शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

उमेद अभियान संघर्षाला ग्रामसंघाच्या महिलांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:49 IST

राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

ठळक मुद्दे महिलांनी काढली प्रभातफेरी अभियान वाचविण्यासाठी शासनाला मदत

कणकवली : राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

कणकवली तालुक्यातल्या नाटळ हिरकणी प्रभागसंघातील नरडवे, नाटळ, कुंभवडे, दारिस्ते, दिगवळे येथील ग्रामसंघातील पदाधिकारी, सीआरपी ताई, कृषीसखी व महिलांनी आपापल्या गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली.तसेच गावात विविध ठिकाणी स्वच्छता करून शासनाला हे अभियान चालविण्यासाठी प्रत्येकी १ रुपया मदतही गोळा केली. नाटळ हिरकणी प्रभागसंघातील विश्व ग्रामसंघ कुंभवडेच्या महिलांनी गावात प्रभात फेरी काढली व स्वच्छता केली. यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्ष अनिता सावंत, सचिव प्राजक्ता सुतार, कोषाध्यक्ष सुलोचना सावंत, सीआरपी ताई सारीका सावंत यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.सावली ग्रामसंघ नाटळच्या महिलांनी आपल्या गावात प्रभात फेरी काढली. यावेळी प्रभागसंघ अध्यक्ष रविना सुतार, सचिव शांती फर्नांडिस, सीआरपी ताई योगिता चव्हाण, सीआरपी ताई तन्वी राणे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या. तर जिद्द ग्रामसंघ नरडवेच्या महिलांनीही उत्स्फुर्तपणे गावात प्रभातफेरी काढली.

यामध्ये सीआरपी ताई पूजा सावंत, कृषी सखी गीतांजली कांदे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या. आधार ग्रामसंघ दारीस्ते संघाने आपल्या गावात प्रभातफेरी काढली सीआरपी ताई जान्हवी पाटील, ग्रामसंघाच्या अध्यक्ष नमिता सुतार, सचिव श्वेता शिरसाठ, कोषाध्यक्ष रश्मी साळसकर आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.यावेळी आपले मत मांडताना या महिला म्हणाल्या, उमेद अभियानातील या सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. तेव्हा आता त्यांना शासन जर कमी करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कारण या लोकांनी आम्हाला संघटित करून नवा विचार दिला आहे. त्यामुळे शासनाला जर या कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर आम्ही देतो. मात्र या अधिकाºयांना काढून हे अभियान बंद करू नये.नोकरीवर कायम ठेवा व अभियान वाचवा संदेशयावेळी सर्व ग्रामसंघाच्या महिलांनी प्रत्येकी एक रुपया गोळा केला. ही रक्कम शासनाला पाठविली जाणार असून, तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही देतो. मात्र , हे अधिकारी आणि कर्मचारी कमी करू नका, आम्हाला आत्मनिर्भर करणाऱ्या या लोकांना नोकरीवर कायम ठेवा आणि अभियान वाचवा, असा संदेश दिला जाणार आहे. 

 

टॅग्स :GovernmentसरकारWomenमहिलाsindhudurgसिंधुदुर्ग