शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चौपदरीकरणाएवढीच जमीन ताब्यात घ्यावी

By admin | Updated: May 14, 2015 00:34 IST

मुंबई-गोवा महामार्ग : व्यावसायिक भरडले जाणार असतील तर आंदोलन : मोहन केळुसकर

कणकवली : भविष्यातील सहापदरीकरणाच्या नावाखाली हे व्यावसायिक भरडले जाणार असतील तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देताना तूर्त चौपदरीकरणाएवढीच जमीन संपादन करावी, असे मत कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी कोकण दौऱ्यावर असताना सोमवारी व्यक्त केले.मुंबई - कोकण - गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, भविष्यात हा महामार्ग सहापदरीकरण करावा लागला, तर त्यासाठी आताच जमीन संपादन करण्याचा अट्टाहास का? असा प्रश्न केळुसकर यांनी उपस्थित केला आहे.कोकण - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन संपादन करताना भविष्यात हा महामार्ग सहापदरीकरणाच्यादृष्टीने आताच त्यासाठी जमीन संपादन करण्याचा घाट घातला गेला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत या महामार्गालगत रीतसर परवाने घेऊन उद्योग - व्यवसाय सुरू केलेले अनेक कोकणवासीय व्यावसायिक, आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत. अनेकांची स्वत:ची घरे जात आहेत. तर काही ठिकाणी शासकीय कार्यालये अन्यत्र हलवावी लागणार आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शहरी भागात रस्त्याच्या मध्यबिंदूपासून दोन्हीकडे २२.५ मीटर, तर ग्रामीण भागात ३० मीटर एवढी जागा संपादन करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुरू केले आहे. या संपादनामुळे शहरालगतच्या गावामध्ये कोकणातील छोट्या- मोठ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक परवाने घेत आहेत. मात्र, अशा प्रकारच्या कारण नसताना जादा जमीन आगावू संपादन करण्याच्या निर्णयामुळे हे सर्वजण पुन्हा बेकारीच्या खाईत लोटले जाणार आहेत. त्यामुळे अनेकांनी केळुसकर यांच्याशी संवाद साधून आम्हाला वाचवा, अशी विनंती केली. त्यानुसार त्यांनी कोकणात दौरा करून अशा व्यावसायिकांची बाजू समजावून घेतली. तसेच अन्य स्थावर मालमत्ता जाणाऱ्यांशी चर्चा करून योग्य मोबदला मिळाला नाही, तर संघर्षाला तयार राहावे, असे बजावले.शहरी भागातील ४५ मीटर जागा म्हणजे १५० फूट रूंदी होते. प्रत्येकी १२ फुटांची एक लांबी पकडली, तर चार लांबीसाठी ४८ फूट अधिक रस्ता विभाजकासाठी १२ फूट मिळून ६० फूट जमिनीची गरज आहे. दुचाकी, तीनचाकी, गाड्यांची स्वतंत्र लांबी पकडल्यास फार तर ८० फूट रूंद जमिनीची आवश्यकता आहे. त्यामुळे अशाप्रकारे ४८ मीटर म्हणजे १५० फूट जागा संपादन करणे अनावश्यक आहे, असे केळुसकर म्हणाले. (प्रतिनिधी)केळुसकर म्हणाले, ग्रामीण भागात ६० मीटर जागा म्हणजे सुमारे २०० फूट जमीन संपादन केली जात आहे. आजच्या घडीला एवढ्या जागेची निश्चितच गरज नाही. मात्र, अशा प्रकारच्या जमीन संपादनामुळे शेकडो लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. अनेकांना बेघर व्हावे लागणार आहे. नवीन भूमी अधिग्रहण कायद्यामुळे दामदुप्पट मोबदला देण्यात येणार आहे, असे कोकणातील दोन्ही शिवसेनेचे खासदार सांगत आहेत. मात्र, या मोबदल्यामुळे विस्थापितांचा कायमस्वरूपी प्रश्न सुटण्याऐवजी जटील होणार आहे. एकीकडे पश्चिम किनारी सागरी महामार्गाच्या कामाला केंद्र सरकार गती देत असल्यामुळे मुंबई-गोवा सहापदरीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. या दोन्ही खासदारांनी अभ्यास करून याबाबतीत योग्य निर्णय घेऊन कोकणवासीयांना दिलासा द्यावा, असेही केळुसकर म्हणाले.