शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करा

By admin | Updated: November 2, 2014 00:44 IST

मोहनराव केळुसकर : एस.टी.च्या कारभाराविरोधात चर्चा करण्यासाठी बैठक

कणकवली : आशियातील सर्वात मोठे राज्य परिवहन असलेल्या एसटीतील कर्मचारी संघटनांनी दबाव आणून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन कार्यालयाला बेकायदेशीर खासगी गाड्यांवर कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी प्रतिक्रिया कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी व्यक्त केली आहे.मुंबई उच्च न्यायालयाने अलिकडेच राज्यात धावणाऱ्या आराम, निमआराम, व्होल्वो, स्लिपरकोच आदी खासगी मालकीच्या गाड्यांना दिलेले परवाने हे नियमबाह्य व बेकायदेशीर आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने या गाड्यांवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश बजावले आहेत. मात्र, या गाड्यांचे मालक हे बहुतांश राजकीय नेते मंडळींच्या गोतावळ््यातील असल्याने परिवहन कार्यालयाचे अधिकारी कारवाई करण्यास धजावत नाहीत, असा आरोपही केळुसकर यांनी केला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील एस. टी.च्या अनियमित कारभाराविरूद्ध चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत केळुसकर बोलत होते. बैठक आघाडीच्या दादर (मुंबई) येथील मुख्य कार्यालयात झाली. यावेळी सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, सुरेश केळुसकर, चंद्रकांत आंब्रे, रमाकांत जाधव, काका जाधव, प्रकाश तावडे, विलास गांगण, सुरेश गुडेकर, विश्वनाथ कसये, अभिजीत डोंगरे उपस्थित होते. वास्तविक राज्य परिवहन अधिकारी वर्गालासुद्घा अशा प्रकारच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र राजकीय नेत्यांशी त्यांचे साटेलोटे असल्याने अशा प्रकारची कारवाई करण्यास धजावत नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, एस. टी. महामंडळ डबघाईस येण्यास हे अधिकारी जेवढे दोषी आहेत, तेवढेच पूर्वीचे आघाडीचे राज्यशासनही जबाबदार आहे. युती शासनाच्या कालावधीत तर दरवर्षी एसटीच्या ताफ्यात तीन हजार नवीन गाड्या देण्यास सतत तीन वर्षे टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे महामंडळाचे त्यापुढील वर्षाचे नियोजन फसत आले. राज्य शासनाने एसटीच्या माध्यमातून दिलेल्या सवलतीचे २१०० कोटी रूपये वेळच्यावेळी दिले असते तर हा डोलारा सांभाळता आला असता.सध्या एसटीचे चालक- वाहक, तांत्रिक कर्मचारी एस. टी.चा हा डोलारा सांभाळून ठेवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. मात्र, अधिकारी नोकरशहांना वेळच्यावेळी गलेलठ्ठ पगार मिळत असल्याने ते थंड हवेची केबिन सोडून प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत. म्हणूनच कर्मचारी संघटनांनी अशा नोकरशहा आणि आरटीओच्या विरोधात दबाव गट निर्माण केला पाहिजे, असे केळुसकर म्हणाले. (प्रतिनिधी)