शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

पाणी नसल्याने राजापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियाच स्थगित

By admin | Updated: May 21, 2015 00:01 IST

४५ मुलांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

राजापूर : शहरातील महत्त्वपूर्ण अशा ग्रामीण रुग्णालयाला पंचायत समितीने पाणी पुरवठा करायचा की, नगर परिषद प्रशासनाने, हा वाद सुरू झाल्याने समस्त आरोग्य यंत्रणेसह रुग्णांना विविध प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या वादामुळे रुग्णालयातील ४५ मुलांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.एक महिन्यापूर्वीच राजापूर ग्रामीण रुग्णालयाने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन राजापूर पंचायत समितीकडे पाणीपुरवठा करण्याबाबत लेखी स्वरुपात मागणी केली होती. एवढ्या कालखंडात या रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यात पंचायत समितीने दिरंगाई दाखवली, तर दुसरीकडे राजापूर नगर परिषद प्रशासनादेखील त्या रुणालयाला पाणी पुरवठा केलेला नाही. या दोन प्रशासनाच्या वादात कडाक्याच्या उन्हाळ्यात रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेसह विविध आजारांसाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची पाण्याअभावी त्रेधातिरपीट उडाली आहे. मागील काही दिवस रुग्णालयाच्या प्रशासनाकडून मागणीनुसार खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी दरदिवशी रुग्णालयाला लागणारे पाणी लक्षात घेता तेवढा पुरवठा होत नसल्याने अंतर्गत उपचार पद्धतीला अडथळा ठरत आहे.या रुग्णालयात हार्निया, हायट्रोसिस, फायमोसिस अशा आजारांनी त्रस्त असलेल्या ४५ शालेय विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार होत्या. शालेय आरोग्य तपासणी मोहिमेत एकूण ७५ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया होणार होत्या. यापूर्वी ३० विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. उर्वरित शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयाने तयारी सुरू केली होती मात्र पाणीटंचाई आड आली.शस्त्रक्रियेदरम्यान आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध नसल्याने त्या पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे आता जेव्हा मुबलक पाणी उपलब्ध होईल त्यानंतरच शस्त्रक्रिया पूर्ण होतील, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.पंचायत समिती व नगर परिषद प्रशासन यापैकी राजापूर ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा करायला कोणीच तयार नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. एवढे असूनही आमच्या लोकप्रतिनिधींना त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याची स्थिती खेदजनक आहे. निदान आता तरी राजापूर ग्रामीण रुग्णालयाला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाईल का, हाच खरा प्रश्न आहे.राजापूर ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरुपी पाणी पुरवठा व्हावा, यासाठी एखादी पाणी योजना राबवण्याबाबतचा निर्णय सुमारे १० वर्षांपूर्वी झाला होता. भटाळीलगत नदीपात्रात विहीर खोदून त्याद्वारे रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, नंतर पुढे काहीच हालचाल न झाल्याने मागील दशकाच्या कालखंडात या रुग्णालयाला मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसून, पाण्याच्या प्रतीक्षेत राहावे लागतेय. (प्रतिनिधी)ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा कोणी करायचा, या वादात पाणी-पुरवठाच होत नाही.आतापर्यंत पंचायत समितीने पाणीपुरवठा करण्यात दिरंगाई दाखवल्याने टंचाई कायम आहे.आपली जबाबदारी नसल्याचे सांगून नगर परिषदेने हात झटकले आहेत. यामध्ये रुग्णांचे हाल होत आहेत.