शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी धोक्यात, शिवरायांच्या ऐतिहासिक वास्तूंना लागली घरघर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 16, 2022 18:27 IST

सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने समुद्राला उधाण आहे. विजयदुर्गची तटबंदीला फुगवटा आला आहे. त्यामुळे जोराच्या लाटांनी तटबंदीला भेगा जावू शकतात.

सिंधुदुर्ग : शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून ओळख असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी वर्षानुवर्ष धोक्यात येत चालली आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने समुद्राला उधाण आहे. विजयदुर्गची तटबंदीला फुगवटा आला आहे. त्यामुळे जोराच्या लाटांनी तटबंदीला भेगा जावू शकतात.मागील दोन वर्षांपासून माजी खासदार संभाजीराजेंनी याबाबत पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले होते. संभाजीराजेंनी गतवर्षी विजयदुर्ग किल्ल्याच्या ढासळत चाललेल्या तंटबंदीची पाहणी केली होती. तसेच या समस्येकडे केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, शासनाच्या पुरातत्व विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने याकडे लक्ष देऊन होणारी पडझड रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.शासनाला जाग कधी येणारहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अलौकिक कार्यकर्तृत्वाने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक किल्ल्यांना अखेरची घरघर लागली आहे. किल्ल्यांचा इतिहास लुप्त झाल्यानंतर सरकारला जाग येणार का? अशी विचारणा आता शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमींमधून होत आहे.संभाजीराजेंनी पुन्हा लक्ष वेधलेकोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळगडनंतर विशाळगडावरही बुरुज ढासळल्याने दोन्ही किल्ल्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या दोन किल्ल्यांची पडझड मनाला वेदना देत असतानाच मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र आणि शिवरायांनी पुर्नबांधणी करून घेतलेला विजयदुर्गही आता संकटात सापडला आहे. आता या संदर्भात माजी खासदार संभाजीराजे यांनी गडाची तटबंदीला फुगवटा आल्याने केंद्र सरकार, राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी या संदर्भात २०२० मध्येच पत्रव्यवहार करून डागडूजी करण्यासाठी विनंती केली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगड