शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चक्रीवादळातील नुकसानीचा अहवालच वरिष्ठ कार्यालयाना पाठवला नाही!, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उघड केली धक्कादायक बाब

By सुधीर राणे | Updated: May 28, 2024 17:21 IST

कणकवली तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार

कणकवली: कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये चक्रीवादळाने १५ दिवसांपूर्वी मोठे नुकसान झाले. यात फळबागायतींचा देखील समावेश आहे. या फळबागायतींचे पंचनामे कृषी सहायकांमार्फत झाल्यानंतर त्याचा अहवाल तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला पाठवण्याची गरज होती. मात्र,दोन्ही कार्यालयाना तो अहवाल लेखी स्वरुपात पाठवलेला नाही, अशी धक्कादायक बाब मंगळवारी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उघड केली. याबाबत प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्याशी शिष्टमंडळाने संपर्क साधला असता, अहवाल पाठवला आहे.त्याबाबत नंतर सांगतो, मी ओरोसला आहे .असे सांगत  उडवाउडवीची  उत्तरे दिली. त्यामुळे महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ संतप्त झाले.कणकवली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे या चक्रीवादळात नुकसान झाले आहे. यातील काही शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी सहायकांमार्फत करण्यात आले. मात्र केलेल्या पंचनाम्याचा अहवाल हा तातडीने देण्याची गरज होती. तो दिलेला नसल्याने  शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची भीती असल्याची बाब महाविकास आघाडीच्या निदर्शनास आली. त्यामुळे  उद्धवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर मंगळवारी धडक दिली. यावेळी कृषी अधिकारी कार्यालयात जबाबदार अधिकारी जागेवर नसल्याची बाब निदर्शनास आली.त्यामुळे प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्याशी सुशांत नाईक यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सारवासारव करणारी उत्तरे देत अहवाल पाठवला अशी माहिती दिली. याच दरम्यान तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्याशी देखील नाईक यांनी संपर्क साधला. त्यांनी चक्रीवादळाबाबत कृषी विभागाचा नुकसानीचा अहवाल आपल्याकडे अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती दिली. त्यावर शिष्टमंडळाने कृषी अधीक्षक कार्यालयाकडे अहवाल पाठवला तर त्याची प्रत दाखवा.  आवक-जावक रजिस्टरची नोंद दाखवा अशी मागणी उपस्थित अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या कृषी पर्यवेक्षक सावंत यांनी अहवाल पाठवलेला व्हाट्सअपचा मेसेज दाखवला. यावर शिष्टमंडळाने संतप्त भूमिका घेत व्हाट्सअपवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल पाठवून त्यांची चेष्टा करता काय? असा सवाल उपस्थित केला. यावेळी अर्जुन जाधव यांना तहसीलदार कार्यालयात बोलावून घेत त्यांच्याकडून याबाबतची सविस्तर माहिती घ्या व उद्या या संदर्भातील बैठक घ्या अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे केली. तर मंगळवारी संध्याकाळपर्यंत तहसीलदार कार्यालयाला व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला जर अहवाल पाठवला नाही , तर कृषी विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी दिला. तसेच प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. जबाबदारी झटकून देण्याचा प्रयत्न करून तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न असे अधिकारी करत असतील तर महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना हीसका दाखवेल, असा इशारा देखील देण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, युवा सेना समन्वयक राजू राठोड, रोहित राणे, जय धुमाळे, संतोष पुजारे, प्रसाद अंधारी, रवी भंडारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcycloneचक्रीवादळMahavikas Aghadiमहाविकास आघाडी