शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्वच्छ भारत अभियानासाठी सावंतवाडी शहरात २ कोटी ७४ लाख खर्च होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:56 IST

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर झालेल्या २ कोटी ७४ लाख रूपयांच्या निधीतून शहरात बायोगॅस प्रकल्प व चार गाड्या तसेच एक लोडर खरेदी करण्यात येणार असून पालिकेने शहर स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिला असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

ठळक मुद्देघनकचरा व्यवस्थापनासाठी निधी मंजूर : बबन साळगावकर यांची माहिती स्वच्छ भारत अभियानासाठी सावंतवाडी शहरात २ कोटी ७४ लाख खर्च होणार

सावंतवाडी : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर झालेल्या २ कोटी ७४ लाख रूपयांच्या निधीतून शहरात बायोगॅस प्रकल्प व चार गाड्या तसेच एक लोडर खरेदी करण्यात येणार असून पालिकेने शहर स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिला असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, शहरात जमा होणाऱ्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारे सहा प्रकल्प शहरात उभे करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून २४ तासात खत निर्मिती होणार आहे. शहरातील भाजी मार्केट, मच्छिमार्केट, नरसोबा मंदिर, गोठण, जुस्तीननगर, सर्वोदयनगर, बाहेरचावाडा आदी ठिकाणी हा प्रकल्प होणार असून, प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.पालिकेच्या जिमखाना येथील मनुष्यबळ विकास केंद्र्रात स्ट्रीम कास्ट ही कंपनी १ कोटी २५ लाख रुपये खर्च करून शहरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविणार आहे. त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. तर सावंतवाडी शहर सुका व ओला कचरा वर्गीकरण करणारे शहर असून, जवळपास ९८ टक्के सुका व ओला कचरा वर्गीकरण करण्यात येतो.

नागरिकांचेही यासाठी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सक्षम असे घनकचरा व्यवस्थापन करणारी सावंतवाडी नगरपालिका असून, भविष्यात कचºयावर प्रक्रिया करणारी नगरपालिका म्हणून सावंतवाडी पालिकेचे नाव घेतले जाईल, अशी आशाही साळगावकर यांनी बोलून दाखवली.कचर्‍यावर प्रक्रिया करून तयार होणारे खत दहा रुपये व वीस रुपये किलोने विक्री करून त्यातून आर्थिक उन्नतीही पालिका साधणार असल्याचे साळगावकर यांनी यावेळी सांगितले.एजी डॉटर्सबाबत अद्याप विचार नाही!कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या एजी डॉटर्स या कंपनी संदर्भात पालिकेने अद्याप कोणताच विचार केलेला नाही. पालिकेने कचर्‍यावर प्रकल्प करणारी स्वत:ची यंत्रणा उभी केल्याने भविष्यात कणकवली नगरपालिकेने स्वीकारलेल्या या कंपनीच्या कामकाजानुसार पाहणी करून योग्य विचार केला जाईल, असे साळगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानsindhudurgसिंधुदुर्ग