शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कणकवलीतील उड्डाणपुलाला भालचंद्र महाराजांचे नाव

By सुधीर राणे | Updated: January 29, 2024 12:16 IST

कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवली शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाला अखेर परमहंस भालचंद्र महाराज उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. ...

कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवली शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाला अखेर परमहंस भालचंद्र महाराज उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. परमहंस भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सुरू असताना कणकवलीवासीयांकडून  सोमवारी पहाटेच्या सुमारास हे नामकरण करण्यात आले. कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये बाजारपेठकडे येणाऱ्या रस्त्याच्या दिशेने हा नामकरण फलक लावण्यात आला आहे.  या फलकावर परमहंस भालचंद्र महाराज यांच्यासह अप्पासाहेब पटवर्धन यांचे छायाचित्र व श्री स्वयंभू, रवळनाथ या ग्रामदेवतांचे नाव देखील आहे. कणकवली शहरातील महामार्ग उड्डाण पुलाला भालचंद्र महाराज यांच्या सोबतच अप्पासाहेब पटवर्धन यांचे नाव देण्याची ही मागणी काही वर्ष सुरू होती. अद्यापपर्यंत या उड्डाणपुलाला नाव देण्या बाबत केवळ चर्चा झालेल्या असताना प्रशासकीय पातळीवरून याबाबत कोणत्याही हालचाली होत नव्हत्या. दरम्यान, सोमवारी कणकवली शहरात पहाटे घडलेली ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. रविवारी रात्रीपासूनच याबाबतची कुजबूज कणकवली शहरात चालू होती. त्यानंतर सोमवारी सकाळी भालचंद्र महाराज यांच्या नावाने उड्डाणपूलाचे नामकरण करण्यात आले. त्यामुळे कणकवली शहरातील उड्डाणपूल आता यापुढे भालचंद्र महाराज उड्डाणपूल या नावाने ओळखले जाणार आहे.

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यापूर्वी अनेकदा स्थलांतरित करण्याबाबत चर्चा झाल्या होत्या. हा पुतळा देखील पहाटे चार वाजण्याच्या सुमारास स्थलांतरित करण्यात आला होता. गेली अनेक वर्ष सुरू असलेला हा प्रलंबित प्रश्न महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर चुटकीसरशी सुटला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कणकवली शहरात पहाटेच्या प्रहरी ही एक महत्त्वपूर्ण घटना घडल्याने कणकवलीच्या इतिहासात या पहाटेची पुन्हा एकदा वैशिष्ट्यपूर्ण अशी नोंद होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग