शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत दहा हजार वीजजोडण्या

By admin | Updated: August 22, 2014 23:20 IST

महावितरण : वर्षभरात निवासी इमारतींच्या संख्येत मोठी भर

रत्नागिरी : अपार्टमेंट्सच्या वाढत्या संख्येमुळे महावितरणच्या वीज जोडण्यांच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १० हजार ११५ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३,१९९ म्हणजेच ३१ टक्के जोडण्या फक्त रत्नागिरी विभागात देण्यात आल्या. रत्नागिरीत अपार्टमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरात ७,८६६ घरगुती वीज मीटरच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. ११५७ वाणिज्य मीटर, ८५ औद्योगिक मीटर देण्यात आले आहेत. पथदीप १९२, तर कृषीपंप ६५६ देण्यात आले आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठाचे ५०, तर उच्च दाबाच्या औद्योगिक वीज जोडण्या ४ दिल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १० हजार ११५ वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत.रत्नागिरी विभागात घरगुती २५०७, वाणिज्य ४०६, पथदीप २८, औद्योगिक ४७, सार्वजनिक पाणीपुरवठा १८९, लघुदाबाच्या अन्य १६ जोडण्या मिळून ३,१९९ जोडण्या देण्यात आल्या आहेत. चिपळूण विभागात घरगुती १३९२, वाणिज्य १७६, पथदीप २०, औद्योगिक ९, कृषिपंप ४६, पाणीपुरवठा ५ मिळून १६४४ नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. खेड विभागात घरगुती १२०६, वाणिज्य १७८, औद्योगिक १५, कृषिपंप ८८, सार्वजनिक पाणीपुरवठा १३, अन्य १९ मिळून १५१३ नवीन जोडण्या वर्षभरात देण्यात आल्या. तिन्ही विभागांचा विचार करता रत्नागिरी विभागात सर्वाधिक जोडण्यात दिसून येत आहेत.मुंबई, पुणेच्याबरोबरीनेच कोकणात स्वत:चे घर असावे, अशा सेकंड होमची मागणी गेल्या काही वर्षांत वाढली आहे. परिणामी नवीन जोडण्या वाढत असलेल्या दिसून येत आहेत. घरे बांधण्याच्या तुलनेत इमारती अधिक आहेत.त्यासाठी जोडणीची गरज आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड विभागांचा विचार करता रत्नागिरी विभागात वीज जोडण्यांना मागणी दिसून येत आहे. रत्नागिरीत घरे घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नवीन इमारतींचे बांधकाम वाढत आहे. त्यामुळे घरगुती मीटरमध्ये वाढ होत आहे.एस. पी. नागटिळक, महावितरण रत्नागिरी.