शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘त्या’ नगरसेवक निवडणुकीस तूर्त स्थगिती

By admin | Updated: August 24, 2015 23:25 IST

उच्च न्यायालय : रत्नागिरीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना तात्पुरता दिलासा

रत्नागिरी : स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या चार नगरसेवकांना अपात्र करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली असून, या याचिकेवरील निर्णय होईपर्यंत रत्नागिरी पालिकेतील चार नगरसेवकांच्या जागा रिक्त झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या राजपत्रात घोषित करू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे चार नगरसेवकपदाच्या संभाव्य निवडणूक प्रक्रियेला तूर्त स्थगिती मिळाली आहे. रत्नागिरी पालिकेच्या उपनगराध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ६ पैकी ४ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला व ११ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार संजय साळवी यांना मतदान केले होते. त्यामध्ये स्मितल पावसकर, दत्तात्रय साळवी, प्रीती सुर्वे व मुनीज जमादार यांचा समावेश होता. नगरपरिषद निवडणूक कायद्यानुसार स्वतंत्र गट स्थापनेऐवजी अन्य पक्षात विलीनीकरण करणे आवश्यक होते. तसे न झाल्याने राष्ट्रवादीचे पालिकेतील पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी या चारही नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी २१ नोव्हेंबर २०१४ रोजी एका अर्जाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. गेल्या काही महिन्यांपासून अपात्रतेबाबतचा हा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित होता. त्यावर २४ जुलै २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला. त्यानुसार या चार नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयात २९ जुलै २०१५ रोजी आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यावर २० आॅगस्ट २०१५ रोजी उच्च न्यायालयात आव्हान याचिकेवर सुनावणी झाली. जोपर्यंत याचिकेवर निर्णय होत नाही, तोपर्यंत ही चार नगरसेवकपदे रिक्त झाल्याचे राजपत्रात घोषित करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला. याप्रकरणी सोमवारी (२४ आॅगस्ट २०१५) उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आता १ सप्टेंबला होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे रत्नागिरीत चार नगरसेवकपदांसाठी फेरनिवडणूक होणार असल्याच्या चर्चेला आता काही काळ तरी स्थगिती मिळाली आहे.