शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

‘त्या’ नगरसेवक निवडणुकीस तूर्त स्थगिती

By admin | Updated: August 24, 2015 23:25 IST

उच्च न्यायालय : रत्नागिरीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना तात्पुरता दिलासा

रत्नागिरी : स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या चार नगरसेवकांना अपात्र करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली असून, या याचिकेवरील निर्णय होईपर्यंत रत्नागिरी पालिकेतील चार नगरसेवकांच्या जागा रिक्त झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या राजपत्रात घोषित करू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे चार नगरसेवकपदाच्या संभाव्य निवडणूक प्रक्रियेला तूर्त स्थगिती मिळाली आहे. रत्नागिरी पालिकेच्या उपनगराध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ६ पैकी ४ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला व ११ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार संजय साळवी यांना मतदान केले होते. त्यामध्ये स्मितल पावसकर, दत्तात्रय साळवी, प्रीती सुर्वे व मुनीज जमादार यांचा समावेश होता. नगरपरिषद निवडणूक कायद्यानुसार स्वतंत्र गट स्थापनेऐवजी अन्य पक्षात विलीनीकरण करणे आवश्यक होते. तसे न झाल्याने राष्ट्रवादीचे पालिकेतील पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी या चारही नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी २१ नोव्हेंबर २०१४ रोजी एका अर्जाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. गेल्या काही महिन्यांपासून अपात्रतेबाबतचा हा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित होता. त्यावर २४ जुलै २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला. त्यानुसार या चार नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयात २९ जुलै २०१५ रोजी आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यावर २० आॅगस्ट २०१५ रोजी उच्च न्यायालयात आव्हान याचिकेवर सुनावणी झाली. जोपर्यंत याचिकेवर निर्णय होत नाही, तोपर्यंत ही चार नगरसेवकपदे रिक्त झाल्याचे राजपत्रात घोषित करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला. याप्रकरणी सोमवारी (२४ आॅगस्ट २०१५) उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आता १ सप्टेंबला होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे रत्नागिरीत चार नगरसेवकपदांसाठी फेरनिवडणूक होणार असल्याच्या चर्चेला आता काही काळ तरी स्थगिती मिळाली आहे.