शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

रत्नागिरीत दहा हजार वीजजोडण्या

By admin | Updated: August 22, 2014 23:20 IST

महावितरण : वर्षभरात निवासी इमारतींच्या संख्येत मोठी भर

रत्नागिरी : अपार्टमेंट्सच्या वाढत्या संख्येमुळे महावितरणच्या वीज जोडण्यांच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १० हजार ११५ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३,१९९ म्हणजेच ३१ टक्के जोडण्या फक्त रत्नागिरी विभागात देण्यात आल्या. रत्नागिरीत अपार्टमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरात ७,८६६ घरगुती वीज मीटरच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. ११५७ वाणिज्य मीटर, ८५ औद्योगिक मीटर देण्यात आले आहेत. पथदीप १९२, तर कृषीपंप ६५६ देण्यात आले आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठाचे ५०, तर उच्च दाबाच्या औद्योगिक वीज जोडण्या ४ दिल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १० हजार ११५ वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत.रत्नागिरी विभागात घरगुती २५०७, वाणिज्य ४०६, पथदीप २८, औद्योगिक ४७, सार्वजनिक पाणीपुरवठा १८९, लघुदाबाच्या अन्य १६ जोडण्या मिळून ३,१९९ जोडण्या देण्यात आल्या आहेत. चिपळूण विभागात घरगुती १३९२, वाणिज्य १७६, पथदीप २०, औद्योगिक ९, कृषिपंप ४६, पाणीपुरवठा ५ मिळून १६४४ नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. खेड विभागात घरगुती १२०६, वाणिज्य १७८, औद्योगिक १५, कृषिपंप ८८, सार्वजनिक पाणीपुरवठा १३, अन्य १९ मिळून १५१३ नवीन जोडण्या वर्षभरात देण्यात आल्या. तिन्ही विभागांचा विचार करता रत्नागिरी विभागात सर्वाधिक जोडण्यात दिसून येत आहेत.मुंबई, पुणेच्याबरोबरीनेच कोकणात स्वत:चे घर असावे, अशा सेकंड होमची मागणी गेल्या काही वर्षांत वाढली आहे. परिणामी नवीन जोडण्या वाढत असलेल्या दिसून येत आहेत. घरे बांधण्याच्या तुलनेत इमारती अधिक आहेत.त्यासाठी जोडणीची गरज आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड विभागांचा विचार करता रत्नागिरी विभागात वीज जोडण्यांना मागणी दिसून येत आहे. रत्नागिरीत घरे घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नवीन इमारतींचे बांधकाम वाढत आहे. त्यामुळे घरगुती मीटरमध्ये वाढ होत आहे.एस. पी. नागटिळक, महावितरण रत्नागिरी.