शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

स्वच्छ भारत अभियानासाठी सावंतवाडी शहरात २ कोटी ७४ लाख खर्च होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:56 IST

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर झालेल्या २ कोटी ७४ लाख रूपयांच्या निधीतून शहरात बायोगॅस प्रकल्प व चार गाड्या तसेच एक लोडर खरेदी करण्यात येणार असून पालिकेने शहर स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिला असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

ठळक मुद्देघनकचरा व्यवस्थापनासाठी निधी मंजूर : बबन साळगावकर यांची माहिती स्वच्छ भारत अभियानासाठी सावंतवाडी शहरात २ कोटी ७४ लाख खर्च होणार

सावंतवाडी : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर झालेल्या २ कोटी ७४ लाख रूपयांच्या निधीतून शहरात बायोगॅस प्रकल्प व चार गाड्या तसेच एक लोडर खरेदी करण्यात येणार असून पालिकेने शहर स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दिला असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, शहरात जमा होणाऱ्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारे सहा प्रकल्प शहरात उभे करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून २४ तासात खत निर्मिती होणार आहे. शहरातील भाजी मार्केट, मच्छिमार्केट, नरसोबा मंदिर, गोठण, जुस्तीननगर, सर्वोदयनगर, बाहेरचावाडा आदी ठिकाणी हा प्रकल्प होणार असून, प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.पालिकेच्या जिमखाना येथील मनुष्यबळ विकास केंद्र्रात स्ट्रीम कास्ट ही कंपनी १ कोटी २५ लाख रुपये खर्च करून शहरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविणार आहे. त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. तर सावंतवाडी शहर सुका व ओला कचरा वर्गीकरण करणारे शहर असून, जवळपास ९८ टक्के सुका व ओला कचरा वर्गीकरण करण्यात येतो.

नागरिकांचेही यासाठी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सक्षम असे घनकचरा व्यवस्थापन करणारी सावंतवाडी नगरपालिका असून, भविष्यात कचºयावर प्रक्रिया करणारी नगरपालिका म्हणून सावंतवाडी पालिकेचे नाव घेतले जाईल, अशी आशाही साळगावकर यांनी बोलून दाखवली.कचर्‍यावर प्रक्रिया करून तयार होणारे खत दहा रुपये व वीस रुपये किलोने विक्री करून त्यातून आर्थिक उन्नतीही पालिका साधणार असल्याचे साळगावकर यांनी यावेळी सांगितले.एजी डॉटर्सबाबत अद्याप विचार नाही!कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या एजी डॉटर्स या कंपनी संदर्भात पालिकेने अद्याप कोणताच विचार केलेला नाही. पालिकेने कचर्‍यावर प्रकल्प करणारी स्वत:ची यंत्रणा उभी केल्याने भविष्यात कणकवली नगरपालिकेने स्वीकारलेल्या या कंपनीच्या कामकाजानुसार पाहणी करून योग्य विचार केला जाईल, असे साळगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानsindhudurgसिंधुदुर्ग