शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

Sindhudurg News: प्रशासकीय राजवटीत सावंतवाडीकरांना करवाढीचा शाॅक, सर्वपक्षीय आक्रमक 

By अनंत खं.जाधव | Updated: February 28, 2023 17:00 IST

सावंतवाडीत आतापर्यंत झालेली ही सर्वोच्च करवाढ

सावंतवाडी : प्रशासकीय राजवटीत सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने घरपट्टीसह पाणीपट्टीत वाढ केली आहे. करवाढीच्या या निर्णयाविरोधात नागरिकांबरोबरच सर्व पक्षीय चांगलेच आक्रमक झाले आहेत. नगरपालिका प्रशासनाने निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी सर्वपक्षीयाकडून करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपालिकेने सन २०२३-२४ च्या सादर केलेल्या अर्थसंकल्पात घरपट्टीसह पाणीपट्टी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. ही नवीन दर वाढ एक एप्रिल पासून लागू होणार आहे. यात घरपट्टीमध्ये किमान २५ रुपये ते ३९९ पर्यंत सरसकट वाढ करण्यात आली आहे. तर पाणीपट्टीत ही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपरिषदचा अर्थ संकल्प जाहीर करण्यात आला असून प्रशासकीय राजवट असताना नगरपरिषद प्रशासनाकडून दुसऱ्यादा हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध करात भरमसाठ वाढ केल्याने याचा सर्वस्वी बोजा नागरिकांवर पडणार आहे. मोठ्या प्रमाणात कर वाढ करत असताना पालिका प्रशासनाने याबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन प्रत्येकाची मते जाणून घेणे बंधनकारक होती. पण तसे न करता अचानक ही करवाढ केल्याने याचा फटका शहरातील नागरिकांना बसला आहे. सावंतवाडीत आतापर्यंत झालेली ही सर्वोच्च करवाढ मानली जात आहे.

करवाढ मागे घ्या, बबन साळगावकरासह माजी नगरसेवक आक्रमकसावंतवाडी नगरपरिषदने अचानक केलेल्या करवाढीवरून शहरातील लोकप्रतिनिधींसह नागरिकात प्रचंड उद्रेक असून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तर प्रशासनाचा निषेध करत करवाढ मागे न घेतल्यास नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. तसेच ही करवाढ अन्यायकारक असल्याचे सांगितले. एकदम 400 रुपये करवाढ करणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करण्यासारखेच आहे. नगरपालिकेचे उत्पन्न कमी झाले असेल म्हणून एकदम एवढी करवाढ कशी काय होऊ शकते असा सवाल साळगावकर यांनी केला.

भाजप जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार : तेली नागरीकांना कोणतीही कल्पना न देता तसेच राजकीय पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता सावंतवाडी पालिका प्रशासनाने वाढवलेली घरपट्टी व पाणी पट्टी अन्याय करणारी आहे. त्यामुळे या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आपण जिल्हाधिकार्‍यांकडे करणार असल्याचे  भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले. नगर पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना घरपट्टी पाणीपट्टी वाढविण्याची इतकी घाई का ? याबाबतचा फेरविचार मुख्याधिकार्‍यांनी करावा, जर यावर काही मार्ग निघाला नाही तर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग