शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

शैक्षणिक धोरणाचा अधिकार शिक्षकांना हवा

By admin | Updated: April 24, 2017 21:45 IST

सावळाराम अणावकर : प्राथमिक शिक्षक समिती वैभववाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन

वैभववाडी : शिक्षण क्षेत्राचे धोरण ठरविण्याचा अधिकार हा शिक्षकांनाच असला पाहिजे, असे मत राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी व्यक्त केले. प्राथमिक शिक्षक समितीच्या वैभववाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन कोकीसरे येथील माधवराव पवार विद्यालयात झाले. यावेळी अणावकर बोलत होते. यावेळी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पल्लवी झिमाळ, पंचायत समिती सदस्य अक्षता डाफळे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, विस्तार अधिकारी शोभराज शेर्लेकर, तहसीलदारपदी निवड झालेल्या चैताली सावंत, शिक्षक नेते भालचंद्र चव्हाण, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, तालुकाध्यक्ष संतोष मोरे, शरद नारकर, सुरेखा कदम, नामदेव जांभवडेकर, किसन दुखंडे, सुनील चव्हाण, सुगंध तांबे, विनोद कदम, राजन जोशी, आदी उपस्थित होते. यावेळी अणावकर यांनी आरोग्य व शिक्षण क्षेत्र ‘कंत्राटी’ पद्धतीपासून अलिप्त ठेवायला हवे, असे सांगितले. लोकप्रतिनिधींनी शिक्षकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. शिक्षक काम करतो तेथील सामाजिक, आर्थिक स्थितीचे अवलोकन होणेही तितकेच गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.अणावकर पुढे म्हणाले की, शिक्षकांवर शिक्षणापेक्षा अशैक्षणिक अतिरिक्त कामाचा बोजा अधिक आहे. शिक्षकांना एकीकडे आपण ‘शिल्पकार’ म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांनाच उपेक्षित ठेवायचे हे योग्य नाही. शिक्षण क्षेत्रातील अडचणी लोकप्रतिनिधींनी समजून घेतल्या पाहिजेत, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे शिक्षकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी संघटित होऊन लढले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.समाजकल्याण सभापती शारदा कांबळे म्हणाल्या, उत्पन्नाचा केवळ ३ ते ४ टक्के खर्च शासन शिक्षणावर करते. शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत देशाचे भावी नागरिक बनविण्याचे काम करतात. त्यामुळे राष्ट्रहिताचा विचार करून सरकारने शिक्षणावरील गुंतवणुकीत वाढ करण्याची गरज आहे. यावेळी सभापती रावराणे, उपसभापती हरयाण, सुधीर नकाशे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)२२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपयावेळी शिक्षक समितीच्यावतीने तालुक्यातील गरीब व अनाथ २२ मुलांना शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. तसेच नवोदय विद्यालय व अन्य परीक्षेतील ११ गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अधिवेशनाचे प्रास्ताविक सचिव लक्ष्मण ढवण यांनी केले, तर अध्यक्ष संतोष मोरे यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा सांगितला. सूत्रसंचालन समीर सरवणकर व महादेव शेट्ये यांनी केले. अतिश कांबळे यांनी आभार मानले.शिक्षणावरील गुंतवणूक वाढली पाहिजेआज शिक्षक सुखी आहे; पण शिक्षणाला शिक्षकाचे अस्तित्व नाही. अशी खंत अणावकर यांनी व्यक्त केली. शिक्षणावर होणारा खर्च हीच खरी देशाची गुंतवणूक आहे. ती गुंतवणूक वाढतेय की कमी होतेय हे पाहणे गरजेचे आहे. शिक्षणावरील खर्च वाढविला गेला नाही तर ते भविष्यात देशापुढील मोठे संकट असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.