शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात टीबीमुक्त ग्रामपंचायत मोहिमेला सुरुवात

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 27, 2024 18:39 IST

पात्र ग्रामपंचायतींना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक देणार

सिंधुदुर्ग : केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी आता क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. टीबीमुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.या ग्रामपंचायतींचे व्हेरिफिकेशन सुरू असून पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या लवकरच जाहीर केली जाणार आहे. या स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त असल्यास कांस्यपदक, दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रजत आणि तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहिल्यास सुवर्णपदक देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. जाधव म्हणाले की, केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी आता क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात क्षयरुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे, तसेच जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय अधिकारी, डॉक्टर आदींचा एक रुग्ण सहाय्यता समूह तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये टीबीमुक्त ग्रामपंचायतीसाठी क्षय रोगाचे निकष पूर्ण केल्यास ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. या उपक्रमात १००० लोकसंख्येमध्ये कमीत कमी ३० टीबी संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची थुंकी नमुन्याची तपासणी करायची आहे. त्यामध्ये एक किंवा कमी (निरंक) रुग्ण आढळल्यास ग्रामपंचायत पात्र ठरणार आहे. क्षयरोग दूर करण्यासाठी पंचायतींमध्ये स्पर्धा निर्माण करणे आणि त्यांच्या योगदानाचे सार्वजनिकरीत्या कौतुक करणे, असे या उपक्रमाचे उद्देश असल्याचे डॉ. हर्षल जाधव यांनी सांगितले.

तसेच या स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त असल्यास कांस्यपदक, दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रजत आणि तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहिल्यास सुवर्णपदक देण्यात येणार असून या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींचे व्हेरिफिकेशन सुरू असून पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या लवकरच जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायत