शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

उमेद अभियान संघर्षाला ग्रामसंघाच्या महिलांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:49 IST

राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

ठळक मुद्दे महिलांनी काढली प्रभातफेरी अभियान वाचविण्यासाठी शासनाला मदत

कणकवली : राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

कणकवली तालुक्यातल्या नाटळ हिरकणी प्रभागसंघातील नरडवे, नाटळ, कुंभवडे, दारिस्ते, दिगवळे येथील ग्रामसंघातील पदाधिकारी, सीआरपी ताई, कृषीसखी व महिलांनी आपापल्या गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली.तसेच गावात विविध ठिकाणी स्वच्छता करून शासनाला हे अभियान चालविण्यासाठी प्रत्येकी १ रुपया मदतही गोळा केली. नाटळ हिरकणी प्रभागसंघातील विश्व ग्रामसंघ कुंभवडेच्या महिलांनी गावात प्रभात फेरी काढली व स्वच्छता केली. यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्ष अनिता सावंत, सचिव प्राजक्ता सुतार, कोषाध्यक्ष सुलोचना सावंत, सीआरपी ताई सारीका सावंत यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.सावली ग्रामसंघ नाटळच्या महिलांनी आपल्या गावात प्रभात फेरी काढली. यावेळी प्रभागसंघ अध्यक्ष रविना सुतार, सचिव शांती फर्नांडिस, सीआरपी ताई योगिता चव्हाण, सीआरपी ताई तन्वी राणे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या. तर जिद्द ग्रामसंघ नरडवेच्या महिलांनीही उत्स्फुर्तपणे गावात प्रभातफेरी काढली.

यामध्ये सीआरपी ताई पूजा सावंत, कृषी सखी गीतांजली कांदे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या. आधार ग्रामसंघ दारीस्ते संघाने आपल्या गावात प्रभातफेरी काढली सीआरपी ताई जान्हवी पाटील, ग्रामसंघाच्या अध्यक्ष नमिता सुतार, सचिव श्वेता शिरसाठ, कोषाध्यक्ष रश्मी साळसकर आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.यावेळी आपले मत मांडताना या महिला म्हणाल्या, उमेद अभियानातील या सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. तेव्हा आता त्यांना शासन जर कमी करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कारण या लोकांनी आम्हाला संघटित करून नवा विचार दिला आहे. त्यामुळे शासनाला जर या कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर आम्ही देतो. मात्र या अधिकाºयांना काढून हे अभियान बंद करू नये.नोकरीवर कायम ठेवा व अभियान वाचवा संदेशयावेळी सर्व ग्रामसंघाच्या महिलांनी प्रत्येकी एक रुपया गोळा केला. ही रक्कम शासनाला पाठविली जाणार असून, तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही देतो. मात्र , हे अधिकारी आणि कर्मचारी कमी करू नका, आम्हाला आत्मनिर्भर करणाऱ्या या लोकांना नोकरीवर कायम ठेवा आणि अभियान वाचवा, असा संदेश दिला जाणार आहे. 

 

टॅग्स :GovernmentसरकारWomenमहिलाsindhudurgसिंधुदुर्ग