शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करा

By admin | Updated: November 2, 2014 00:44 IST

मोहनराव केळुसकर : एस.टी.च्या कारभाराविरोधात चर्चा करण्यासाठी बैठक

कणकवली : आशियातील सर्वात मोठे राज्य परिवहन असलेल्या एसटीतील कर्मचारी संघटनांनी दबाव आणून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन कार्यालयाला बेकायदेशीर खासगी गाड्यांवर कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी प्रतिक्रिया कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी व्यक्त केली आहे.मुंबई उच्च न्यायालयाने अलिकडेच राज्यात धावणाऱ्या आराम, निमआराम, व्होल्वो, स्लिपरकोच आदी खासगी मालकीच्या गाड्यांना दिलेले परवाने हे नियमबाह्य व बेकायदेशीर आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने या गाड्यांवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश बजावले आहेत. मात्र, या गाड्यांचे मालक हे बहुतांश राजकीय नेते मंडळींच्या गोतावळ््यातील असल्याने परिवहन कार्यालयाचे अधिकारी कारवाई करण्यास धजावत नाहीत, असा आरोपही केळुसकर यांनी केला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील एस. टी.च्या अनियमित कारभाराविरूद्ध चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत केळुसकर बोलत होते. बैठक आघाडीच्या दादर (मुंबई) येथील मुख्य कार्यालयात झाली. यावेळी सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, सुरेश केळुसकर, चंद्रकांत आंब्रे, रमाकांत जाधव, काका जाधव, प्रकाश तावडे, विलास गांगण, सुरेश गुडेकर, विश्वनाथ कसये, अभिजीत डोंगरे उपस्थित होते. वास्तविक राज्य परिवहन अधिकारी वर्गालासुद्घा अशा प्रकारच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र राजकीय नेत्यांशी त्यांचे साटेलोटे असल्याने अशा प्रकारची कारवाई करण्यास धजावत नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, एस. टी. महामंडळ डबघाईस येण्यास हे अधिकारी जेवढे दोषी आहेत, तेवढेच पूर्वीचे आघाडीचे राज्यशासनही जबाबदार आहे. युती शासनाच्या कालावधीत तर दरवर्षी एसटीच्या ताफ्यात तीन हजार नवीन गाड्या देण्यास सतत तीन वर्षे टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे महामंडळाचे त्यापुढील वर्षाचे नियोजन फसत आले. राज्य शासनाने एसटीच्या माध्यमातून दिलेल्या सवलतीचे २१०० कोटी रूपये वेळच्यावेळी दिले असते तर हा डोलारा सांभाळता आला असता.सध्या एसटीचे चालक- वाहक, तांत्रिक कर्मचारी एस. टी.चा हा डोलारा सांभाळून ठेवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. मात्र, अधिकारी नोकरशहांना वेळच्यावेळी गलेलठ्ठ पगार मिळत असल्याने ते थंड हवेची केबिन सोडून प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. म्हणूनच कर्मचारी संघटनांनी अशा नोकरशहा आणि आरटीओच्या विरोधात दबाव गट निर्माण केला पाहिजे, असे केळुसकर म्हणाले. (प्रतिनिधी)