शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

तृष्णा भागविणारी ‘सुरभी’ जनावरांसाठी पाणवठा : ओटवणेतील उपक्रम आदर्शवत

By admin | Updated: May 12, 2014 00:12 IST

महेश चव्हाण ल्ल ओटवणे उन्हाळा आला की नदीनाले, विहिरी कोरड्या पडू लागतात. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते आणि माणसांसह मुक्या

महेश चव्हाण ल्ल ओटवणे उन्हाळा आला की नदीनाले, विहिरी कोरड्या पडू लागतात. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते आणि माणसांसह मुक्या जनावरांनाही चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहावी लागते. ओटवणे गावही याला अपवाद नाही. परंतु ओटवणे रवळनाथ विद्यामंदिरचे संस्थापक शिक्षणमहर्षी कै. काका दामले यांनी विद्यामंदिरानजिक बांधणी केलेल्या ‘सुरभी’ या पाणपोईपासून प्रेरणा घेऊन तसे उपक्रम राबविल्यास ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील जनावरांचे होणारे हाल निश्चितच थांबणार आहेत. सूर्याच्या तप्त किरणांच्या उष्णतेने येथील सर्व प्राणीमात्रांसह मानवाची सुध्दा लाही लाही होत आहे. नदीनाले, खोल विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. मुक्या जनावरांना चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहावी लागत आहे. याला जबाबदार सर्वस्वी बेसुमार वृक्षतोड करणारा माणूसच आहे. त्याच्या या अविचारी कृत्यामुळे त्याच्याबरोबरच गुरे आणि अन्य मुक्या जनावरांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. यामुळे माणसाला पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वात बुध्दीमान प्राणी असणार्‍या माणसालाही पाणी टंचाईची समस्या सोडविताना अनेक खटाटोप करावे लागतात. मग मुक्या प्राण्यांचा कसा निभाव लागेल? माणूस माणुसकीच्या नात्याने एकमेकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. परंतु मुक्या जनावरांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्यासाठी प्रयत्न करणारी माणसे दुर्मीळच. श्री रवळनाथ मंदिरचे संस्थापक कै. काका दामले हे यातीलच एक व्यक्तिमत्व. उन्हाळ्याच्या दिवसात नदीनाले, विहिरी सुकून गेल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करावी लागते. तृष्णा शांत करण्यासाठी जनावरांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी त्यांनी रस्त्याच्या बाजूला सुरभी या पाणपोईची बांधणी केली आहे. माणसासाठी कुलर अथवा तत्सम पाण्याची सोय केली जाते. परंतु जनावरांच्या पाण्याच्या सोयीची समस्या कोणापर्यंत पोहोचली नव्हती. या भावनेच्या पलिकडचा ठाव कै. काका दामले यांनी घेत गुरांसाठी, पक्ष्यांसाठी पाणपोई बांधली आहे. चरायला गेलेली गुरे उन्हातून घरी परतताना या पाणपोईवर निवांतपणे पाणी पिऊन पुढे मार्गस्थ होतात. आकाशात चहुबाजूंनी घिरट्या घालणारे पक्षीही ‘सुरभी’च्या पाण्याने जीव शांत करतात.