शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शैक्षणिक धोरणाचा अधिकार शिक्षकांना हवा

By admin | Updated: April 24, 2017 21:45 IST

सावळाराम अणावकर : प्राथमिक शिक्षक समिती वैभववाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन

वैभववाडी : शिक्षण क्षेत्राचे धोरण ठरविण्याचा अधिकार हा शिक्षकांनाच असला पाहिजे, असे मत राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी व्यक्त केले. प्राथमिक शिक्षक समितीच्या वैभववाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन कोकीसरे येथील माधवराव पवार विद्यालयात झाले. यावेळी अणावकर बोलत होते. यावेळी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पल्लवी झिमाळ, पंचायत समिती सदस्य अक्षता डाफळे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, विस्तार अधिकारी शोभराज शेर्लेकर, तहसीलदारपदी निवड झालेल्या चैताली सावंत, शिक्षक नेते भालचंद्र चव्हाण, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, तालुकाध्यक्ष संतोष मोरे, शरद नारकर, सुरेखा कदम, नामदेव जांभवडेकर, किसन दुखंडे, सुनील चव्हाण, सुगंध तांबे, विनोद कदम, राजन जोशी, आदी उपस्थित होते. यावेळी अणावकर यांनी आरोग्य व शिक्षण क्षेत्र ‘कंत्राटी’ पद्धतीपासून अलिप्त ठेवायला हवे, असे सांगितले. लोकप्रतिनिधींनी शिक्षकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. शिक्षक काम करतो तेथील सामाजिक, आर्थिक स्थितीचे अवलोकन होणेही तितकेच गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.अणावकर पुढे म्हणाले की, शिक्षकांवर शिक्षणापेक्षा अशैक्षणिक अतिरिक्त कामाचा बोजा अधिक आहे. शिक्षकांना एकीकडे आपण ‘शिल्पकार’ म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांनाच उपेक्षित ठेवायचे हे योग्य नाही. शिक्षण क्षेत्रातील अडचणी लोकप्रतिनिधींनी समजून घेतल्या पाहिजेत, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे शिक्षकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी संघटित होऊन लढले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.समाजकल्याण सभापती शारदा कांबळे म्हणाल्या, उत्पन्नाचा केवळ ३ ते ४ टक्के खर्च शासन शिक्षणावर करते. शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत देशाचे भावी नागरिक बनविण्याचे काम करतात. त्यामुळे राष्ट्रहिताचा विचार करून सरकारने शिक्षणावरील गुंतवणुकीत वाढ करण्याची गरज आहे. यावेळी सभापती रावराणे, उपसभापती हरयाण, सुधीर नकाशे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)२२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपयावेळी शिक्षक समितीच्यावतीने तालुक्यातील गरीब व अनाथ २२ मुलांना शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. तसेच नवोदय विद्यालय व अन्य परीक्षेतील ११ गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अधिवेशनाचे प्रास्ताविक सचिव लक्ष्मण ढवण यांनी केले, तर अध्यक्ष संतोष मोरे यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा सांगितला. सूत्रसंचालन समीर सरवणकर व महादेव शेट्ये यांनी केले. अतिश कांबळे यांनी आभार मानले.शिक्षणावरील गुंतवणूक वाढली पाहिजेआज शिक्षक सुखी आहे; पण शिक्षणाला शिक्षकाचे अस्तित्व नाही. अशी खंत अणावकर यांनी व्यक्त केली. शिक्षणावर होणारा खर्च हीच खरी देशाची गुंतवणूक आहे. ती गुंतवणूक वाढतेय की कमी होतेय हे पाहणे गरजेचे आहे. शिक्षणावरील खर्च वाढविला गेला नाही तर ते भविष्यात देशापुढील मोठे संकट असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.