शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनावर ओढले ताशेरे

By admin | Updated: May 27, 2016 22:28 IST

समाजकल्याण समिती सभा : प्रशासनाला घरचा आहेर ; कर्मचाऱ्यांना खडेबोल

सिंधुदुर्गनगरी : जिल्हापरिषद सर्वसाधारण सभा होऊन तीन महिने होत असताना ३ टक्के अपंग निधीच्या विविध योजनांची निश्चितीच झालेली नाही. जिल्हापरिषद प्रशासनाने अद्याप समाजकल्याण विभागाला योजना दिल्या नाहीत. समाजकल्याण विभागाचे सचिव वारंवार बदलत असल्याने धोरणात्मक निर्णय होत नाहीत. म्हणून प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे आपण या ठिकाणी बसायला इच्छुक नाही, असे सत्ताधारी पक्षाचे समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी सभेत स्पष्ट करत प्रशासनाला घरचा आहेर दिला. जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची मासिक सभा सभासद अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्य सुकन्या नरसुले, निकिता तानवडे, आस्था सर्पे, समिती सचिव एस. बी. शिरसाट, अधिकारी, खातेप्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. अपंगांसाठी यावर्षी नवीन २२ योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचे मागील जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरले असतानाही अद्याप या योजना का तयार केल्या नाहीत? असा सवाल सभापती अंकुश जाधव यांनी समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना विचारला. जिल्हापरिषद प्रशासनानेच अद्याप समाजकल्याण विभागाला योजना दिलेली नसल्याचे समोर येताच अंकुश जाधव आक्रमक बनले. तुमचा पाठपुरावा कमी पडल्याने अद्याप योजना तयार झाल्या नाहीत. जबाबदारी पेलता येत नसेल तर पदाचा राजीनामा द्या व घरी बसा, आमच्यावर उपकार करत नाही आहात, असे खडेबोल समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना सुनावले.समिती सचिव वारंवार बदलने, प्रशासनाचे सहकार्य नसणे आदी गोष्टींबाबत सभापती अंकुश जाधव यांनी चीड व्यक्त करत मी या ठिकाणी बसायला इच्छुक नसल्याचे थेट सभागृहात सांगून टाकले. (प्रतिनिधी)अपंग शिष्यवृत्ती ; सखोल चौकशीचे आदेशशालेय अपंग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती अद्यापपर्यंयत संबंधित लाभार्थ्यापर्यंत का पोहचली नाही? असा सवाल समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केला. शासनाने यासाठी एकही पैसा दिला नसल्याचे संबंधीत अधिकाऱ्याने सांगितले. अपंग शिष्यवृत्ती लाभार्थीचे खरोखरच प्रस्ताव मागितले होते का? याची सखोल चौकशी करण्याचे आदेशही सभापती अंकुश जाधव यांनी सचिवांना दिले. सुकन्या नरसुले : अंकुश जाधव यांचा मंद कारभारजिल्हापरिषद सर्वसाधारण सभेत अपंगांच्या २२ योजना बनविण्याचा ठराव झाला. सभा होऊन तीन महिने होत आले तरी योजना बनविण्यात आलेल्या नाहीत. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे समाजकल्याण सभांवर बहिंष्कार घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यावर सभापती अंकुश जाधव यांचा वचक नसून कारभार मंद चालला असल्याचा आरोप सदस्या सुकन्या नरसुले यांनी भर सभेत केला.