शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

तारकर्ली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 00:40 IST

मालवण : तारकर्ली ग्रामसभेचे कामकाज पूर्ण केले नाही. इतिवृत्ताला मान्यता दिली नाही तसेच ग्रामस्थांचे प्रश्न जाणून न घेता किरकोळ ...

मालवण : तारकर्ली ग्रामसभेचे कामकाज पूर्ण केले नाही. इतिवृत्ताला मान्यता दिली नाही तसेच ग्रामस्थांचे प्रश्न जाणून न घेता किरकोळ कारणावरून सरपंच स्नेहा केरकर यांनी हेतूपुरस्सर आणि सभेच्या नियमांना धाब्यावर बसवून सभेतून पळ काढला. सरपंचांचा ग्रामपंचायतीत भ्रष्ट व मनमानी कारभार सुरू आहे, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकाराची पंचायत समितीकडून दखल घेण्यात न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तारकर्लीत येऊन आमचे म्हणणे ऐकून घेतल्यावरच ग्रामपंचायतीला ठोकलेले टाळे उघडले जाईल, असे तारकर्ली ग्रामस्थांनी स्पष्ट केले.दरम्यान, पर्यटन नकाशावर नावारूपाला आलेल्या तारकर्ली गावात ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्रथमच संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. बुधवारी दुसºया दिवशीही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.तारकर्ली ग्रामपंचायतीच्या प्रजासत्ताक दिनाची तहकूब झालेली ग्रामसभा मंगळवारी बोलाविण्यात आली होती. ग्रामसभा सुरू झाल्यावर मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन सचिवांकडून सुरू असताना त्यांचा आवाज मागच्या ग्रामस्थांपर्यंत जात नसल्याने एका ग्रामस्थाने मोठ्याने इतिवृत्त वाचन करण्याची विनंती केली. या विनंतीस सभाध्यक्ष सरपंच स्नेहा केरकर यांनी आक्षेप घेत नियमांवर बोट ठेवत त्या ग्रामस्थास तुम्ही मतदार नसल्याने सभेत बोलू नये, असे सांगितले. त्यावरून ग्रामस्थ व सरपंचांच्यात निर्माण झालेल्या वादात सरपंच केरकर यांनी ही सभा अचानक सोडून जाताना सभात्याग करत असल्याचे सांगितले.सरपंच सांगत असलेला ग्रामविकास गावात दिसत नाही. अधिकारीवर्गाला पाठीशी घालण्याचे काम ग्रामपंचायतीने केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी दाद कोणाकडे मागायची, हा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होऊन ग्रामपंचायतीला टाळे ठोकले गेले आहे.यावेळी दादा कुबल, डॉ. बाळा परब, वैभव सावंत, राजू मेस्त्री, भिवा कोळंबकर, अजिंक्य पाटकर, संदेश गोसावी, मेघनाथ मयेकर, संजय खराडे, मृणाली मयेकर, वैष्णवी मेस्त्री, सुप्रिया भोवर, मिथीलेश मिठबावकर, जयवंत सावंत, देवेंद्र खवणेकर, घनश्याम कुबल, नंदकुमार टिकम, बजरंग कुबल, निवृत्ती कोळंबकर आदी व इतर ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.ग्रामसभेचे कामकाज पूर्ण न होताच सरपंचांनी सभात्याग केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ग्रामपंचायतीमध्येच ठाण मांडले. या दरम्यान त्याठिकाणी आलेल्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांच्या प्रश्नांचे समाधान झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ग्रामपंचायतीत ठाण मांडून अखेर सरपंच न फिरकल्याने ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.