शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

शैक्षणिक धोरणाचा अधिकार शिक्षकांना हवा

By admin | Updated: April 24, 2017 21:45 IST

सावळाराम अणावकर : प्राथमिक शिक्षक समिती वैभववाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन

वैभववाडी : शिक्षण क्षेत्राचे धोरण ठरविण्याचा अधिकार हा शिक्षकांनाच असला पाहिजे, असे मत राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी व्यक्त केले. प्राथमिक शिक्षक समितीच्या वैभववाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन कोकीसरे येथील माधवराव पवार विद्यालयात झाले. यावेळी अणावकर बोलत होते. यावेळी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पल्लवी झिमाळ, पंचायत समिती सदस्य अक्षता डाफळे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, विस्तार अधिकारी शोभराज शेर्लेकर, तहसीलदारपदी निवड झालेल्या चैताली सावंत, शिक्षक नेते भालचंद्र चव्हाण, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, तालुकाध्यक्ष संतोष मोरे, शरद नारकर, सुरेखा कदम, नामदेव जांभवडेकर, किसन दुखंडे, सुनील चव्हाण, सुगंध तांबे, विनोद कदम, राजन जोशी, आदी उपस्थित होते. यावेळी अणावकर यांनी आरोग्य व शिक्षण क्षेत्र ‘कंत्राटी’ पद्धतीपासून अलिप्त ठेवायला हवे, असे सांगितले. लोकप्रतिनिधींनी शिक्षकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. शिक्षक काम करतो तेथील सामाजिक, आर्थिक स्थितीचे अवलोकन होणेही तितकेच गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.अणावकर पुढे म्हणाले की, शिक्षकांवर शिक्षणापेक्षा अशैक्षणिक अतिरिक्त कामाचा बोजा अधिक आहे. शिक्षकांना एकीकडे आपण ‘शिल्पकार’ म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांनाच उपेक्षित ठेवायचे हे योग्य नाही. शिक्षण क्षेत्रातील अडचणी लोकप्रतिनिधींनी समजून घेतल्या पाहिजेत, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे शिक्षकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी संघटित होऊन लढले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.समाजकल्याण सभापती शारदा कांबळे म्हणाल्या, उत्पन्नाचा केवळ ३ ते ४ टक्के खर्च शासन शिक्षणावर करते. शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत देशाचे भावी नागरिक बनविण्याचे काम करतात. त्यामुळे राष्ट्रहिताचा विचार करून सरकारने शिक्षणावरील गुंतवणुकीत वाढ करण्याची गरज आहे. यावेळी सभापती रावराणे, उपसभापती हरयाण, सुधीर नकाशे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)२२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपयावेळी शिक्षक समितीच्यावतीने तालुक्यातील गरीब व अनाथ २२ मुलांना शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. तसेच नवोदय विद्यालय व अन्य परीक्षेतील ११ गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अधिवेशनाचे प्रास्ताविक सचिव लक्ष्मण ढवण यांनी केले, तर अध्यक्ष संतोष मोरे यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा सांगितला. सूत्रसंचालन समीर सरवणकर व महादेव शेट्ये यांनी केले. अतिश कांबळे यांनी आभार मानले.शिक्षणावरील गुंतवणूक वाढली पाहिजेआज शिक्षक सुखी आहे; पण शिक्षणाला शिक्षकाचे अस्तित्व नाही. अशी खंत अणावकर यांनी व्यक्त केली. शिक्षणावर होणारा खर्च हीच खरी देशाची गुंतवणूक आहे. ती गुंतवणूक वाढतेय की कमी होतेय हे पाहणे गरजेचे आहे. शिक्षणावरील खर्च वाढविला गेला नाही तर ते भविष्यात देशापुढील मोठे संकट असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.