शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

सरकारची भूमिका सौम्य नाही पण प्रकल्प स्थानिकांना विचारूनच - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 21:00 IST

धर्मेद्र प्रधान यांच्या विधानावर भाष्य, रिफायनरी विदर्भात नेणे हा टेक्निकल मुद्दा : लोकमत शी संवाद

अनंत जाधव 

वेंगुर्ले :लोकशाहीत लोकांची भूमिका महत्वाची असते.त्यामुळे जेथे लोकांचा विरोध नसेल तेथे रिफायनरी  प्रकल्प व्हावा ही आमची पहिल्यापासून भुमिका आहे.त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची भुमिका रिफायनरी बाबत सौम्य झाली असा अर्थ कोणी घेऊ नये यात प्रकल्पातून रोजगार येणार असतो त्यामुळे तेथे कोणीही राजकारण करत नाही असा टोला राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रिय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांना लगावला.तसेच रिफायनरी विदर्भात घेऊन जावू या मंत्री नितिन गडकरी यांच्या वक्तव्यावर हा टेक्निकल मुद्दा असल्याचे म्हणत यावर भाष्य करणे टाळल्याचे दिसून आले.

मंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी वेगुर्ले येथे लोकमत शी संवाद साधत रिफायनरी प्रकल्प तसेच केंद्रिय मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या वक्तव्यावर आपली भूमिका मांडली. लोकशाहीत आम्ही लोकांच्या भूमिकेला अधिक महत्त्व देतो त्यांनी नाणार येथील जागेला विरोध केल्याने आम्ही स्थानिकांच्या पाठीशी राहिलो पण हा प्रकल्प महाराष्ट्रातच व्हावा ही महाविकास आघाडीची भूमिका असून,उद्योग विभाग त्या प्रमाणे जागेचा ही शोध घेत आहे.लवकरच चांगली बातमी तुम्हाला समजेल असे म्हणत रिफायनरी प्रकल्प नाणार येथून जाणार असे संकेत ही त्यानी यावेळी दिले आहेत.मात्र प्रकल्प कुठे होणार हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

मध्यंतरी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी रिफायनरी प्रकल्पाला कोकणात विरोध असेल तर विदर्भात घेऊन जाऊ या त्यांच्या भूमिकेवर ही मंत्री ठाकरे यांनी भाष्य केले हा टेक्निकल मुद्दा आहे शेवट पाण्याचा प्रश्न येतोच असे सागितले तर पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी रिफायनरी बाबत महाविकास आघाडीची भुमिका सौम्य झाल्याचे म्हटले होते.पण मंत्री ठाकरे यांनी प्रकल्पात राजकारण करायचे नसते.लोकशाहीत लोकांच्या भूमिकेला महत्त्व असते.महाविकास आघाडी सरकारचा प्रकल्पाला विरोध नाही.असे सांगत जागेचा शोध सुरू असून लवकरच त्यावर मार्ग काढू असे ही यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे