शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाएवढीच जमीन ताब्यात घ्यावी

By admin | Updated: May 14, 2015 00:34 IST

मुंबई-गोवा महामार्ग : व्यावसायिक भरडले जाणार असतील तर आंदोलन : मोहन केळुसकर

कणकवली : भविष्यातील सहापदरीकरणाच्या नावाखाली हे व्यावसायिक भरडले जाणार असतील तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देताना तूर्त चौपदरीकरणाएवढीच जमीन संपादन करावी, असे मत कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी कोकण दौऱ्यावर असताना सोमवारी व्यक्त केले.मुंबई - कोकण - गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, भविष्यात हा महामार्ग सहापदरीकरण करावा लागला, तर त्यासाठी आताच जमीन संपादन करण्याचा अट्टाहास का? असा प्रश्न केळुसकर यांनी उपस्थित केला आहे.कोकण - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन संपादन करताना भविष्यात हा महामार्ग सहापदरीकरणाच्यादृष्टीने आताच त्यासाठी जमीन संपादन करण्याचा घाट घातला गेला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत या महामार्गालगत रीतसर परवाने घेऊन उद्योग - व्यवसाय सुरू केलेले अनेक कोकणवासीय व्यावसायिक, आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत. अनेकांची स्वत:ची घरे जात आहेत. तर काही ठिकाणी शासकीय कार्यालये अन्यत्र हलवावी लागणार आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शहरी भागात रस्त्याच्या मध्यबिंदूपासून दोन्हीकडे २२.५ मीटर, तर ग्रामीण भागात ३० मीटर एवढी जागा संपादन करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुरू केले आहे. या संपादनामुळे शहरालगतच्या गावामध्ये कोकणातील छोट्या- मोठ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक परवाने घेत आहेत. मात्र, अशा प्रकारच्या कारण नसताना जादा जमीन आगावू संपादन करण्याच्या निर्णयामुळे हे सर्वजण पुन्हा बेकारीच्या खाईत लोटले जाणार आहेत. त्यामुळे अनेकांनी केळुसकर यांच्याशी संवाद साधून आम्हाला वाचवा, अशी विनंती केली. त्यानुसार त्यांनी कोकणात दौरा करून अशा व्यावसायिकांची बाजू समजावून घेतली. तसेच अन्य स्थावर मालमत्ता जाणाऱ्यांशी चर्चा करून योग्य मोबदला मिळाला नाही, तर संघर्षाला तयार राहावे, असे बजावले.शहरी भागातील ४५ मीटर जागा म्हणजे १५० फूट रूंदी होते. प्रत्येकी १२ फुटांची एक लांबी पकडली, तर चार लांबीसाठी ४८ फूट अधिक रस्ता विभाजकासाठी १२ फूट मिळून ६० फूट जमिनीची गरज आहे. दुचाकी, तीनचाकी, गाड्यांची स्वतंत्र लांबी पकडल्यास फार तर ८० फूट रूंद जमिनीची आवश्यकता आहे. त्यामुळे अशाप्रकारे ४८ मीटर म्हणजे १५० फूट जागा संपादन करणे अनावश्यक आहे, असे केळुसकर म्हणाले. (प्रतिनिधी)केळुसकर म्हणाले, ग्रामीण भागात ६० मीटर जागा म्हणजे सुमारे २०० फूट जमीन संपादन केली जात आहे. आजच्या घडीला एवढ्या जागेची निश्चितच गरज नाही. मात्र, अशा प्रकारच्या जमीन संपादनामुळे शेकडो लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. अनेकांना बेघर व्हावे लागणार आहे. नवीन भूमी अधिग्रहण कायद्यामुळे दामदुप्पट मोबदला देण्यात येणार आहे, असे कोकणातील दोन्ही शिवसेनेचे खासदार सांगत आहेत. मात्र, या मोबदल्यामुळे विस्थापितांचा कायमस्वरूपी प्रश्न सुटण्याऐवजी जटील होणार आहे. एकीकडे पश्चिम किनारी सागरी महामार्गाच्या कामाला केंद्र सरकार गती देत असल्यामुळे मुंबई-गोवा सहापदरीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. या दोन्ही खासदारांनी अभ्यास करून याबाबतीत योग्य निर्णय घेऊन कोकणवासीयांना दिलासा द्यावा, असेही केळुसकर म्हणाले.