शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

विषय समिती सभापती निवडी बिनविरोध

By admin | Updated: April 7, 2017 22:45 IST

जिल्हा परिषद; चारही नवीन चेहरे; सर्व तालुक्यांना न्याय देण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपदासाठीची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी बिनविरोध पार पडली. त्यानुसार समाजकल्याण सभापतिपदी शारदा शंकर कांबळे, महिला व बालकल्याण सभापतिपदी सायली समीर सावंत, तर विषय समिती सभापतिपदी प्रीतेश शंकर राऊळ व संतोष वसंत साटविलकर यांना काँग्रेसने संधी दिली आहे. काँग्रेसने चारही सभापतिपदांसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, देवगड आणि दोडामार्ग वगळता सर्व तालुक्यांना प्रतिनिधित्व दिले आहे.जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठीची खास सभा पीठासन अधिकारी तथा निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण खाडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर तसेच सभागृहात सदस्य उपस्थित होते.सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सभापतिपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करायचे होते. या वेळेत काँग्रेसच्यावतीने समाजकल्याण सभापतिपदासाठी शारदा कांबळे, महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी सायली सावंत, तर विषय समिती सभापतिपदासाठी प्रीतेश राऊळ व संतोष साटविलकर यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. विरोधी गटातील सदस्यांनी मात्र नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे दुपारी ३.३० वाजता पीठासन अधिकारी प्रवीण खाडे यांनी काँग्रेसच्या वरील चारही नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांचा अल्प परिचयसमाजकल्याण सभापतिपदी विराजमान झालेल्या शारदा कांबळे या वैभववाडी तालुक्यातील कोंडये जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. महिला व बालकल्याण सभापती सायली सावंत या कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. सावंत या कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रमाकांत सावंत यांच्या स्नुषा आहेत, तर प्रीतेश राऊळ हे रेडी व संतोष साटविलकर हे पेंडूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. साटविलकर यांनी यापूर्वी मालवण उपसभापतिपद उपभोगले असल्याने त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे.सहा तालुक्यांमध्ये पदेसावंतवाडी, वेंगुर्ले, कणकवली, वैभववाडी, कुडाळ, मालवण या तालुक्यांमधून काँग्रेसला अपेक्षित यश मिळाल्याने या तालुक्यातून पदाधिकारी निवड करण्यात आली. तर दोडामार्ग व देवगडमध्ये काँग्रेसला अपेक्षित असे यश मिळालेले नव्हते. उपाध्यक्षांनी मानले आभार सभापतिपदासाठीची निवड प्रक्रिया विरोधक अनुपस्थित राहिल्याने बिनविरोध पार पडली. जर विरोधकांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असते, तर निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागणार होती. मात्र, विरोधकांनी नामनिर्देशन दाखल न केल्याने निवडणुकीस सामोरे जावे लागले नसल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. विरोधकांनी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी विरोधकांचे आभार मानले.