विरल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे. दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी त्या नऊ गाळ्यांचा नव्याने सर्व्हे केला आहे. सावंतवाडी नगरपालिकेने इंदिरा गांधी संकुलातील ३९ गाळ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. यातील ९ गाळ्यांवर तातडीने कारवाई करणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते, तशी घोषणा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालिका बैठकीत केली होती. ज्या गाळेधारकांनी गाळ्यांचे नियम पायदळी तुडवले आहेत. त्यांच्यावर येत्या २४ तासात कारवाई करणार आहोत. यात ९ गाळेधारकांचा समावेश आहे. तर अन्य ३० गाळेधारकांनी गाळ्याची भिंत तोडली असून त्यांनाही पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. त्यातील पंधराजणांनी लेखी उत्तरे दिली पण त्यावर पालिका समाधानी नसून त्यांच्यावर काही अंतराने कारवाई केली जाणार आहे. मात्र, ज्या नऊ गाळ्यांवर चोवीस तासात कारवाई करण्यात येणार होती त्याबाबत शहरात कमालीची उत्सुकता होती. नगराध्यक्षांच्या घोषणेनंतर २४ तास उलटून गेले तरी पालिकेने या गाळेधारकांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसून आले. सायंकाळी पालिकेचे अभियंता तानाजी पालव, वरिष्ठ लिपिक आसावरी शिरोडकर, जयप्रकाश कदम, बाबू पिंगुळकर आदींनी ज्या नऊ गाळेधारकांवर कारवाई करायची आहे तसेच ते गाळे ताब्यात घ्यायचे आहेत. त्याचे पुनसर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षण सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. पण कारवाईबाबत बोलण्यास तयार नव्हते. त्यामुळे चोवीस तास उलटल्यानंतर पालिकेची घोषणा हवेत विरल्याची चर्चा सावंतवाडीत व इंदिरा गांधी व्यापारी संकुलात सुरू होती. (प्रतिनिधी)