शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विषय समिती सभापती निवडी बिनविरोध

By admin | Updated: April 7, 2017 22:45 IST

जिल्हा परिषद; चारही नवीन चेहरे; सर्व तालुक्यांना न्याय देण्याचा प्रयत्न

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपदासाठीची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी बिनविरोध पार पडली. त्यानुसार समाजकल्याण सभापतिपदी शारदा शंकर कांबळे, महिला व बालकल्याण सभापतिपदी सायली समीर सावंत, तर विषय समिती सभापतिपदी प्रीतेश शंकर राऊळ व संतोष वसंत साटविलकर यांना काँग्रेसने संधी दिली आहे. काँग्रेसने चारही सभापतिपदांसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, देवगड आणि दोडामार्ग वगळता सर्व तालुक्यांना प्रतिनिधित्व दिले आहे.जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठीची खास सभा पीठासन अधिकारी तथा निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण खाडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर तसेच सभागृहात सदस्य उपस्थित होते.सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सभापतिपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करायचे होते. या वेळेत काँग्रेसच्यावतीने समाजकल्याण सभापतिपदासाठी शारदा कांबळे, महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी सायली सावंत, तर विषय समिती सभापतिपदासाठी प्रीतेश राऊळ व संतोष साटविलकर यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. विरोधी गटातील सदस्यांनी मात्र नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे दुपारी ३.३० वाजता पीठासन अधिकारी प्रवीण खाडे यांनी काँग्रेसच्या वरील चारही नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांचा अल्प परिचयसमाजकल्याण सभापतिपदी विराजमान झालेल्या शारदा कांबळे या वैभववाडी तालुक्यातील कोंडये जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. महिला व बालकल्याण सभापती सायली सावंत या कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. सावंत या कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रमाकांत सावंत यांच्या स्नुषा आहेत, तर प्रीतेश राऊळ हे रेडी व संतोष साटविलकर हे पेंडूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. साटविलकर यांनी यापूर्वी मालवण उपसभापतिपद उपभोगले असल्याने त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे.सहा तालुक्यांमध्ये पदेसावंतवाडी, वेंगुर्ले, कणकवली, वैभववाडी, कुडाळ, मालवण या तालुक्यांमधून काँग्रेसला अपेक्षित यश मिळाल्याने या तालुक्यातून पदाधिकारी निवड करण्यात आली. तर दोडामार्ग व देवगडमध्ये काँग्रेसला अपेक्षित असे यश मिळालेले नव्हते. उपाध्यक्षांनी मानले आभार सभापतिपदासाठीची निवड प्रक्रिया विरोधक अनुपस्थित राहिल्याने बिनविरोध पार पडली. जर विरोधकांनी नामनिर्देशपत्र दाखल केले असते, तर निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागणार होती. मात्र, विरोधकांनी नामनिर्देशन दाखल न केल्याने निवडणुकीस सामोरे जावे लागले नसल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. विरोधकांनी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी विरोधकांचे आभार मानले.