शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg News: प्रशासकीय राजवटीत सावंतवाडीकरांना करवाढीचा शाॅक, सर्वपक्षीय आक्रमक 

By अनंत खं.जाधव | Updated: February 28, 2023 17:00 IST

सावंतवाडीत आतापर्यंत झालेली ही सर्वोच्च करवाढ

सावंतवाडी : प्रशासकीय राजवटीत सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने घरपट्टीसह पाणीपट्टीत वाढ केली आहे. करवाढीच्या या निर्णयाविरोधात नागरिकांबरोबरच सर्व पक्षीय चांगलेच आक्रमक झाले आहेत. नगरपालिका प्रशासनाने निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी सर्वपक्षीयाकडून करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपालिकेने सन २०२३-२४ च्या सादर केलेल्या अर्थसंकल्पात घरपट्टीसह पाणीपट्टी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. ही नवीन दर वाढ एक एप्रिल पासून लागू होणार आहे. यात घरपट्टीमध्ये किमान २५ रुपये ते ३९९ पर्यंत सरसकट वाढ करण्यात आली आहे. तर पाणीपट्टीत ही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपरिषदचा अर्थ संकल्प जाहीर करण्यात आला असून प्रशासकीय राजवट असताना नगरपरिषद प्रशासनाकडून दुसऱ्यादा हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध करात भरमसाठ वाढ केल्याने याचा सर्वस्वी बोजा नागरिकांवर पडणार आहे. मोठ्या प्रमाणात कर वाढ करत असताना पालिका प्रशासनाने याबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन प्रत्येकाची मते जाणून घेणे बंधनकारक होती. पण तसे न करता अचानक ही करवाढ केल्याने याचा फटका शहरातील नागरिकांना बसला आहे. सावंतवाडीत आतापर्यंत झालेली ही सर्वोच्च करवाढ मानली जात आहे.

करवाढ मागे घ्या, बबन साळगावकरासह माजी नगरसेवक आक्रमकसावंतवाडी नगरपरिषदने अचानक केलेल्या करवाढीवरून शहरातील लोकप्रतिनिधींसह नागरिकात प्रचंड उद्रेक असून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तर प्रशासनाचा निषेध करत करवाढ मागे न घेतल्यास नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. तसेच ही करवाढ अन्यायकारक असल्याचे सांगितले. एकदम 400 रुपये करवाढ करणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करण्यासारखेच आहे. नगरपालिकेचे उत्पन्न कमी झाले असेल म्हणून एकदम एवढी करवाढ कशी काय होऊ शकते असा सवाल साळगावकर यांनी केला.

भाजप जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार : तेली नागरीकांना कोणतीही कल्पना न देता तसेच राजकीय पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता सावंतवाडी पालिका प्रशासनाने वाढवलेली घरपट्टी व पाणी पट्टी अन्याय करणारी आहे. त्यामुळे या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आपण जिल्हाधिकार्‍यांकडे करणार असल्याचे  भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले. नगर पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना घरपट्टी पाणीपट्टी वाढविण्याची इतकी घाई का ? याबाबतचा फेरविचार मुख्याधिकार्‍यांनी करावा, जर यावर काही मार्ग निघाला नाही तर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग