शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

..तर संबंधितांवर कारवाई करणार

By admin | Updated: June 8, 2016 00:10 IST

शेखर सिंह : जिल्हा परिषद स्थायी समिती सभा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुुदुर्गातील रस्त्यांचा दर्जा दरवर्षी खालावत जात असल्याने रस्ते खराब होत आहेत. पावसात तर रस्त्यांचे डांबर जावून त्याचे डबके तयार होत आहे. संबंधित ठेकेदाराने निविदा प्रक्रियानुसार डांबर, खडी, रवाळी यांचे योग्य प्रमाण नसल्याने रस्त्याची क्वॉलिटी टिकत नसल्याचा आरोप सदस्य सतीश सावंत यांनी करत निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कोणती कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला. निकृष्ट व नादुरुस्त रस्त्यांची शासनाच्या क्वॉलिटी कंट्रोलमार्फत तपासणी करण्यात येणार असून त्यात दोष आढळला तर संबंधित शाखा अभियंता व उपअभियंता यांच्यावर कारवाई होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषद स्थायी समितीची मासिक सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, विषय समिती सभापती दिलीप रावराणे, आत्माराम पालेकर, रत्नप्रभा वळंजू, अंकुश जाधव, समिती सदस्य सतीश सावंत, मधुसूदन बांदिवडेकर, रणजित देसाई, प्रमोद कामत, रेवती राणे, वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, समिती सचिव तसेच पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल बागल, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.सिंधुदुर्गातील १७ प्राथमिक व ८ उच्च प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीच्या बांधकामासाठी शासनाकडून ५१ लाख ६२ हजार रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानाच्या समन्वयक स्मिता नलावडे यांनी दिली. या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे.डोहातला गाळ महामार्गासाठी वापरागावातील नदी व ओहोळामधील डोहात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पाण्याचे स्त्रोत मंद झाले आहेत. पुढील वर्षी हा सर्व गाळ काढून तो महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भरावासाठी वापरावा अशी सूचना सदस्य रणजित देसाई यांनी केली. याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फोंडा येथे शौचालय व गोठ्यांच्या बांधकामे करण्यात आली. मात्र २०१ शौचालय लाभार्थ्यांपैकी केवळ २५ जणांनाच लाभ देण्यात आला आहे. तर १७६ लाभार्थी वंचित राहिले आहेत. तर गोठ्यांचे लाभार्थीही अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना तत्काळ अनुदान वर्ग करा अशा सूचना सदस्य मधुसूदन बांदिवडेकर यांनी केल्या. संबंधित लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येईल असे कमलाकर रणदिवे व डॉ. अनिल बागल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)