शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

शैक्षणिक धोरणाचा अधिकार शिक्षकांना हवा

By admin | Updated: April 24, 2017 21:45 IST

सावळाराम अणावकर : प्राथमिक शिक्षक समिती वैभववाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन

वैभववाडी : शिक्षण क्षेत्राचे धोरण ठरविण्याचा अधिकार हा शिक्षकांनाच असला पाहिजे, असे मत राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी व्यक्त केले. प्राथमिक शिक्षक समितीच्या वैभववाडी शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन कोकीसरे येथील माधवराव पवार विद्यालयात झाले. यावेळी अणावकर बोलत होते. यावेळी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पल्लवी झिमाळ, पंचायत समिती सदस्य अक्षता डाफळे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, विस्तार अधिकारी शोभराज शेर्लेकर, तहसीलदारपदी निवड झालेल्या चैताली सावंत, शिक्षक नेते भालचंद्र चव्हाण, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, तालुकाध्यक्ष संतोष मोरे, शरद नारकर, सुरेखा कदम, नामदेव जांभवडेकर, किसन दुखंडे, सुनील चव्हाण, सुगंध तांबे, विनोद कदम, राजन जोशी, आदी उपस्थित होते. यावेळी अणावकर यांनी आरोग्य व शिक्षण क्षेत्र ‘कंत्राटी’ पद्धतीपासून अलिप्त ठेवायला हवे, असे सांगितले. लोकप्रतिनिधींनी शिक्षकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. शिक्षक काम करतो तेथील सामाजिक, आर्थिक स्थितीचे अवलोकन होणेही तितकेच गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.अणावकर पुढे म्हणाले की, शिक्षकांवर शिक्षणापेक्षा अशैक्षणिक अतिरिक्त कामाचा बोजा अधिक आहे. शिक्षकांना एकीकडे आपण ‘शिल्पकार’ म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांनाच उपेक्षित ठेवायचे हे योग्य नाही. शिक्षण क्षेत्रातील अडचणी लोकप्रतिनिधींनी समजून घेतल्या पाहिजेत, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे शिक्षकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी संघटित होऊन लढले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.समाजकल्याण सभापती शारदा कांबळे म्हणाल्या, उत्पन्नाचा केवळ ३ ते ४ टक्के खर्च शासन शिक्षणावर करते. शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत देशाचे भावी नागरिक बनविण्याचे काम करतात. त्यामुळे राष्ट्रहिताचा विचार करून सरकारने शिक्षणावरील गुंतवणुकीत वाढ करण्याची गरज आहे. यावेळी सभापती रावराणे, उपसभापती हरयाण, सुधीर नकाशे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)२२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपयावेळी शिक्षक समितीच्यावतीने तालुक्यातील गरीब व अनाथ २२ मुलांना शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. तसेच नवोदय विद्यालय व अन्य परीक्षेतील ११ गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अधिवेशनाचे प्रास्ताविक सचिव लक्ष्मण ढवण यांनी केले, तर अध्यक्ष संतोष मोरे यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा सांगितला. सूत्रसंचालन समीर सरवणकर व महादेव शेट्ये यांनी केले. अतिश कांबळे यांनी आभार मानले.शिक्षणावरील गुंतवणूक वाढली पाहिजेआज शिक्षक सुखी आहे; पण शिक्षणाला शिक्षकाचे अस्तित्व नाही. अशी खंत अणावकर यांनी व्यक्त केली. शिक्षणावर होणारा खर्च हीच खरी देशाची गुंतवणूक आहे. ती गुंतवणूक वाढतेय की कमी होतेय हे पाहणे गरजेचे आहे. शिक्षणावरील खर्च वाढविला गेला नाही तर ते भविष्यात देशापुढील मोठे संकट असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.