शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

...तर सी-वर्ल्ड प्रकल्प अन्यत्र

By admin | Updated: May 20, 2016 22:45 IST

प्रमोद जठार : सिंधुदुर्गातील पयार्यी जागांचा विचार होणार

मालवण : मालवण तालुक्यातील वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित जागतिक दर्जाच्या सी-वर्ल्डबाबत स्थानिक आजही अनुकूल नाहीत. आंतराष्ट्रीय दर्जाच्या असलेल्या प्रकल्पाला स्थानिक भूमिपुत्र विरोध करत असल्यामुळे सी-वर्ल्ड अन्यत्र साकारण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे. पर्यटन क्रांतीत सी-वर्ल्ड हा ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच किमान ३०० ते ४०० एकर जागा उपलब्ध झाल्यास त्याठिकाणी सी-वर्ल्ड साकारला जाईल, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. मालवण येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित भाजपा तालुका कार्यकारिणीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर, विलास हडकर, भाऊ सामंत, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज पेडणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. जठार म्हणाले, सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार आहे. मात्र त्यासाठी वायंगणी तोंडवळी ग्रामस्थांचा विरोध असेल तर तो अन्यत्र हलविला जाईल. मालवणातील पर्यायी जागांचा तसेच सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील प्रकल्पास अनुकूल अशा जागेचा विचार करून त्याठिकाणी भूमिपुत्रांना सोबत घेवूनच सी-वर्ल्ड केला जाईल. विरोधक आपल्यावर पोपटपंची करत असल्याचे आरोप करतात हे त्यांचे काम आहे. मात्र मी केवळ पोपटपंची न करता विकासकामे करून दाखवतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपला विकास करण्यात रस आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्याप्रमाणे ग्रामीण भागात भाजपाच्या माध्यमातून विकास साधायचा आहे, असेही जठार म्हणाले.इच्छुक उमेदवारांसाठी खुले आवाहनमालवण पालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ज्या इच्छुकांना भाजपकडून निवडणूक लढवायची आहे. त्यांनी थेट जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्याशी संपर्क साधावा. प्रामाणिक तसेच जनसंपर्क असलेल्या इच्छुकांना निश्चितच उमेदवारी दिली जाईल. सत्तेच्या माध्यमातून पालिका क्षेत्र व गावाचा विकास करताना या उमेदवारांना बळ दिले जाईल, असेही जठार यांनी सांगितले. त्यामुळे इच्छुकांनी संपर्क साण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)शतप्रतिशत भाजपा हेच धोरणसिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी काळात नगरपंचायत, नगरपालिका तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत युतीबाबत निर्णय घेतलेला नाही. निवडणुका डोळ्यासमोरून ठेवून निवडणूकपूर्व तयारी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आम्ही केवळ पक्षवाढीच्या धोरणाचा विचार करता ध्येयधोरणे राबवणार आहोत. त्यामुळे याचा परिणाम निवडणूक निकालावर काय होतो, विरोधी पक्षांना कसा फायदा होतो याचा विचार न करता केवळ ‘शतप्रतिशत भाजपा’हेच धोरण अवलंबले जाणार आहे, असेही जठार यांनी सांगितले.